शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

रायगडची जागा लढविण्याचा अधिकार सुनील तटकरेंचाच, शिंदेंच्या आमदाराचे स्पष्टीकरण

By राजेश भोस्तेकर | Updated: February 12, 2024 12:55 IST

अलिबाग शहरातील एका कार्यक्रमाला आमदार महेंद्र दळवी उपस्थित होते.

अलिबाग : रायगडलोकसभा मतदार संघात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात सध्या जागेवरून कलगी तुरा सुरू झाला आहे. भाजपचे रायगडचे नेते वारंवार रायगड लोकसभा जागेसाठी मेळाव्यातून दावा करीत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे हे पुन्हा लोकसभा लढविण्यास इच्छुक आहेत. शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांनीही रायगड लोकसभासाठी विद्यमान खासदार सुनील तटकरे यांना पसंती दिली आहे. भाजपने याबाबत आत्मपरीक्षण करावे आज लोकसभेसाठी दावा करीत आहेत. उद्या विधानसभेसाठी ही दावा करतील. त्यामुळे वरिष्ठ पातळीवर यावर निर्णय होणे अपेक्षित आहे. अशी प्रतिक्रिया अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनी दिली आहे. 

अलिबाग शहरातील एका कार्यक्रमाला आमदार महेंद्र दळवी उपस्थित होते. त्यावेळी रायगड लोकसभा जागेबाबत शिंदे गटाची भूमिका काय याबाबत प्रश्न विचारला असता आमदार दळवी यांनी आपले मत व्यक्त केले आहे. आमदार दळवी यांच्या या वक्तव्यमुळे शिंदे गटाने लोकसभेचा दावा सोडला असल्याचे यावरून दिसत आहे. शिंदे गट आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस सोबत असल्याचे यावरून दिसत आहे. 

रायगड लोकसभा मतदार संघात सध्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. भाजपने हा पहिल्यापासून या मतदार संघांवर दावा करीत आहे. सध्या जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील याचे मतदार संघात जोरदार प्रचार सभा सुरू आहेत. अद्यापही रायगडाची जागा युतीमध्ये कोणाला देणार यात चर्चा झालेली नाही आहे. मात्र भाजप तर्फे ही जागा आपल्यालाच मिळणार अशा आविर्भावात नेत्याची मोर्चे बांधणी सुरू झाली आहे. युतीचे मित्र असलेले विद्यमान खासदार सुनील तटकरे यांना ही सभेतून विरोध केला जात आहे. त्यामुळे निवडणूक जाहीर होण्याआधीच लोकसभा जागेवरून वाद निर्माण झाला आहे. 

रायगड लोकसभा लढविण्यासाठी खासदार सुनील तटकरे हेच हकदार असल्याचे शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांनी म्हटले आहे. लोकसभेवेळी जर अशी परिस्थिती असेल तर विधानसभेलाही चर्चा होईल यामुळे युतीत दुरावा निर्माण होईल त्यामुळे भाजपच्या वरिष्ठ पातळीवर निर्णय होणे आवश्यक आहे. असे मत आमदार महेंद्र दळवी यांनी दिली आहे. इंडिया आघाडीचे उमेदवार असलेले अनंत गीते यांनी कोणतीही विकास कामे केलेली नाही आहे. कधी निधीही आणलेला नाही आहे. उलट सुनील तटकरे यांच्या कामाचा धडाका जिल्ह्याला माहीत आहे. त्यामुळे गीते हे उमेदवार असतील तर काहीही फरक पडणार नाही असे दळवी यांनी म्हटले आहे.

टॅग्स :RaigadरायगडBJPभाजपाsunil tatkareसुनील तटकरेlok sabhaलोकसभा