शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
9
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
10
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
11
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
12
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
13
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
14
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
15
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
16
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
17
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
18
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
19
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
20
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...

रायगडची जागा लढविण्याचा अधिकार सुनील तटकरेंचाच, शिंदेंच्या आमदाराचे स्पष्टीकरण

By राजेश भोस्तेकर | Updated: February 12, 2024 12:55 IST

अलिबाग शहरातील एका कार्यक्रमाला आमदार महेंद्र दळवी उपस्थित होते.

अलिबाग : रायगडलोकसभा मतदार संघात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात सध्या जागेवरून कलगी तुरा सुरू झाला आहे. भाजपचे रायगडचे नेते वारंवार रायगड लोकसभा जागेसाठी मेळाव्यातून दावा करीत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे हे पुन्हा लोकसभा लढविण्यास इच्छुक आहेत. शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांनीही रायगड लोकसभासाठी विद्यमान खासदार सुनील तटकरे यांना पसंती दिली आहे. भाजपने याबाबत आत्मपरीक्षण करावे आज लोकसभेसाठी दावा करीत आहेत. उद्या विधानसभेसाठी ही दावा करतील. त्यामुळे वरिष्ठ पातळीवर यावर निर्णय होणे अपेक्षित आहे. अशी प्रतिक्रिया अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनी दिली आहे. 

अलिबाग शहरातील एका कार्यक्रमाला आमदार महेंद्र दळवी उपस्थित होते. त्यावेळी रायगड लोकसभा जागेबाबत शिंदे गटाची भूमिका काय याबाबत प्रश्न विचारला असता आमदार दळवी यांनी आपले मत व्यक्त केले आहे. आमदार दळवी यांच्या या वक्तव्यमुळे शिंदे गटाने लोकसभेचा दावा सोडला असल्याचे यावरून दिसत आहे. शिंदे गट आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस सोबत असल्याचे यावरून दिसत आहे. 

रायगड लोकसभा मतदार संघात सध्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. भाजपने हा पहिल्यापासून या मतदार संघांवर दावा करीत आहे. सध्या जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील याचे मतदार संघात जोरदार प्रचार सभा सुरू आहेत. अद्यापही रायगडाची जागा युतीमध्ये कोणाला देणार यात चर्चा झालेली नाही आहे. मात्र भाजप तर्फे ही जागा आपल्यालाच मिळणार अशा आविर्भावात नेत्याची मोर्चे बांधणी सुरू झाली आहे. युतीचे मित्र असलेले विद्यमान खासदार सुनील तटकरे यांना ही सभेतून विरोध केला जात आहे. त्यामुळे निवडणूक जाहीर होण्याआधीच लोकसभा जागेवरून वाद निर्माण झाला आहे. 

रायगड लोकसभा लढविण्यासाठी खासदार सुनील तटकरे हेच हकदार असल्याचे शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांनी म्हटले आहे. लोकसभेवेळी जर अशी परिस्थिती असेल तर विधानसभेलाही चर्चा होईल यामुळे युतीत दुरावा निर्माण होईल त्यामुळे भाजपच्या वरिष्ठ पातळीवर निर्णय होणे आवश्यक आहे. असे मत आमदार महेंद्र दळवी यांनी दिली आहे. इंडिया आघाडीचे उमेदवार असलेले अनंत गीते यांनी कोणतीही विकास कामे केलेली नाही आहे. कधी निधीही आणलेला नाही आहे. उलट सुनील तटकरे यांच्या कामाचा धडाका जिल्ह्याला माहीत आहे. त्यामुळे गीते हे उमेदवार असतील तर काहीही फरक पडणार नाही असे दळवी यांनी म्हटले आहे.

टॅग्स :RaigadरायगडBJPभाजपाsunil tatkareसुनील तटकरेlok sabhaलोकसभा