शहरं
Join us  
Trending Stories
1
Prajwal Revanna: माजी पंतप्रधान देवेगौडांचा नातू प्रज्ज्वल रेवण्णा अत्याचार प्रकरणात दोषी, उद्या शिक्षेची घोषणा
2
Dahi Handi 2025: गोविंदा आला रे...! सरकार संरक्षण देणार; राज्यातील १.५० लाख गोविंदांचा विमा काढणार...
3
मानहानी प्रकरणात कंगनाला मोठा धक्का; उच्च न्यायालयाने फेटाळली याचिका, नेमकं प्रकरण काय?
4
'हल्ली मुली नग्न होऊन पैसे कमावत आहेत'; साध्वी ऋतंभरा यांच्या विधानाने नवा वाद
5
फक्त ३,००० रुपये भरा आणि वर्षभर टोल फ्री प्रवास करा, १५ ऑगस्टपासून नवा नियम! फक्त 'या' वाहनांना लागू
6
Mahabharat: एखादी गोष्ट बायकांच्या पोटात राहत नाही, त्याला कारणीभूतआहे महाभारतातली 'ही' कथा!
7
IND vs ENG : एक धाव वाचवण्याच्या नादात 'मॅच विनर' खेळाडू कसोटीतून OUT; टीम इंडिया याचा फायदा उठवणार?
8
PM Kisan योजनेच्या २० व्या हप्त्यासाठी फक्त एक दिवस शिल्लक; लाभार्थींच्या यादीत नाव आहे का चेक करा
9
कृषिमंत्रिपदाची सर्वात पहिली ऑफर अजित पवारांनी मला दिली होती; छगन भुजबळांचा गौप्यस्फोट
10
चीनमुळे अनेक उद्योगांवर संकट, सामना करण्यासाठी आता भारताचा 'मास्टर प्लान', सरकार उचलणार पाऊल?
11
महाराष्ट्र बदलतोय : पैठणी ते कोल्हापुरी चप्पल, MSME उद्योगांची डिजिटल झेप!
12
२ पिढ्या पण ध्येय एकच! माय-लेकीच्या जोडीची दमदार कामगिरी, एकत्र पास केली NEET
13
दमदार इंजिन, शानदार मायलेज..; Honda ने लॉन्च केली स्वस्त स्पोर्ट्स बाईक, किंमत...
14
Powerful Air Forces : जगातील सगळ्यात ताकदवान हवाई दलं; भारत 'टॉप ५'मध्ये कितव्या स्थानावर?
15
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर, ९ सप्टेंबरला होणार मतदान, निवडणूक आयोगाची घोषणा, असा आहे संपूर्ण कार्यक्रम
16
रमीला ऑलिम्पिक दर्जा मिळणार, कोकाटेंना क्रीडा मंत्रालय देऊन सन्मानच; काँग्रेसचा महायुतीला चिमटा
17
Monsoon Recipe: तुम्ही कधी पंजाबी शिरा 'प्यायलात' का? ट्राय करा, पावसाळी आजारांवरचा चविष्ट उपाय!
18
ओव्हल कसोटीत टीम इंडियाकडून झाली मोठी चूक, ठरू शकते पराभवाचं कारण  
19
UPI New Rule: आजपासून लागू झाले यूपीआयचे नवे नियम; सारखं सारखं करता येणार नाही 'हे' काम
20
दीड वर्षांचा लेक, महिन्याभरापूर्वी प्रमोशन; लेफ्टनंट कर्नल भानू प्रताप शहीद, दगड पडले अन्...

रायगडची जागा लढविण्याचा अधिकार सुनील तटकरेंचाच, शिंदेंच्या आमदाराचे स्पष्टीकरण

By राजेश भोस्तेकर | Updated: February 12, 2024 12:55 IST

अलिबाग शहरातील एका कार्यक्रमाला आमदार महेंद्र दळवी उपस्थित होते.

अलिबाग : रायगडलोकसभा मतदार संघात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात सध्या जागेवरून कलगी तुरा सुरू झाला आहे. भाजपचे रायगडचे नेते वारंवार रायगड लोकसभा जागेसाठी मेळाव्यातून दावा करीत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे हे पुन्हा लोकसभा लढविण्यास इच्छुक आहेत. शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांनीही रायगड लोकसभासाठी विद्यमान खासदार सुनील तटकरे यांना पसंती दिली आहे. भाजपने याबाबत आत्मपरीक्षण करावे आज लोकसभेसाठी दावा करीत आहेत. उद्या विधानसभेसाठी ही दावा करतील. त्यामुळे वरिष्ठ पातळीवर यावर निर्णय होणे अपेक्षित आहे. अशी प्रतिक्रिया अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनी दिली आहे. 

अलिबाग शहरातील एका कार्यक्रमाला आमदार महेंद्र दळवी उपस्थित होते. त्यावेळी रायगड लोकसभा जागेबाबत शिंदे गटाची भूमिका काय याबाबत प्रश्न विचारला असता आमदार दळवी यांनी आपले मत व्यक्त केले आहे. आमदार दळवी यांच्या या वक्तव्यमुळे शिंदे गटाने लोकसभेचा दावा सोडला असल्याचे यावरून दिसत आहे. शिंदे गट आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस सोबत असल्याचे यावरून दिसत आहे. 

रायगड लोकसभा मतदार संघात सध्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. भाजपने हा पहिल्यापासून या मतदार संघांवर दावा करीत आहे. सध्या जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील याचे मतदार संघात जोरदार प्रचार सभा सुरू आहेत. अद्यापही रायगडाची जागा युतीमध्ये कोणाला देणार यात चर्चा झालेली नाही आहे. मात्र भाजप तर्फे ही जागा आपल्यालाच मिळणार अशा आविर्भावात नेत्याची मोर्चे बांधणी सुरू झाली आहे. युतीचे मित्र असलेले विद्यमान खासदार सुनील तटकरे यांना ही सभेतून विरोध केला जात आहे. त्यामुळे निवडणूक जाहीर होण्याआधीच लोकसभा जागेवरून वाद निर्माण झाला आहे. 

रायगड लोकसभा लढविण्यासाठी खासदार सुनील तटकरे हेच हकदार असल्याचे शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांनी म्हटले आहे. लोकसभेवेळी जर अशी परिस्थिती असेल तर विधानसभेलाही चर्चा होईल यामुळे युतीत दुरावा निर्माण होईल त्यामुळे भाजपच्या वरिष्ठ पातळीवर निर्णय होणे आवश्यक आहे. असे मत आमदार महेंद्र दळवी यांनी दिली आहे. इंडिया आघाडीचे उमेदवार असलेले अनंत गीते यांनी कोणतीही विकास कामे केलेली नाही आहे. कधी निधीही आणलेला नाही आहे. उलट सुनील तटकरे यांच्या कामाचा धडाका जिल्ह्याला माहीत आहे. त्यामुळे गीते हे उमेदवार असतील तर काहीही फरक पडणार नाही असे दळवी यांनी म्हटले आहे.

टॅग्स :RaigadरायगडBJPभाजपाsunil tatkareसुनील तटकरेlok sabhaलोकसभा