शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

भाजपला रोखण्यासाठी डावी आघाडी एकवटली, ‘शेकाप’च्या नेतृत्वाखाली १३ पक्षांची बांधली मोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2023 12:25 IST

शेकापच्या वधार्पन दिनानिमित्त सुधागड येथे बुधवारी झालेल्या मेळाव्यात या आघाडीची घोषणा आ. पाटील व संभाजीराजे यांनी केली. 

सुधागड :  राज्यातील विविध १३ डाव्या पक्षांनी शेकापचे  सरचिटणीस व आमदार जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली एकत्रित येऊन डावी आघाडी स्थापन केली आहे. त्यामध्ये संभाजीराजे छत्रपती यांच्या  स्वराज्य पक्षाचाही समावेश असणार आहे. शेकापच्या वधार्पन दिनानिमित्त सुधागड येथे बुधवारी झालेल्या मेळाव्यात या आघाडीची घोषणा आ. पाटील व संभाजीराजे यांनी केली. 

भाजपला सत्तेपासून दूर करण्यासाठी  त्यांच्या विरोधात देशात इंडिया तर राज्यात सर्व पक्ष एकत्रित येऊन महाविकास आघाडी बनवली आहे. त्यांच्याअंतर्गत आमची आघाडी कार्यरत राहील, असे दोघांनी यावेळी जाहीर केले. यावेळी राज्यातील १३ डावे पक्षाचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.   भाजप सत्तेत आल्यापासून संविधान विरोधी काम करीत आहे. राज्यात आणि देशात सत्ता काबीज करण्यासाठी भ्रष्ट राजकारण सुरू आहे. महापुरुष यांच्याबाबत अपशब्द वापरूनही भाजप सरकार पाठीशी घालत आहे. त्यामुळे २०२४च्या निवडणुकीत भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी डाव्या पक्षाने आघाडी बनवली आहे. 

‘या’ १३ पक्षांची आघाडीशेकाप, स्वाभिमानी पक्ष, स्वराज्य पक्ष, आम आदमी पार्टी, सीपीआय, लाल निशाण पक्ष, बहुजन विकास आघाडी, समाजवादी पार्टी, जनता दल, सत्यशोधक कम्युनिस्ट पक्ष, बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष हे तेरा डावे पक्ष याची आघाडी निर्माण झाली आहे. या आघाडीचे नेतृत्व शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी करावे, असे सर्वच डावे पक्षाने म्हटले आहे.

संभाजी भिडेंवर कारवाई करा : संभाजीराजेवादग्रस्त वक्तव्य करणारे संभाजी भिडे यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी संभाजीराजे यांनी केली आहे. शेकापच्या वर्धापन दिनानिमित्त प्रमुख अतिथी म्हणून ते उपस्थित होते. हे सांगलीचे गृहस्थ आमच्या महापुरुषांचा अपमान करत सुटले आहेत. कधी महात्मा फुले तर कधी महात्मा गांधींचा अवमान करतात. सरकार त्यांच्यावर कारवाई का करत नाही?, असा सवाल त्यांनी केला. 

टॅग्स :PoliticsराजकारणSambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपतीRaigadरायगड