शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

‘रेमडेसिवीर’चा पुरेसा साठा, तुटवडा नसल्याने धोका नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2020 01:12 IST

raigad : जिल्ह्यात रेमडेसिवीर इंजेक्शनसह अन्य औषधांचा पुरेसा साठा असल्याने काेणतीच धावपळ हाेणार नसल्याचे चित्र आहे. 

रायगड : गेल्या महिन्यापासून काेराेना रुग्ण संख्येमध्ये घट हाेत आहे. त्यामुळे रुग्णालयांमध्ये उपचारासाठी रुग्णांची संख्या कमी असल्याने रेमडेसिवीर इंजेक्शनचा वापर कमी झाला आहे. जिल्ह्यात रेमडेसिवीर इंजेक्शनसह अन्य औषधांचा पुरेसा साठा असल्याने काेणतीच धावपळ हाेणार नसल्याचे चित्र आहे. अद्यापही काेराेनावरील लस बाजारात उपलब्ध झालेली नसल्याने रेमडेसिवीर इंजेक्शनवरच रुग्णांची मदार असल्याचे दिसून येते. काेराेना संसर्गाचा धाेका अधिक हाेता. त्या कालावाधीमध्ये रुग्णांची संख्या जास्त हाेती. त्यामुळे रुग्णालयातील बेड, आयसीयू बेड,व्हेंटिलेटर बेड मिळविण्यासाठी रुग्णांसह त्यांच्या नातेवाइकांना चांगलीच कसरत करावी लागत हाेती. सरकार आणि प्रशासनाने काेराेनाला राेखण्यासाठी शक्यत्या उपाययाेजना केल्या हाेत्या. काेराेना राेगावर प्रभावी लस आलेली नसल्याने रुग्णांना बरे करण्यासाठी अन्य औषधांबराेबरच ज्यांना गरज आहे. त्यांना इंजेक्शन द्यावे लागते. सुरुवातीच्या कालावधीत हे प्रमाण ३०० पर्यंत हाेते. मात्र, काेराेनाचा संसर्ग सध्या बऱ्यापैकी कमी झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे सध्या सुमारे ३० रेमडेसिवीर इंजेक्शनची गरज लागत असल्याचे आराेग्य विभागाचे म्हणणे आहे. रुग्णसंख्या वाढली, तरी जिल्ह्यात रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा उपलब्ध आहे. ३० इंजेक्शनची दररोज गरजरुग्णसंख्या कमी असल्याने दिवसाला ३० रेमडेसिवीर इंजेक्शनची गरज आहे. प्रत्येक रुग्णांना गरज लागतेच असे नाही, तसेच आवश्यक असलेल्यांना पूर्ण सहा डाेसचीही गरज लागत नाही.त्यामुळे सध्या तरी जिल्ह्यात धावपळ उडेल, असे चित्र सध्या दिसते आहे. 

ॲंटिजन टेस्ट, औषधी साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध n सध्या रुग्णसंख्या कमी असल्याने औषधांचा वापर कमी झाला आहे. सहा हजार अँटिजन टेस्ट किट आराेग्य विभागाकडे उपलब्ध आहेत. संबंधित रुग्णालयांना ते वितरितही करण्यात आले आहेतn तसेच, महत्त्वाचा औषध साठा मुबलक प्रमाणात आहे. काेराेनाचा फैलाव झाला, तरी ताे कमी पडणार नाही. गरज वाटल्यास सरकारकडे त्यांची मागणी करण्यात येऊन औषधे कमी पडणार नाहीत, याची दक्षता घेतली जात आहे. त्यामुळे सध्या तरी काळजीचे कारण नाही.

सध्या काेराेनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याचे रुग्ण संख्येवरून दिसून येते. त्यामुळे रेमडेसिवीर इंजेक्शनसह अन्य औषधांची जास्त गरज भासत नाही. आपल्याकडे सर्व औषधांचा मुबलक साठा आहे. गरज लागल्यास नक्कीच राज्य सरकारकडे मागणी करण्यात येणार आहे. - डाॅ.सुहास माने,जिल्हा शल्यचिकित्सक, रायगड

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसRaigadरायगड