शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
3
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
4
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
5
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
6
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
7
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
8
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
9
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
10
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
11
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
12
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
13
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट
14
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
15
पत्नीचा विरह सहन होईना! घटस्फोटानंतर पतीनं जेवण सोडलं; ३० दिवस फक्त बिअर पिऊन जगला, मग जे घडले...
16
Nag Panchami 2025: नागपंचमीला उघडतो मंदिराचा तिसरा दरवाजा; काय दडले आहे तिथे?
17
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
18
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
19
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
20
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी

जी-२० शिखर परिषदेच्या बैठकांना १२ ते १५ डिसेंबरपासून एलिफंटा बेटापासून सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2022 22:21 IST

वर्षभरात देशातील युनेस्कोच्या ४० जागतिक वारसा लाभलेल्या पर्यटन स्थळांना भेटी देणार 

मधुकर ठाकूरउरण :  एक डिसेंबरपासून पुढील वर्षभरासाठी भारत जी-२० देशाचे अध्यक्षपद भूषविणार आहे. वर्षभराच्या कार्यक्रमाअंतर्गत जी-२० शिखर परिषदेचे प्रतिनिधी भारतीय पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांसह वर्षभरात देशातील युनोस्कोच्या ४० जागतिक वारसा लाभलेल्या पर्यटन स्थळांना भेटी देणार आहेत. बैठका घेऊन आपला राष्ट्रीय मूर्त वारसा जगासमोर योग्य पद्धतीने दाखविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. याची सुरुवात १२ ते १५ डिसेंबरपासून वर्ल्ड हेरिटेज यादीत समावेश असलेल्या महाराष्ट्रातील  जागतिक प्रसिद्धीच्या एलिफंटा लेण्यांपासून करण्यात येणार असल्याची माहिती भारतीय पुरातत्व सर्व्हेक्षण मुंबई विभागाचे अधिक्षक डॉ. राजेंद्र यादव यांनी दिली.

देशातील देशातील ४० एएसआय स्मारकांना युनेस्कोचा जागतिक वारसा लाभला आहे. ही स्मारके देशाच्या वैविध्यपूर्ण मूर्त वारसा म्हणून जी-२० शिखर परिषदेचे प्रतिनिधींसाठी मुख्य आकर्षण असणार आहेत. या वर्षात जी-२० शिखर परिषदेच्या देशांचे अध्यक्षपद भारत भूषवत आहे. भारतीय प्रतिनिधींच्या मार्गदर्शनाखाली देशभरातील ४० जागतिक वारसा लाभलेल्या पर्यटन स्थळांना भेटी देणार आहेत. या भेटी दरम्यान बैठका घेऊन आपला राष्ट्रीय मूर्त वारसा जगासमोर योग्य पद्धतीने दाखविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहेत.

याची सुरुवात १२ ते १५ डिसेंबरपासून वर्ल्ड हेरिटेज यादीत समावेश असलेल्या जागतिक प्रसिद्धीच्या एलिफंटा लेण्यांपासून करण्यात येणार आहे. एलिफंटा बेटावर सलग तीन दिवस चालणाऱ्या या शिखर परिषदेत भारतीय पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांसह शिखर परिषदेचे प्रतिनिधीही सहभागी होणार आहेत.

त्यानंतर १६-१७ जानेवारीला महाराष्ट्रातील पुणे येथील आगाखान पॅलेस, शनिवारवाडा, शिवनेरी किल्ला व १३-१४ फेब्रुवारी रोजी अजंठा लेणी, एलोरा लेण्यांना भेटी देणार आहेत. वर्षभरात देशातील गुजरात, कर्नाटक, मध्यप्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, दिल्ली, तामिळनाडू, आंध्रप्रदेश, केरळ,तेलंगणा, बिहार, ओडिशा, गोवा,दिव,लडाख आदी राज्यांतील वर्ल्ड हेरिटेज यादीतील पर्यटन स्थळांना भेटी देणार असल्याची माहिती भारतीय पुरातत्व सर्व्हेक्षण मुंबई विभागाचे अधिक्षक डॉ.राजेंद्र यादव यांनी दिली.

टॅग्स :Indiaभारत