शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

शर्यतीतले बैल आगीत हंबरडा फोडत होते; महाडमधील वहूर येथील हृदयद्रावक घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2023 07:29 IST

आगीची  तीव्रता इतकी होती की, त्यांना सोडविण्यासही अवधी मिळाला नाही.

महाड :  महाड तालुक्यातील वहूर या गावात शनिवारी मध्यरात्री एका गुरांच्या गोठ्याला आग लागून  जळून खाक झाला. त्यामध्ये  शर्यतीसाठी वापरले जाणारे चार बैल होरपळून जागीच ठार झाले. आगीने वेढल्याने बैल हंबरडा फोडत होते, मात्र, आग भडकतच गेल्यामुळे ग्रामस्थ हतबल होते. दरम्यान, आग लागण्याचे नेमके कारण स्पष्ट झालेले नसून शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असण्याची शक्यता व्यक्त होत आहे.  

महाड तालुक्यातील वहूर या गाव हद्दीत झटाम मोहल्ल्यामध्ये  सधन शेतकरी रफीक मोहमद सईद झटाम यांच्या राहत्या घराच्या शेजारी त्यांच्या  गुरांचा गोठा आहे. शनिवारी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास अचानक त्याला आग लागली. काही वेळातच आगीने रौद्ररुप धारण केले आणि संपूर्ण गोठा जळून खाक झाला. त्यामध्ये बांधलेले चार बैल आगीने वेढले गेले. त्यामध्ये होरपळून त्यांचा जागीच मृत्यू झाला.

आगीची  तीव्रता इतकी होती की, त्यांना सोडविण्यासही अवधी मिळाला नाही. जनावरांच्या हंबरण्याचा आवाज संपूर्ण परिसरात घुमला. ग्रामस्थांनी मिळेल त्या साहित्यातून पाणी घेत गोठ्यावर मारा केला. अखेर   महाड नगरपालिका आणि महाड एमआयडीसीच्या अग्निशमन दलाला या ठिकाणी पाचारण करावे लागले. दोन तासांच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली.  या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

दहा लाखांच्या दोन बैलजोडी

चारही बैल खास शर्यतीसाठीचे होते.  त्यातील एकजोडी समुद्रकिनारी धावणारी तर दुसरी जोडी माती बंदराला धावणारी होती. रफिक झटाम यांनी एक जोडी कर्नाटकमधून खरेदी केली होती तर एक जोडी अलिबागमधून. त्यांची किंमत सुमारे १० लाखांवर होती, असे त्यांनी सांगितले. आगीत गोठ्यातील अन्य चार लाखांचे साहित्य जळून खाक झाल्याचे पंचनाम्यात नमूद करण्यात आले.

टॅग्स :Raigadरायगडfireआग