शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
2
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
3
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
4
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
5
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
6
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
7
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर
8
१३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु
9
१० वर्षांपासून गर्लफ्रेंडला फसवत होता बॉयफ्रेंड; पाळीव कुत्र्याने 'अशी' केली पोलखोल!
10
बाप रे बाप...! एवढ्या संपत्तीचे मालक आहेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली; स्विस बँकतही आहेत कोटीच्या कोटी...!
11
लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू
12
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
13
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
14
पितृपक्ष २०२५: पितृपक्षाच्या संकष्टीला करतात साखर चौथेच्या गणपतीची स्थापना पण, विसर्जन कधी?
15
IND vs PAK : सूर्यकुमार यादवचा आक्रमक बाणा; पाकचा सलमान रिप्लाय देताना उगाच वाकड्यात शिरला (VIDEO)
16
१९९० सालचे जनआंलोदन; नेपाळच्या राजाला सोडावे लागले आपले सिंहासन, असा झाला राजेशाहीचा अंत...
17
आजची तारीख महत्त्वाची, ९९९ चा महायोग; मंगळाचे प्राबल्य, झोपण्यापूर्वी आठवणीने करा 'हे' काम
18
एक अंध तर दुसरा अपंग, तरीही मिळून तिसऱ्याला संपवलं! घटना ऐकून पोलीसही झाले स्तब्ध
19
घरात लग्नाची तयारी, होणाऱ्या पतीसोबत करायचं होतं फोटोशूट पण तरुणीसोबत घडलं आक्रित अन्...
20
बाजाराचा २ महिन्यांचा उच्चांक! गुंतवणूकदारांची १.२३ लाख कोटींची कमाई, 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर

‘रेमडेसिवीर’चा पुरेसा साठा, तुटवडा नसल्याने धोका नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2020 01:12 IST

raigad : जिल्ह्यात रेमडेसिवीर इंजेक्शनसह अन्य औषधांचा पुरेसा साठा असल्याने काेणतीच धावपळ हाेणार नसल्याचे चित्र आहे. 

रायगड : गेल्या महिन्यापासून काेराेना रुग्ण संख्येमध्ये घट हाेत आहे. त्यामुळे रुग्णालयांमध्ये उपचारासाठी रुग्णांची संख्या कमी असल्याने रेमडेसिवीर इंजेक्शनचा वापर कमी झाला आहे. जिल्ह्यात रेमडेसिवीर इंजेक्शनसह अन्य औषधांचा पुरेसा साठा असल्याने काेणतीच धावपळ हाेणार नसल्याचे चित्र आहे. अद्यापही काेराेनावरील लस बाजारात उपलब्ध झालेली नसल्याने रेमडेसिवीर इंजेक्शनवरच रुग्णांची मदार असल्याचे दिसून येते. काेराेना संसर्गाचा धाेका अधिक हाेता. त्या कालावाधीमध्ये रुग्णांची संख्या जास्त हाेती. त्यामुळे रुग्णालयातील बेड, आयसीयू बेड,व्हेंटिलेटर बेड मिळविण्यासाठी रुग्णांसह त्यांच्या नातेवाइकांना चांगलीच कसरत करावी लागत हाेती. सरकार आणि प्रशासनाने काेराेनाला राेखण्यासाठी शक्यत्या उपाययाेजना केल्या हाेत्या. काेराेना राेगावर प्रभावी लस आलेली नसल्याने रुग्णांना बरे करण्यासाठी अन्य औषधांबराेबरच ज्यांना गरज आहे. त्यांना इंजेक्शन द्यावे लागते. सुरुवातीच्या कालावधीत हे प्रमाण ३०० पर्यंत हाेते. मात्र, काेराेनाचा संसर्ग सध्या बऱ्यापैकी कमी झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे सध्या सुमारे ३० रेमडेसिवीर इंजेक्शनची गरज लागत असल्याचे आराेग्य विभागाचे म्हणणे आहे. रुग्णसंख्या वाढली, तरी जिल्ह्यात रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा उपलब्ध आहे. ३० इंजेक्शनची दररोज गरजरुग्णसंख्या कमी असल्याने दिवसाला ३० रेमडेसिवीर इंजेक्शनची गरज आहे. प्रत्येक रुग्णांना गरज लागतेच असे नाही, तसेच आवश्यक असलेल्यांना पूर्ण सहा डाेसचीही गरज लागत नाही.त्यामुळे सध्या तरी जिल्ह्यात धावपळ उडेल, असे चित्र सध्या दिसते आहे. 

ॲंटिजन टेस्ट, औषधी साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध n सध्या रुग्णसंख्या कमी असल्याने औषधांचा वापर कमी झाला आहे. सहा हजार अँटिजन टेस्ट किट आराेग्य विभागाकडे उपलब्ध आहेत. संबंधित रुग्णालयांना ते वितरितही करण्यात आले आहेतn तसेच, महत्त्वाचा औषध साठा मुबलक प्रमाणात आहे. काेराेनाचा फैलाव झाला, तरी ताे कमी पडणार नाही. गरज वाटल्यास सरकारकडे त्यांची मागणी करण्यात येऊन औषधे कमी पडणार नाहीत, याची दक्षता घेतली जात आहे. त्यामुळे सध्या तरी काळजीचे कारण नाही.

सध्या काेराेनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याचे रुग्ण संख्येवरून दिसून येते. त्यामुळे रेमडेसिवीर इंजेक्शनसह अन्य औषधांची जास्त गरज भासत नाही. आपल्याकडे सर्व औषधांचा मुबलक साठा आहे. गरज लागल्यास नक्कीच राज्य सरकारकडे मागणी करण्यात येणार आहे. - डाॅ.सुहास माने,जिल्हा शल्यचिकित्सक, रायगड

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसRaigadरायगड