शहरं
Join us  
Trending Stories
1
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
2
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
3
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
4
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
5
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
6
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
7
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
8
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
9
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
10
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
11
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
12
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
13
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
14
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
15
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
16
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
17
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
18
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
19
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
20
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला

शर्यतीतले बैल आगीत हंबरडा फोडत होते; महाडमधील वहूर येथील हृदयद्रावक घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2023 07:29 IST

आगीची  तीव्रता इतकी होती की, त्यांना सोडविण्यासही अवधी मिळाला नाही.

महाड :  महाड तालुक्यातील वहूर या गावात शनिवारी मध्यरात्री एका गुरांच्या गोठ्याला आग लागून  जळून खाक झाला. त्यामध्ये  शर्यतीसाठी वापरले जाणारे चार बैल होरपळून जागीच ठार झाले. आगीने वेढल्याने बैल हंबरडा फोडत होते, मात्र, आग भडकतच गेल्यामुळे ग्रामस्थ हतबल होते. दरम्यान, आग लागण्याचे नेमके कारण स्पष्ट झालेले नसून शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असण्याची शक्यता व्यक्त होत आहे.  

महाड तालुक्यातील वहूर या गाव हद्दीत झटाम मोहल्ल्यामध्ये  सधन शेतकरी रफीक मोहमद सईद झटाम यांच्या राहत्या घराच्या शेजारी त्यांच्या  गुरांचा गोठा आहे. शनिवारी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास अचानक त्याला आग लागली. काही वेळातच आगीने रौद्ररुप धारण केले आणि संपूर्ण गोठा जळून खाक झाला. त्यामध्ये बांधलेले चार बैल आगीने वेढले गेले. त्यामध्ये होरपळून त्यांचा जागीच मृत्यू झाला.

आगीची  तीव्रता इतकी होती की, त्यांना सोडविण्यासही अवधी मिळाला नाही. जनावरांच्या हंबरण्याचा आवाज संपूर्ण परिसरात घुमला. ग्रामस्थांनी मिळेल त्या साहित्यातून पाणी घेत गोठ्यावर मारा केला. अखेर   महाड नगरपालिका आणि महाड एमआयडीसीच्या अग्निशमन दलाला या ठिकाणी पाचारण करावे लागले. दोन तासांच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली.  या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

दहा लाखांच्या दोन बैलजोडी

चारही बैल खास शर्यतीसाठीचे होते.  त्यातील एकजोडी समुद्रकिनारी धावणारी तर दुसरी जोडी माती बंदराला धावणारी होती. रफिक झटाम यांनी एक जोडी कर्नाटकमधून खरेदी केली होती तर एक जोडी अलिबागमधून. त्यांची किंमत सुमारे १० लाखांवर होती, असे त्यांनी सांगितले. आगीत गोठ्यातील अन्य चार लाखांचे साहित्य जळून खाक झाल्याचे पंचनाम्यात नमूद करण्यात आले.

टॅग्स :Raigadरायगडfireआग