शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

आठ वाड्यांचा पाणीप्रश्न सुटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2018 23:34 IST

जिल्हाधिकाऱ्यांंनी दिले संबंधित अधिकाऱ्यांना आदेश : पाली-भुतिवली धरणातून पाणीपुरवठा करण्यासाठी उपाययोजना सुरू

- जयंत धुळप 

अलिबाग : अलिबाग : माथेरानच्या डोंगरात असलेल्या सागाची वाडी, आसलवाडी, बोरीची वाडी, भुतिवली वाडी, चिंचवाडी, धनगरवाडा, धामणदांडा, नाचण्या माळ या आठ वाड्यांना तत्काळ उपाययोजना करून पाणीपुरवठा सुरळीत सुरू करा, असे आदेश शनिवारी रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी शासकीय यंत्रणांना दिले आहेत.

माथेरान डोंगरात असलेल्या आठ वाड्यांच्या पाणीसमस्येबाबत कविता वसंत निरगुडे या युवतीने जिल्हाधिकाºयांना पत्र लिहून व्यथा मांडली होती. त्याची दखल घेत जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी यांनी सुट्टीचा दिवस असूनही शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष बैठक बोलावली. तत्पूर्वी संबंधित प्रांताधिकारी, गटविकास अधिकारी यांना आठ वाड्यांवर पाठवून तेथील परिस्थितीचा अहवाल मागविला. त्यानंतर बैठक बोलावून पाणीसमस्या सोडवण्यासाठी चर्चा करून आदेश देण्यात आले.

माथेरान परिसरातील आठ वाड्यांचा पाणीप्रश्न बिकट आहे. या वाड्यांना पाली-भुतिवली धरणातून कायमस्वरूपी पाणीपुरवठा व्हावा, अशी स्थानिक रहिवाशांची मागणी आहे. पाली-भुतिवली धरणाच्या पायथ्याशी उद्भव विहीर घेऊन त्यातून पंपिंग करून धामणदांडा येथे पाण्याची टाकी उभारणे व तेथून गावांना पाणीपुरवठा करणे, अशी एक कोटी ४० लाख रु पयांची योजना प्रस्तावित आहे. या योजनेच्या कामास गती मिळणे अपेक्षित आहे, अशी माहिती या तातडीच्या बैठकीत जिल्हा परिषदेचे शाखा अभियंता पी. एस. जोशी यांनी दिली. या संदर्भात स्वत: पाठपुरावा करणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी यांनी या वेळी सांगितले.

योजनेत सुमारे पाच कि.मी. पाइपलाइनचा अंतर्भाव आहे. प्रत्यक्षात ही योजना कार्यान्वित व्हायला वेळ लागणार आहे. परिसरात पाली-भुतिवली धरणाजवळ आसल गावाजवळ एका उद्भव विहिरीतून स्थानिक गावकºयांनी लोकसहभागातून पाइपलाइन टाकली आहे. तथापि, ही पाइपलाइन गळकी असल्याने पाणी उपलब्ध होण्यास अडचणी निर्माण होत असल्याची माहिती आदिवासी प्रकल्प कार्यालयाचे सहायक प्रकल्प अधिकारी आनंद पाटील यांनी दिली.सामाजिक उत्तरदायित्व निधीतून पाइप, विद्युत पंपजिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी यांनी निर्देश दिले की, या ठिकाणी उद्योजकांच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून तातडीने लोखंडी पाइप व विद्युत पंप उपलब्ध करून देण्यात यावा.ही योजना कार्यान्वित करण्यात यावी, यामुळे आसल, भुतिवली, बोरीचा माळ, सागाची वाडी, धामणदांडा या गावांचा पाणीप्रश्न सोडविता येईल.उर्वरित गावात लहान मशिन नेऊन बोअर घेण्यात यावी, किंवा अस्तित्वात असलेल्या विहिरींमध्ये आडवे बोअर घेऊन पाण्याची उपलब्धता तपासण्यात यावी व पाण्याचा प्रश्न सोडवावा, असे आदेश सूर्यवंशी यांनी दिले.आपल्याला कधी गावाला गेले तरी पहाटे उठून पाण्यासाठी धावाधाव करावी लागते. या भागात रस्त्याची सुविधा आणि पाण्याची सोय केल्यास या भागातील सर्व आदिवासीवाड्या विकासाच्या मुख्य प्रवाहात येऊ शकतात.- मंगेश सुतक, मुख्याध्यापक, नेरळ विद्यामंदिर कनिष्ठ महाविद्यालय

टॅग्स :water scarcityपाणी टंचाई