शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
2
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
3
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
4
डोनाल्ड ट्रम्प यांचा H-1B व्हिसा बॉम्ब होणार बॅकफायर, अमेरिकेचंच होणार नुकसान, तर भारताचा...
5
तुमचा पुण्यातील रोजचा प्रवास ३५ किमी आहे, तर तुम्ही कोणती स्कूटर, मोटरसायकल घ्यावी? 
6
परदेशात फिरायला जाणाऱ्या प्रवाशांनी शोधली 'ही' नवीन युक्ती; नेमका काय आहे 'फ्लाइंग नेकेड ट्रेंड'?
7
आयडियाची कल्पना! "मला १०० रुपये द्या ना...", गाडी खरेदी करण्यासाठी महिलेचा 'कारनामा'
8
ट्रम्प यांच्या एका निर्णयाने अमेरिकेतील भारतीयांची धाकधूक वाढली; मायक्रोसॉफ्टने कर्मचाऱ्यांना पाठवला तातडीचा ईमेल
9
सर्वार्थ सिद्धी योगात सर्वपित्री अमावास्या २०२५: श्राद्ध विधीचा शुभ मुहूर्त; महत्त्व-मान्यता
10
परदेशी पाहुण्यांशी असलं वागणं शोभतं का? 'टपोरी' मुलाच्या Viral Video वर नेटकरी संतापले
11
Navratri 2025: नवरात्रीला घटस्थापना कशी करावी? जाणून घ्या साहित्य, मुहूर्त आणि शास्त्रोक्त विधी!
12
निलेश साबळेनेच मला बाईचं कॅरेक्टर करायला सांगितलं होतं, भाऊ कदमचा खुलासा
13
भूपतीचा शस्त्रसंधीचा प्रस्ताव, जगन म्हणतो शस्त्र ठेवणार नाही ! माओवादी संघटनेतील वाद चव्हाट्यावर
14
अमेरिकेत करिअरचे दार उघडणारा H-1B व्हिसा काय आहे? कोणाला मिळतो? जाणून घ्या संपूर्ण माहिती...
15
पुढच्या आठवड्यात येणार IPO चा पाऊस, २२ आयपीओंमध्ये मिळणार गुंतवणूकीची संधी; कोणत्या आहेत कंपन्या?
16
हृदयस्पर्शी! "आई-वडिलांना सोडून मुलगी गेली लंडनला"; ८० वर्षांचे आजोबा ट्रेनमध्ये विकतात पदार्थ
17
हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार
18
GST Rate Cut: ५०% सूट, ८०% सूट... कपडे आणि बुटांच्या दुकांनावर आता अशा ऑफर्स दिसणार नाहीत! GST कपातीशी संबंध काय?
19
Hanuman Temple: 'या' मंदिरात हनुमान निद्रावस्थेत, तरीही केवळ दर्शनाने पूर्ण होते भक्तांची प्रत्येक इच्छा 
20
Vivo Y50i: झटक्यात चार्ज होणार आणि दिर्घकाळ चालणार; विवोचा बजेट स्मार्टफोन बाजारात!

शेतकऱ्यांच्या लढ्याला दहा वर्षांनी यश; टाटा पॉवरसाठी अतिरिक्त भूमी संपादन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2018 01:56 IST

