शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
3
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
4
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
5
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
6
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
7
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
8
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
9
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
10
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
11
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
12
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
13
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
14
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
15
भारताकडून पाकिस्तानचा गोल्ड मेडिलिस्ट अर्शद नदीमचे इंस्टाग्राम अकाऊंट ब्लॉक!
16
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
17
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
18
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
19
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
20
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे

उरणच्या खोपटा पुलावर लिहिला दहशतवाद्यांशी संबंधित मजकूर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2019 03:24 IST

समुद्रात गस्त वाढवली : सुरक्षा यंत्रणेला सतर्क राहण्याचे आदेश

उरण : तालुक्यातील खोपटा पुलाच्या एका खांबावर दहशतवाद्यांशी संबंधित मजकूर आणि काही आकृत्या काढल्याचे आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. मजकुरामध्ये ‘इसिस’, तसेच दहशतवादी अबू-बकर-अल-बगदादीचा उल्लेख असल्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे. रविवारी उरण पोलिसांना माहिती याबाबत मिळाल्यानंतर, चौकशी आणि तपास सुरू करण्यात आल्याची माहिती व.पो.नि. जगदीश कुलकर्णी यांनी दिली.

उरण तालुक्यात ओएनजीसी, नौदलाचे शस्त्रागार, जेएनपीटी, विद्युत केंद्र असे संवेदनशील व महत्त्वाचे प्रकल्प असल्याने या संदेशाला महत्त्व प्राप्त झाले आहे. काळ्या रंगाच्या मार्करने तीन भागांत हे संदेश लिहिले आहेत. यात ‘धोनी जन्नत मे आउट’ असा उल्लेख असून, ‘आम आदमी पार्टी’, ‘केजरीवाल’, ‘हाफिज सईद’, ‘रहिम कटोरी’, ‘राम कटोरी’ अशी नावे लिहिली गेली आहेत, तसेच देवनागरी व इंग्रजी भाषेत सांकेतिक आकडे लिहिले आहेत.

पुलाच्या खांबावर एक आकृती काढली असून, त्यामध्ये इम्पोर्ट-एक्सपोर्ट जहाजे, बंदर (जेएनपीटी), विमानतळ, पेट्रोल पंप दाखविण्यात आले आहेत, तर दुसऱ्या एका आकृतीत कुर्ला, गोरखपूर असा उल्लेख करण्यात आलेला आहे. हस्ताक्षरावरून आणि मजकुरातील भाषेवरून हा मजकूर स्थानिकांनी लिहिला नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

याबाबत सगळ्या शक्यता तपासून पाहत असून, त्या दिशेने तपास सुरू करण्यात आला आहे. दरम्यान, काही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. सुरक्षिततेची उपाययोजना म्हणून समुद्रात गस्त वाढविण्यात आली आहे. सुरक्षा यंत्रणेला सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या असल्याची माहिती उरण पोलीस ठाण्याचे व.पो.नि जगदीश कुलकर्णी यांनी दिली.

टॅग्स :terroristदहशतवादीPoliceपोलिस