शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
2
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
3
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
4
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर
5
ऑफिसला न जाताच कर्मचाऱ्याला मिळाले २६ लाख रुपये; कोर्टाने दिला मोठा निर्णय
6
"गोयंकाजी पाहताय ना?’’, इंग्लंडमध्ये पंतच्या फटकेबाजीनंतर फॅन्सनी घेतली लखनौच्या मालकांची शाळा  
7
हनीमुनचा प्लॅन, रसगुल्लामध्ये विष भरले अन्...; बेवफा सोनमपेक्षाही खतरनाक आहे खूनी 'मुस्कान'
8
NSE चा IPO कधी येणार? सेबीचे अध्यक्ष म्हणाले, "आयपीओ आणण्यात कोणताही अडथळा..."
9
Air India Plane Crash: "१४ वर्षांनी घरी लक्ष्मी जन्मली अन् विमान दुर्घटनेत दुर्दैवाने तिलाच गमावले..."
10
गळफास लावलेल्या स्थितीत सापडला भाजपा नेत्याचा मृतदेह, दोरीने बांधलेले होते दोन्ही हात, संशयास्पद मृत्युमुळे खळबळ
11
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
12
८ वर्षांपूर्वी आई गेली, नुकतेच बाबाही गेले; रीमा लागूंच्या वाढदिवसानिमित्त लेकीची भावुक पोस्ट
13
"मी शांततेसाठी कितीही प्रयत्न केले तरी...!"; काँगो-रवांडा शांतता करारानंतर ट्रम्प यांचं दुःख, बोलून दाखवली नोबेल पुरस्काराची इच्छा
14
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
15
पाकिस्तानमध्ये चार हिंदू भावंडांचे अपहरण, जबरदस्तीने धर्म बदलण्यास भाग पाडले; आईकडून न्यायाची मागणी
16
Ashadhi Ekadashi 2025: ईश्वरभेटीची सोपी वाट दाखवणार्‍या गुरुंचे आपल्या आयुष्यातील योगदान जाणून घ्या!
17
अहमदाबादमधील विमान अपघातात वाचलेल्या विश्वासला अभिनेत्रीनं म्हटलं 'खोटारडा', ट्रोल झाल्यावर घेतला युटर्न
18
कर्मचाऱ्याला सॅलरीतून मिळाले १४ कोटी तर झाला अवाक्; नंतर जे काही झालं त्याचा विचारही केला नसेल
19
R Madhavan घरबसल्या कमावणार महिन्याला ६.५ लाख रुपये; भाड्यानं दिला १७.५ कोटींचा फ्लॅट, एकूण किती कमाई करणार?
20
इराणमधील अणुकेंद्रांबाबत ट्रम्प यांचं मोठं विधान, म्हणाले, इस्राइल इराणमधील अणुकेंद्रं... 

गाव-पाड्यांत पाच दिवसांनी टँकर; टंचाईग्रस्त गावांत पाणीपुरवठ्यात अडचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2019 00:15 IST

तालुक्यातील पाणीटंचाईने कळस गाठला असून ग्रामीण आणि आदिवासी पाड्यांतील महिलांना पाण्यासाठी मैलोनमैल भटकंती करावी लागत आहे.