संमती न दिलेल्या शहापूर-धेरंडमधील शेतकऱ्यांची ८७ हेक्टर जमीन मिळणार परत

- जयंत धुळप अलिबाग : सरकारच्या भूमी संपादनाच्या बेकायदा व चुकीच्या धोरणाविरुद्ध अलिबाग तालुक्यातील शहापूर-धेरंड परिसरातील ४९६ शेतकºयांनी श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली लढा पुकारला होता. तब्बल तीन हजार ७१० दिवसांनी (जवळपास १० वर्षे) शेतकºयांनी ही लढाई जिंकली आहे. शेतकºयांच्या ८७ हेक्टर आर इतक्या गरजेपेक्षा अतिरिक्त(जास्त) शेतजमिनीचे भूमी संपादन सरकारने केल्याचे सिद्ध करण्यात शेतकºयांना यश आले आहे. परिणामी, आता भूमी संपादनास हरकती घेऊन संमती न दिलेल्या शेतकºयांच्या जमिनी त्यांना परत मिळणार असल्याची माहिती श्रमिक मुक्ती दलाचे रायगड जिल्हा समन्वयक राजन भगत यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली आहे.टाटा पॉवर १६०० मे. वॅटच्या प्रकल्पासाठी किमान जमीन किती हे केंद्रीय विद्युत प्राधिकरणच ठरवू शकते, हे रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या निदर्शनात आणून दिले. त्यानंतर तत्काळ टाटा पॉवरच्या १६०० मे. वॅटच्या प्रकल्पासाठी किमान जागेची खातरजमा करण्याचे आदेश १८ एप्रिल २०१८ रोजी अलिबाग उपविभागीय महसूल अधिकारी यांना देण्यात आले. त्यानुसार कार्यवाही होऊन २९ जून २०१८ रोजी महाराष्ट्र राज्य विद्युत निर्मिती विभागाचे कार्यकारी संचालक प्रदीप शिंगाडे यांनी टाटा पॉवरच्या १६०० मे. वॅट प्रकल्पासाठी ३०० हेक्टर जमिनीची आवश्यकता असल्याचे लेखी पत्र दिले, त्यामुळे ८७ हेक्टर जमिनीचे अतिरिक्त (जादा) भूसंपादन झाल्याचे सिद्ध झाले आहे.अलिबाग तालुक्यातील शहापूर-धेरंड परिसरात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) यांच्या माध्यमातून टाटा पॉवर कंपनीच्या औष्णिक वीज निर्मिती प्रकल्पाकरिता दोन्ही गावांतील ४९६ शेतकºयांच्या ४०१-९३ हेक्टर आर शेतजमिनीचे खासगी भूमी संपादन, तर ५९-५८ हेक्टर आर शेतजमिनीचे शासकीय भूमी संपादन केले. त्यास शेतकºयांनी २० एप्रिल २००८ रोजी हरकती दाखल केल्या व आवश्यकतेनुसारच जमीन हस्तांतर करावी, असे सूचित केले होते.भूमी संपादनाबाबत तत्कालीन विशेष भूसंपादन अधिकारी जयकृष्ण फड यांनी शासनाला ७ एप्रिल २००७ ची आकडेवारी पुरवून दिशाभूल केली. या त्यांच्या कृतीविरोधात २ आक्टोबर २००८ रोजी एक हजार शेतकºयांनी अलिबाग ते मंत्रालय पायी लाँग मार्च काढला. ८ आॅक्टोबर २००८ रोजी चेंबूर येथे तत्कालीन उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांनी घेतलेल्या बैठकीत ‘टाटा पॉवर प्रकल्पासाठी भूसंपादन अंतिम करण्यापूर्वी कमीत कमी किती हेक्टर जमिनीची आवश्यकता आहे, या बाबत तपासणी करून घेण्याविषयी रायगडच्या जिल्हाधिकाºयांना आदेश दिले होते. मात्र, जिल्हाधिकाºयांनी ऊर्जा विभागाकडून आवश्यक किमान जमिनीची खातरजमा केली नाही आणि १५ आॅक्टोबर २००९ रोजी एमआयडीसीने भूसंपादन अंतिम केले. याबाबत श्रमिक मुक्ती दलाने २०० हून अधिक पत्रे शासनास दिली, तर विविध प्रकारची किमान १६ आंदोलने केली होती.प्रत्यक्षात प्रकल्प १६०० मे. वॅटचा, दाखवला २४०० चाटाटा पॉवरचा वीज प्रकल्प प्रत्यक्षात १६०० मे. वॅट क्षमतेचा आहे. केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने देखील १६०० मे. वॅट प्रकल्पास परवानगी दिलेली असताना हा प्रकल्प २४०० मे. वॅटचा दाखवून शेतकºयांच्या अतिरिक्त (जादा) जमिनीचे संपादन केले. २१ आॅक्टोबर २०१३ रोजी एमआयडीसी कायद्यान्वये ही शेतजमीन एमआयडीसीला हस्तांतरित करण्यापूर्वी देखील टाटा पॉवरच्या १६०० मे. वॅट प्रकल्पासाठी किमान किती जमीन लागते, याची खातरजमा करण्याची विनंती शेतकºयांनी केली होती. मात्र, १२ जून २०१७ रोजी खासगी जमिनीपैकी ३८७.७७.५० हेक्टर आर इतके क्षेत्र अंतिमत: संपादन केल्याचे पत्र तत्कालीन अलिबाग उपविभागीय महसूल अधिकाºयांनी श्रमिक मुक्ती दलास दिले होते.

टॅग्स :TataटाटाFarmerशेतकरी