शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

जी-२० शिखर परिषदेच्या बैठकांना १२ ते १५ डिसेंबरपासून एलिफंटा बेटापासून सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2022 22:21 IST

वर्षभरात देशातील युनेस्कोच्या ४० जागतिक वारसा लाभलेल्या पर्यटन स्थळांना भेटी देणार 

मधुकर ठाकूरउरण :  एक डिसेंबरपासून पुढील वर्षभरासाठी भारत जी-२० देशाचे अध्यक्षपद भूषविणार आहे. वर्षभराच्या कार्यक्रमाअंतर्गत जी-२० शिखर परिषदेचे प्रतिनिधी भारतीय पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांसह वर्षभरात देशातील युनोस्कोच्या ४० जागतिक वारसा लाभलेल्या पर्यटन स्थळांना भेटी देणार आहेत. बैठका घेऊन आपला राष्ट्रीय मूर्त वारसा जगासमोर योग्य पद्धतीने दाखविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. याची सुरुवात १२ ते १५ डिसेंबरपासून वर्ल्ड हेरिटेज यादीत समावेश असलेल्या महाराष्ट्रातील  जागतिक प्रसिद्धीच्या एलिफंटा लेण्यांपासून करण्यात येणार असल्याची माहिती भारतीय पुरातत्व सर्व्हेक्षण मुंबई विभागाचे अधिक्षक डॉ. राजेंद्र यादव यांनी दिली.

देशातील देशातील ४० एएसआय स्मारकांना युनेस्कोचा जागतिक वारसा लाभला आहे. ही स्मारके देशाच्या वैविध्यपूर्ण मूर्त वारसा म्हणून जी-२० शिखर परिषदेचे प्रतिनिधींसाठी मुख्य आकर्षण असणार आहेत. या वर्षात जी-२० शिखर परिषदेच्या देशांचे अध्यक्षपद भारत भूषवत आहे. भारतीय प्रतिनिधींच्या मार्गदर्शनाखाली देशभरातील ४० जागतिक वारसा लाभलेल्या पर्यटन स्थळांना भेटी देणार आहेत. या भेटी दरम्यान बैठका घेऊन आपला राष्ट्रीय मूर्त वारसा जगासमोर योग्य पद्धतीने दाखविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहेत.

याची सुरुवात १२ ते १५ डिसेंबरपासून वर्ल्ड हेरिटेज यादीत समावेश असलेल्या जागतिक प्रसिद्धीच्या एलिफंटा लेण्यांपासून करण्यात येणार आहे. एलिफंटा बेटावर सलग तीन दिवस चालणाऱ्या या शिखर परिषदेत भारतीय पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांसह शिखर परिषदेचे प्रतिनिधीही सहभागी होणार आहेत.

त्यानंतर १६-१७ जानेवारीला महाराष्ट्रातील पुणे येथील आगाखान पॅलेस, शनिवारवाडा, शिवनेरी किल्ला व १३-१४ फेब्रुवारी रोजी अजंठा लेणी, एलोरा लेण्यांना भेटी देणार आहेत. वर्षभरात देशातील गुजरात, कर्नाटक, मध्यप्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, दिल्ली, तामिळनाडू, आंध्रप्रदेश, केरळ,तेलंगणा, बिहार, ओडिशा, गोवा,दिव,लडाख आदी राज्यांतील वर्ल्ड हेरिटेज यादीतील पर्यटन स्थळांना भेटी देणार असल्याची माहिती भारतीय पुरातत्व सर्व्हेक्षण मुंबई विभागाचे अधिक्षक डॉ.राजेंद्र यादव यांनी दिली.

टॅग्स :Indiaभारत