- विजय मांडेकर्जत : तालुक्यातील पाणीटंचाईने कळस गाठला असून ग्रामीण आणि आदिवासी पाड्यांतील महिलांना पाण्यासाठी मैलोनमैल भटकंती करावी लागत आहे. शासनाने सुरू केलेले टँकर पाच ते आठ दिवसांनी टंचाईग्रस्त गावात आणि वाडीत पोहचत असल्याने ग्रामस्थांमधून संताप व्यक्त होत आहे. पाण्याच्या शोधासाठी भटकावे लागत असल्याने त्यांच्या उद्योग व्यवसायावरही परिणाम होत आहे. त्यामुळे आदिवासी बांधवांकडून आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.तालुक्यात पाणीटंचाईची स्थिती गंभीर आहे. त्यामुळे किमान महिनाभर टंचाईग्रस्त भागातील जनतेचे टँकरने पाणी मिळावे म्हणून प्रस्ताव पाठविण्यात आले होते. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने निर्णय घेऊन, तालुक्यात ३ गावे आणि १५ आदिवासी वाड्यांना टँकरचे पाणीपुरवठा करण्यात येईल, असा निर्णय जिल्हाधिकारी यांनी १८ मार्च २०१९ रोजी घेतला. त्यासाठी मनोज ओसवाल यांच्या मालकीचा (एमएच ०२ के ७००२) आणि कान्हू मालू खडके यांच्या मालकीचा ( एमएच ४६ ई ४२३२) टँकरचे अधिग्रहण करण्यात आले आहे. पावसाळा सुरू होईपर्यंत हे दोन्ही टँकर पाणीपुरवठा करण्यासाठी मंजूर करण्यात आले होते. प्रत्यक्षात ४ एप्रिलपासून हे दोन टँकर तालुक्यातील टंचाईग्रस्त मोग्रज, धामणी, पिंगळस या तीन गावांना तसेच १५ आदिवासी वाड्यांना टँकरने पाणी पुरविणार आहे. त्यात भक्ताचीवाडी, भल्याचीवाडी, जांभूळवाडी, मेचकरवाडी, चौधरवाडी, खानंद, सागाचीवाडी, धामणदांड, भूतीवली, बोरीचीवाडी, चिंचवाडी, पालीधनगरवाडी, मोरेवाडी आणि ताडवाडी अशा १५आदिवासी वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा सुरू केला.सरकारी दर परवडत नसल्याने टँकर ठेकेदार आपली वाहने देतो, पण प्रत्यक्ष पाणीपुरवठा करताना वेळेवर करीत नाही. गेल्या महिनाभरात पाणीटंचाई दूर करण्यासाठी शासनाने ज्या गावात - वाड्यात टँकर पाठविण्याचे आदेश दिले आहेत. त्या ठिकाणी १५ आदिवासी वाड्या आणि ४ गावांत टँकर दिवसाआडही गेलेला नाही. टँकर मंजूर झालेल्या आदिवासी वाड्यात कर्जत तालुका आदिवासी ठाकूर कातकरी संघटनेच्या वतीने कार्यकर्ते पाठवून चौकशी सुरू केली. त्यावेळी शासनाकडून पाच ते आठ दिवसातून एकदा पाणीपुरवठा होत असल्याचे उघडकीस आले आहे. यामुळे संतप्त आदिवासी समाजाच्या कर्जत तालुका पदाधिकाऱ्यांनी १४ मेपासून कर्जत तहसील कार्यालयाबाहेर उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.कर्जत तालुक्यात मार्च महिन्यापासून पाणीटंचाईचे दुर्भिक्ष निर्माण झाले आहे. पाणीटंचाई निर्माण झाल्याने टंचाईग्रस्त गावे-वाड्यातील ग्रामस्थांनी टँकरची मागणी करण्यास सुरुवात केली होती. १२ मार्च २०१९ रोजी पहिल्यांदा टँकरची मागणी करणारे प्रस्ताव कर्जत पंचायत समितीकडे पोहचले होते. मार्चअखेर टँकरची मागणी करणाºया प्रस्तावाची संख्या १८ वर गेली.शासनाकडून मूलभूत सुविधाही पुरवल्या जात नाहीत. आम्हाला हक्काचे पाणी देखील शासन देत नसल्याने आम्हाला संविधानाने दिलेल्या अधिकाराप्रमाणे सनदशीर मार्गे आंदोलन करावे लागेल.- जैतू पारधी, अध्यक्ष,आदिवासी ठाकूर कातकरी समाज३ एप्रिलपासून टँकरने पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले असले तरी भोपळेवाडी, जांभूळवाडी, मॉग्रेज ग्रामपंचायतीमधील नंदकरपाडा येथे टँकर द्यावेत, असा प्रस्ताव प्रलंबित आहे.

