शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

चिरनेर जंगल सत्याग्रहाचा ९३ वा हुतात्मा दिन अगदी साधेपणाने साजरा होणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2023 16:30 IST

वारंवार उद्भवणारी पुरपरिस्थिती, विकासाचा अभावामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांचा ग्रामसभेत निर्णय

-मधुकर ठाकूर 

उरण : चिरनेर ग्रामपंचायतीच्या हद्दीत वारंवार उद्भवणारी पुरपरिस्थिती आणि विकासाच्या कामांकडे सातत्याने शासकीय यंत्रणांकडून होणाऱ्या दुर्लक्षामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी दरवर्षी २५ सप्टेंबर रोजी साजरा करण्यात येणारा चिरनेर जंगल सत्याग्रहाचा ९३ वा हुतात्मा दिन अगदी साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय ग्रामसभेत घेण्यात आला असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.

देशातील स्वातंत्र्य संग्रामातील २५ सप्टेंबर १९३० साली ऐतिहासिक चिरनेर जंगल सत्याग्रह इतिहासातील सुवर्ण पान म्हणून ओळखले जाते.या ऐतिहासिक चिरनेर जंगल सत्याग्रहात शांततेत सुरू असलेल्या या आंदोलनात सहभागी झालेल्या आंदोलनकर्त्यावर जुलमी ब्रिटिश सरकारने  बेछूट गोळीबार केला होता.या गोळीबारात या गोळीबारात धाकू बारक्या फोफेरकर, नाग्या महादू कातकरी ( चिरनेर ), रघुनाथ मोरेश्वर न्हावी ( कोप्रोली ), रामा बामा कोळी (मोठी जुई), आनंदा माया पाटील (धाकटी जुई), परशुराम रामा पाटील ( पाणदिवे ), हसूराम बुधाजी घरत ( खोपटा ), आलू बेमट्या म्हात्रे ( दिघोडे ), नाग्या महादू कातकरी आदी आठ आंदोलकांनी हौतात्म्य पत्करले होते.

देशाच्या स्वातंत्र्य संग्रामात गौरवशाली इतिहास, हौतात्म्यांचे स्मरण करण्यासाठी आणि नव्या पिढीलाही इतिहास ज्ञात व्हावा यासाठी दरवर्षी २५ सप्टेंबर रोजी चिरनेर येथील हुतात्मा स्मारकासमोरच हुतात्म्य दिन साजरा केला जातो.यावेळी हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यात येते.हवेत बंदुकीच्या फैरी झाडून शासकीय मानवंदना दिली जाते. 

 मात्र ऐतिहासिक चिरनेर गाव विकासांच्या कामांपासून कोसो दूर आहे.आता तर धनदांडग्यांनी रस्ते, नाले आणि गावातील हद्दीत ठिकठिकाणी केलेल्या वाढत्या बेकायदेशीर अतिक्रमणे व बांधकामांमुळे चिरनेर गावात दरवर्षी पुरजन्य परिस्थिती निर्माण होते.मात्र ग्रामस्थांच्या तक्रारींनंतरही याकडे शासकीय यंत्रणेकडून पुर्णपणे दुर्लक्षच केले जात आहे.यामुळे मात्र चिरनेर गावात दरवर्षी पुरजन्य परिस्थिती निर्माण होऊ लागली आहे.यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी १४ सप्टेंबर रोजी झालेल्या ग्रामसभेत शासकीय यंत्रणेवर रोष व्यक्त करण्यात आला.

याप्रसंगी प्रशासक विकास  मिंडे , ग्रामविकास अधिकारी महेश पवार, पोलीस पाटील संजय पाटील, चिरनेर गाव तंटामुक्तीचे अध्यक्ष अलंकार परदेशी, शेकापचे सुरेश पाटील,  सामाजिक कार्यकर्ते सचिन घबाडी, जयेश खारपाटील, समाधान म्हात्रे, समीर डुंगीकर तसेच अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.शासकीय यंत्रणेवर दोषारोप करतानाच यावेळी चिरनेर जंगल सत्याग्रहाचा ९३ वा हुतात्मा दिन मान्यवरांच्या उपस्थितीत अगदी साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय ग्रामसभेत ग्रामस्थांनी घेतला असल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली.

टॅग्स :Raigadरायगड