शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

रायगडची जागा लढविण्याचा अधिकार सुनील तटकरेंचाच, शिंदेंच्या आमदाराचे स्पष्टीकरण

By राजेश भोस्तेकर | Updated: February 12, 2024 12:55 IST

अलिबाग शहरातील एका कार्यक्रमाला आमदार महेंद्र दळवी उपस्थित होते.

अलिबाग : रायगडलोकसभा मतदार संघात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात सध्या जागेवरून कलगी तुरा सुरू झाला आहे. भाजपचे रायगडचे नेते वारंवार रायगड लोकसभा जागेसाठी मेळाव्यातून दावा करीत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे हे पुन्हा लोकसभा लढविण्यास इच्छुक आहेत. शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांनीही रायगड लोकसभासाठी विद्यमान खासदार सुनील तटकरे यांना पसंती दिली आहे. भाजपने याबाबत आत्मपरीक्षण करावे आज लोकसभेसाठी दावा करीत आहेत. उद्या विधानसभेसाठी ही दावा करतील. त्यामुळे वरिष्ठ पातळीवर यावर निर्णय होणे अपेक्षित आहे. अशी प्रतिक्रिया अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनी दिली आहे. 

अलिबाग शहरातील एका कार्यक्रमाला आमदार महेंद्र दळवी उपस्थित होते. त्यावेळी रायगड लोकसभा जागेबाबत शिंदे गटाची भूमिका काय याबाबत प्रश्न विचारला असता आमदार दळवी यांनी आपले मत व्यक्त केले आहे. आमदार दळवी यांच्या या वक्तव्यमुळे शिंदे गटाने लोकसभेचा दावा सोडला असल्याचे यावरून दिसत आहे. शिंदे गट आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस सोबत असल्याचे यावरून दिसत आहे. 

रायगड लोकसभा मतदार संघात सध्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. भाजपने हा पहिल्यापासून या मतदार संघांवर दावा करीत आहे. सध्या जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील याचे मतदार संघात जोरदार प्रचार सभा सुरू आहेत. अद्यापही रायगडाची जागा युतीमध्ये कोणाला देणार यात चर्चा झालेली नाही आहे. मात्र भाजप तर्फे ही जागा आपल्यालाच मिळणार अशा आविर्भावात नेत्याची मोर्चे बांधणी सुरू झाली आहे. युतीचे मित्र असलेले विद्यमान खासदार सुनील तटकरे यांना ही सभेतून विरोध केला जात आहे. त्यामुळे निवडणूक जाहीर होण्याआधीच लोकसभा जागेवरून वाद निर्माण झाला आहे. 

रायगड लोकसभा लढविण्यासाठी खासदार सुनील तटकरे हेच हकदार असल्याचे शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांनी म्हटले आहे. लोकसभेवेळी जर अशी परिस्थिती असेल तर विधानसभेलाही चर्चा होईल यामुळे युतीत दुरावा निर्माण होईल त्यामुळे भाजपच्या वरिष्ठ पातळीवर निर्णय होणे आवश्यक आहे. असे मत आमदार महेंद्र दळवी यांनी दिली आहे. इंडिया आघाडीचे उमेदवार असलेले अनंत गीते यांनी कोणतीही विकास कामे केलेली नाही आहे. कधी निधीही आणलेला नाही आहे. उलट सुनील तटकरे यांच्या कामाचा धडाका जिल्ह्याला माहीत आहे. त्यामुळे गीते हे उमेदवार असतील तर काहीही फरक पडणार नाही असे दळवी यांनी म्हटले आहे.

टॅग्स :RaigadरायगडBJPभाजपाsunil tatkareसुनील तटकरेlok sabhaलोकसभा