गाव-पाड्यांत पाच दिवसांनी टँकर; टंचाईग्रस्त गावांत पाणीपुरवठ्यात अडचणी- विजय मांडेकर्जत : तालुक्यातील पाणीटंचाईने कळस गाठला असून ग्रामीण आणि आदिवासी पाड्यांतील महिलांना पाण्यासाठी मैलोनमैल भटकंती करावी लागत आहे. शासनाने सुरू केलेले टँकर पाच ते आठ दिवसांनी टंचाईग्रस्त गावात आणि वाडीत पोहचत असल्याने ग्रामस्थांमधून संताप व्यक्त होत आहे. पाण्याच्या शोधासाठी भटकावे लागत असल्याने त्यांच्या उद्योग व्यवसायावरही परिणाम होत आहे. त्यामुळे आदिवासी बांधवांकडून आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.तालुक्यात पाणीटंचाईची स्थिती गंभीर आहे. त्यामुळे किमान महिनाभर टंचाईग्रस्त भागातील जनतेचे टँकरने पाणी मिळावे म्हणून प्रस्ताव पाठविण्यात आले होते. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने निर्णय घेऊन, तालुक्यात ३ गावे आणि १५ आदिवासी वाड्यांना टँकरचे पाणीपुरवठा करण्यात येईल, असा निर्णय जिल्हाधिकारी यांनी १८ मार्च २०१९ रोजी घेतला. त्यासाठी मनोज ओसवाल यांच्या मालकीचा (एमएच ०२ के ७००२) आणि कान्हू मालू खडके यांच्या मालकीचा ( एमएच ४६ ई ४२३२) टँकरचे अधिग्रहण करण्यात आले आहे. पावसाळा सुरू होईपर्यंत हे दोन्ही टँकर पाणीपुरवठा करण्यासाठी मंजूर करण्यात आले होते. प्रत्यक्षात ४ एप्रिलपासून हे दोन टँकर तालुक्यातील टंचाईग्रस्त मोग्रज, धामणी, पिंगळस या तीन गावांना तसेच १५ आदिवासी वाड्यांना टँकरने पाणी पुरविणार आहे. त्यात भक्ताचीवाडी, भल्याचीवाडी, जांभूळवाडी, मेचकरवाडी, चौधरवाडी, खानंद, सागाचीवाडी, धामणदांड, भूतीवली, बोरीचीवाडी, चिंचवाडी, पालीधनगरवाडी, मोरेवाडी आणि ताडवाडी अशा १५आदिवासी वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा सुरू केला.सरकारी दर परवडत नसल्याने टँकर ठेकेदार आपली वाहने देतो, पण प्रत्यक्ष पाणीपुरवठा करताना वेळेवर करीत नाही. गेल्या महिनाभरात पाणीटंचाई दूर करण्यासाठी शासनाने ज्या गावात - वाड्यात टँकर पाठविण्याचे आदेश दिले आहेत. त्या ठिकाणी १५ आदिवासी वाड्या आणि ४ गावांत टँकर दिवसाआडही गेलेला नाही. टँकर मंजूर झालेल्या आदिवासी वाड्यात कर्जत तालुका आदिवासी ठाकूर कातकरी संघटनेच्या वतीने कार्यकर्ते पाठवून चौकशी सुरू केली. त्यावेळी शासनाकडून पाच ते आठ दिवसातून एकदा पाणीपुरवठा होत असल्याचे उघडकीस आले आहे. यामुळे संतप्त आदिवासी समाजाच्या कर्जत तालुका पदाधिकाऱ्यांनी १४ मेपासून कर्जत तहसील कार्यालयाबाहेर उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.कर्जत तालुक्यात मार्च महिन्यापासून पाणीटंचाईचे दुर्भिक्ष निर्माण झाले आहे. पाणीटंचाई निर्माण झाल्याने टंचाईग्रस्त गावे-वाड्यातील ग्रामस्थांनी टँकरची मागणी करण्यास सुरुवात केली होती. १२ मार्च २०१९ रोजी पहिल्यांदा टँकरची मागणी करणारे प्रस्ताव कर्जत पंचायत समितीकडे पोहचले होते. मार्चअखेर टँकरची मागणी करणाºया प्रस्तावाची संख्या १८ वर गेली.शासनाकडून मूलभूत सुविधाही पुरवल्या जात नाहीत. आम्हाला हक्काचे पाणी देखील शासन देत नसल्याने आम्हाला संविधानाने दिलेल्या अधिकाराप्रमाणे सनदशीर मार्गे आंदोलन करावे लागेल.- जैतू पारधी, अध्यक्ष,आदिवासी ठाकूर कातकरी समाज३ एप्रिलपासून टँकरने पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले असले तरी भोपळेवाडी, जांभूळवाडी, मॉग्रेज ग्रामपंचायतीमधील नंदकरपाडा येथे टँकर द्यावेत, असा प्रस्ताव प्रलंबित आहे.

टॅग्स :Waterपाणी