शहरं
Join us  
Trending Stories
1
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
2
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
3
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
4
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
5
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
6
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
7
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
8
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार
9
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत
10
"...तोपर्यंत मी तुरुंगात राहण्यास तयार आहे"; सोनम वांगचुक यांनी जोधपूरहून भावाकडे पाठवला मेसेज
11
INDW vs PAKW: अचानक मैदानात पसरला पांढरा धूर: भारत-पाक सामन्यात नेमकं काय घडलं?
12
IND W vs PAK W : पुरुष असो वा महिला, नो हँडशेक फॉर्म्युला! हरमनप्रीतनं पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ
13
‘’२०२७ चा वर्ल्डकप खेळायला मिळाला तर…’’, बोलता बोलता रोहित झाला होता भावूक, तो व्हिडीओ होतोय व्हायरल  
14
बिहारमध्ये केव्हा होणार विधानसभा निवडणूक? CEC ज्ञानेश कुमार यांची घोषणा; SIR संदर्भातही मोठं विधान
15
गुजरातमधून आणलेला सिंह तामिळनाडूच्या प्राणीसंग्रहालयातून पळाला; स्थानिकांमध्ये घबराट...
16
EMI थकवला तर फोन, लॅपटॉप होणार लॉक! RBI चा नवा नियम; कर्ज वसुलीसाठी बँकांना मिळणार 'हे' अधिकार
17
अनिल परबांचे आरोप, ज्योती रामदास कदम पहिल्यांदाच मीडियासमोर आल्या; आगीची घटना कशी घडली?
18
"केस ओढले, इस्रायलच्या ध्वजाला किस करायला लावलं"; ग्रेटा थनबर्गला अमानुष वागणुकीचा आरोप, प्रकरण काय?
19
अनर्थ टळला! लँडिंगपूर्वी एअर इंडिया विमानाचं RAT एक्टिव्ह; बर्मिघम रनवेवर विमान सुरक्षित उतरवलं
20
देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी खिशात किती कॅश ठेवतात? स्वतःच केला खुलासा

रिलायन्सविरोधी प्रकल्पग्रस्तांच्या आंदोलनाचा तेरावा दिवस, वारकरी मंडळींचा पाठिंबा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2020 01:08 IST

Raigad News : आंदोलन मागे घेतल्यावरच सकारात्मक चर्चा करू, हा हेका रिलायन्सने कायम ठेवल्याने बुधवारच्या ’तेराव्या’ दिवसापर्यंत प्रश्न मार्गी लागलेला नाही.

नागोठणे :  आंदोलन मागे घेतल्यावरच सकारात्मक चर्चा करू, हा हेका रिलायन्सने कायम ठेवल्याने बुधवारच्या ’तेराव्या’ दिवसापर्यंत प्रश्न मार्गी लागलेला नाही. दुसऱ्या बाजूला ठिय्या आंदोलनास बसलेल्या प्रकल्पग्रस्तांचा आत्मविश्वास वाढत असल्याचे दिसून येत असून, आंदोलनकर्त्यांच्या संख्येत दररोज वाढ होत आहे. मंगळवारी सायंकाळी उशिरा रोहे तसेच सुधागड, माणगाव तालुक्यातील वारकरी संप्रदायाच्या शेकडो मंडळींनी या ठिकाणी येत आपला सक्रिय पाठिंबा असल्याचे जाहीर केले.मागण्या मान्य झाल्याशिवाय येथून उठायचेच नाही, हा संकल्प लोकशासन आंदोलन संघर्ष समितीच्या माध्यमातून आंदोलनकर्त्यांकडून केला जात आहे. तर, आंदोलनकर्ते आणि रिलायन्स व्यवस्थापन यांच्यात काही बैठका झाल्या आहेत. बैठकीला रिलायन्सकडून ठोस निर्णय घेण्याचा अधिकार नसलेले वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहात असले तरी, दरवेळी आंदोलन मागे घेतल्यावरच सकारात्मक चर्चा केली जाईल असे त्यांच्याकडून वारंवार बोलले जात आहे. हे व्यवस्थापन स्थानिक पत्रकारांशी संवाद साधण्यातसुद्धा तयार नसल्याने तेराव्या दिवसापर्यंत रिलायन्सची भूमिका स्पष्ट होऊ शकली नाही. आंदोलनकर्ते आपल्या मागाण्यांपासून तसूभरही मागे हटले नसल्याचे स्पष्ट होत आहे. संघटनेचे राष्ट्रीय संघटक राजेंद्र गायकवाड येथे महिनाभर तंबू ठोकूनच बसले असून, आज त्यांना ज्या प्रकल्पग्रस्तांकडे शासनाकडून प्रमाणपत्र मिळाले आहे त्यातील काही तरुण मंडळी रिलायन्स कंपनीतील ठेकेदारांकडे आजही कामावर जातात व आपल्या आई, वडील किंवा पत्नीला आंदोलनासाठी पाठवतात असे आढळून आले. या प्रकाराबाबत नाराजी व्यक्त करताना गायकवाड यांनी उद्यापासून हे कामगार कामावर गेल्याचे निदर्शनास आल्यास त्यांचे नाव आंदोलनातून काढण्यात येईल असा इशारा दिला.

टॅग्स :RaigadरायगडRelianceरिलायन्स