शहरं
Join us  
Trending Stories
1
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
2
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
3
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
4
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
5
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
6
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
7
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
8
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
9
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा
10
'महापालिका निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकणार': एकनाथ शिंदे
11
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
12
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
13
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर
14
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
15
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
16
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
17
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
18
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
19
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
20
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)

कोळी बांधवांनी केला सागराला नारळ आर्पण

By निखिल म्हात्रे | Updated: August 30, 2023 19:10 IST

समुद्राला नारळ अर्पण करून मासेमारीला सुरुवात करण्याचा प्रघात आता केवळ औपचारिकतेपुरता उरला आहे.

अलिबाग - सण आयलाय गो... आयलाय गो... नारळी पुनवेचा, मनी आनंद मावना... कोळ्यांचे दुनियेचा अशा विविध पारंपारीक कोळी गाण्यांवर नृत्य करीत जिल्ह्यातील कोळी बांधवांनी सागराला नारळ आर्पण केला. नारळी पौर्णिमेच्या दिवशी सागराला नारळ अर्पण करून कोळी बांधव होडय़ा सागरात लोटतात. पावसाळ्यात दोन महिने बंद असलेला मासेमारी व्यवसाय पुन्हा सुरू करतात. त्यामुळे नारळी पौर्णिमेच्या सणाला कोळी समुदायात विशेष महत्त्व असते. मात्र पावसाचे संपूर्ण वेळापत्रकच गेल्या काही वर्षांत बदलू लागल्याने पोर्णिमेच्या पूर्वीच मासेमारीसाठी नौका समुद्रात शिरल्या आहेत. त्यामुळे समुद्राला नारळ अर्पण करून मासेमारीला सुरुवात करण्याचा प्रघात आता केवळ औपचारिकतेपुरता उरला आहे.

नारळी पौर्णिमेला कोळी समाजामध्ये अत्यंत मानाचे स्थान असून उपजीविकेचे साधन असलेल्या समुद्राप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा सण मानला जातो. पावसाळ्याच्या दिवसांत सोसाटय़ाच्या वाऱ्यांमुळे समुद्र खवळलेला असतो. तसेच हा काळ मत्स्यप्रजननाचाही असतो. खवळलेला समुद्र श्रावण महिन्यात नारळी पौर्णिमेनंतर शांत होत असतो. त्यामुळे नारळी पौर्णिमेला समुद्राला नारळ अर्पण करून त्याची मनोभावे पूजा करून मासेमारीच्या होडय़ा दर्यात लोटल्या जातात. या परंपरेमुळे तसेच खराब हवामानामुळे पावसाळ्यातील दोन महिने मासेमारी बंद असते. मात्र पावसाच्या बदलत्या वेळापत्रकामुळे गेल्या काही वर्षांत ही प्रथा कालबाह्य़ होऊ लागली आहे. गेल्या काही वर्षांपासून जून, जुलैपेक्षाही ऑगस्ट मध्ये पावसाचे प्रमाण जास्त असल्याचे आढळून आले आहे.यंदाही आतापर्यंत पावसाचे प्रमाण उत्तम आहे. त्यामुळे समुद्रही शांत आहे. परिणामी नारळी पौर्णिमेपूर्वीच मच्छीमारांनी मासेमारीसाठी समुद्रात प्रवेश केल्याचे दिसून येते. समुद्र शांत असेल त्याच वेळी कोळी बांधव समुद्रात जाऊन मासेमारी करू लागले आहेत.पौर्णिमेला मात्र जल्लोष

नारळी पौर्णिमेचे व्यावसायिक महत्त्व कमी झाले असले तरी या उत्सवाचा उत्साह अजिबात ओसरलेला नाही. जिल्ह्यांतील कोळीवाडय़ांत आजही नारळी पौर्णिमा दणक्यात साजरी केली जाते. दर्याराजाला पारंपरिक नारळ अर्पण करण्याचा कार्यक्रम पार पडतो. त्यानंतर नारळ फोडण्याच्या स्पर्धेला सुरुवात होते. परिसरातील सुमारे 200 पेक्षा अधिक कोळी कुटूंब त्यातउपस्थित राहतात, अशी माहिती राजू बानकर यांनी दिली.नारळ सागराला अर्पण करायाला निघताना मिरवणूकीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये, तसेच कोणताही कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी मिरवणूक तसेच समुद्रात नारळ अर्पण करण्याच्यावेळी योग्य तो पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला. यावेळी पोलिस अधिकारी, पोलिस कर्मचारी बिटमार्शल व दामिनी पथकाचा समावेश होता.जिल्ह्यातील समुद्र किनाऱ्यांवर आज कोळी बांधवांनी पारंपारीकतेची कास धरीत नारळी पोर्णिमेनिमित्त नारळ डोक्यावर घेत मिरवणूक काढली होती. त्यानंतर विधीवत पुजा करीत हा नारळ सागराला अर्पण केला. अगदी शिस्तबध्दपणे नियोजन असल्याने कोठेही अनुचित प्रकार घडला नाही. तसेच मिरवणूकी दरम्यान कुठेही ट्रफीक अथवा बाचाबाची होऊ नये म्हणून पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

 - सोमनाथ घार्गे, जिल्हा पोलिस अधिक्षक.