शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
7
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
8
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

चिरनेर जंगल सत्याग्रहाचा ९३ वा हुतात्मा दिन अगदी साधेपणाने साजरा होणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2023 16:30 IST

वारंवार उद्भवणारी पुरपरिस्थिती, विकासाचा अभावामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांचा ग्रामसभेत निर्णय

-मधुकर ठाकूर 

उरण : चिरनेर ग्रामपंचायतीच्या हद्दीत वारंवार उद्भवणारी पुरपरिस्थिती आणि विकासाच्या कामांकडे सातत्याने शासकीय यंत्रणांकडून होणाऱ्या दुर्लक्षामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी दरवर्षी २५ सप्टेंबर रोजी साजरा करण्यात येणारा चिरनेर जंगल सत्याग्रहाचा ९३ वा हुतात्मा दिन अगदी साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय ग्रामसभेत घेण्यात आला असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.

देशातील स्वातंत्र्य संग्रामातील २५ सप्टेंबर १९३० साली ऐतिहासिक चिरनेर जंगल सत्याग्रह इतिहासातील सुवर्ण पान म्हणून ओळखले जाते.या ऐतिहासिक चिरनेर जंगल सत्याग्रहात शांततेत सुरू असलेल्या या आंदोलनात सहभागी झालेल्या आंदोलनकर्त्यावर जुलमी ब्रिटिश सरकारने  बेछूट गोळीबार केला होता.या गोळीबारात या गोळीबारात धाकू बारक्या फोफेरकर, नाग्या महादू कातकरी ( चिरनेर ), रघुनाथ मोरेश्वर न्हावी ( कोप्रोली ), रामा बामा कोळी (मोठी जुई), आनंदा माया पाटील (धाकटी जुई), परशुराम रामा पाटील ( पाणदिवे ), हसूराम बुधाजी घरत ( खोपटा ), आलू बेमट्या म्हात्रे ( दिघोडे ), नाग्या महादू कातकरी आदी आठ आंदोलकांनी हौतात्म्य पत्करले होते.

देशाच्या स्वातंत्र्य संग्रामात गौरवशाली इतिहास, हौतात्म्यांचे स्मरण करण्यासाठी आणि नव्या पिढीलाही इतिहास ज्ञात व्हावा यासाठी दरवर्षी २५ सप्टेंबर रोजी चिरनेर येथील हुतात्मा स्मारकासमोरच हुतात्म्य दिन साजरा केला जातो.यावेळी हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यात येते.हवेत बंदुकीच्या फैरी झाडून शासकीय मानवंदना दिली जाते. 

 मात्र ऐतिहासिक चिरनेर गाव विकासांच्या कामांपासून कोसो दूर आहे.आता तर धनदांडग्यांनी रस्ते, नाले आणि गावातील हद्दीत ठिकठिकाणी केलेल्या वाढत्या बेकायदेशीर अतिक्रमणे व बांधकामांमुळे चिरनेर गावात दरवर्षी पुरजन्य परिस्थिती निर्माण होते.मात्र ग्रामस्थांच्या तक्रारींनंतरही याकडे शासकीय यंत्रणेकडून पुर्णपणे दुर्लक्षच केले जात आहे.यामुळे मात्र चिरनेर गावात दरवर्षी पुरजन्य परिस्थिती निर्माण होऊ लागली आहे.यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी १४ सप्टेंबर रोजी झालेल्या ग्रामसभेत शासकीय यंत्रणेवर रोष व्यक्त करण्यात आला.

याप्रसंगी प्रशासक विकास  मिंडे , ग्रामविकास अधिकारी महेश पवार, पोलीस पाटील संजय पाटील, चिरनेर गाव तंटामुक्तीचे अध्यक्ष अलंकार परदेशी, शेकापचे सुरेश पाटील,  सामाजिक कार्यकर्ते सचिन घबाडी, जयेश खारपाटील, समाधान म्हात्रे, समीर डुंगीकर तसेच अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.शासकीय यंत्रणेवर दोषारोप करतानाच यावेळी चिरनेर जंगल सत्याग्रहाचा ९३ वा हुतात्मा दिन मान्यवरांच्या उपस्थितीत अगदी साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय ग्रामसभेत ग्रामस्थांनी घेतला असल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली.

टॅग्स :Raigadरायगड