शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

गाव-पाड्यांत पाच दिवसांनी टँकर; टंचाईग्रस्त गावांत पाणीपुरवठ्यात अडचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2019 00:15 IST

तालुक्यातील पाणीटंचाईने कळस गाठला असून ग्रामीण आणि आदिवासी पाड्यांतील महिलांना पाण्यासाठी मैलोनमैल भटकंती करावी लागत आहे.

- विजय मांडेकर्जत : तालुक्यातील पाणीटंचाईने कळस गाठला असून ग्रामीण आणि आदिवासी पाड्यांतील महिलांना पाण्यासाठी मैलोनमैल भटकंती करावी लागत आहे. शासनाने सुरू केलेले टँकर पाच ते आठ दिवसांनी टंचाईग्रस्त गावात आणि वाडीत पोहचत असल्याने ग्रामस्थांमधून संताप व्यक्त होत आहे. पाण्याच्या शोधासाठी भटकावे लागत असल्याने त्यांच्या उद्योग व्यवसायावरही परिणाम होत आहे. त्यामुळे आदिवासी बांधवांकडून आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.तालुक्यात पाणीटंचाईची स्थिती गंभीर आहे. त्यामुळे किमान महिनाभर टंचाईग्रस्त भागातील जनतेचे टँकरने पाणी मिळावे म्हणून प्रस्ताव पाठविण्यात आले होते. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने निर्णय घेऊन, तालुक्यात ३ गावे आणि १५ आदिवासी वाड्यांना टँकरचे पाणीपुरवठा करण्यात येईल, असा निर्णय जिल्हाधिकारी यांनी १८ मार्च २०१९ रोजी घेतला. त्यासाठी मनोज ओसवाल यांच्या मालकीचा (एमएच ०२ के ७००२) आणि कान्हू मालू खडके यांच्या मालकीचा ( एमएच ४६ ई ४२३२) टँकरचे अधिग्रहण करण्यात आले आहे. पावसाळा सुरू होईपर्यंत हे दोन्ही टँकर पाणीपुरवठा करण्यासाठी मंजूर करण्यात आले होते. प्रत्यक्षात ४ एप्रिलपासून हे दोन टँकर तालुक्यातील टंचाईग्रस्त मोग्रज, धामणी, पिंगळस या तीन गावांना तसेच १५ आदिवासी वाड्यांना टँकरने पाणी पुरविणार आहे. त्यात भक्ताचीवाडी, भल्याचीवाडी, जांभूळवाडी, मेचकरवाडी, चौधरवाडी, खानंद, सागाचीवाडी, धामणदांड, भूतीवली, बोरीचीवाडी, चिंचवाडी, पालीधनगरवाडी, मोरेवाडी आणि ताडवाडी अशा १५आदिवासी वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा सुरू केला.सरकारी दर परवडत नसल्याने टँकर ठेकेदार आपली वाहने देतो, पण प्रत्यक्ष पाणीपुरवठा करताना वेळेवर करीत नाही. गेल्या महिनाभरात पाणीटंचाई दूर करण्यासाठी शासनाने ज्या गावात - वाड्यात टँकर पाठविण्याचे आदेश दिले आहेत. त्या ठिकाणी १५ आदिवासी वाड्या आणि ४ गावांत टँकर दिवसाआडही गेलेला नाही. टँकर मंजूर झालेल्या आदिवासी वाड्यात कर्जत तालुका आदिवासी ठाकूर कातकरी संघटनेच्या वतीने कार्यकर्ते पाठवून चौकशी सुरू केली. त्यावेळी शासनाकडून पाच ते आठ दिवसातून एकदा पाणीपुरवठा होत असल्याचे उघडकीस आले आहे. यामुळे संतप्त आदिवासी समाजाच्या कर्जत तालुका पदाधिकाऱ्यांनी १४ मेपासून कर्जत तहसील कार्यालयाबाहेर उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.कर्जत तालुक्यात मार्च महिन्यापासून पाणीटंचाईचे दुर्भिक्ष निर्माण झाले आहे. पाणीटंचाई निर्माण झाल्याने टंचाईग्रस्त गावे-वाड्यातील ग्रामस्थांनी टँकरची मागणी करण्यास सुरुवात केली होती. १२ मार्च २०१९ रोजी पहिल्यांदा टँकरची मागणी करणारे प्रस्ताव कर्जत पंचायत समितीकडे पोहचले होते. मार्चअखेर टँकरची मागणी करणाºया प्रस्तावाची संख्या १८ वर गेली.शासनाकडून मूलभूत सुविधाही पुरवल्या जात नाहीत. आम्हाला हक्काचे पाणी देखील शासन देत नसल्याने आम्हाला संविधानाने दिलेल्या अधिकाराप्रमाणे सनदशीर मार्गे आंदोलन करावे लागेल.- जैतू पारधी, अध्यक्ष,आदिवासी ठाकूर कातकरी समाज३ एप्रिलपासून टँकरने पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले असले तरी भोपळेवाडी, जांभूळवाडी, मॉग्रेज ग्रामपंचायतीमधील नंदकरपाडा येथे टँकर द्यावेत, असा प्रस्ताव प्रलंबित आहे.

गाव-पाड्यांत पाच दिवसांनी टँकर; टंचाईग्रस्त गावांत पाणीपुरवठ्यात अडचणी- विजय मांडेकर्जत : तालुक्यातील पाणीटंचाईने कळस गाठला असून ग्रामीण आणि आदिवासी पाड्यांतील महिलांना पाण्यासाठी मैलोनमैल भटकंती करावी लागत आहे. शासनाने सुरू केलेले टँकर पाच ते आठ दिवसांनी टंचाईग्रस्त गावात आणि वाडीत पोहचत असल्याने ग्रामस्थांमधून संताप व्यक्त होत आहे. पाण्याच्या शोधासाठी भटकावे लागत असल्याने त्यांच्या उद्योग व्यवसायावरही परिणाम होत आहे. त्यामुळे आदिवासी बांधवांकडून आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.तालुक्यात पाणीटंचाईची स्थिती गंभीर आहे. त्यामुळे किमान महिनाभर टंचाईग्रस्त भागातील जनतेचे टँकरने पाणी मिळावे म्हणून प्रस्ताव पाठविण्यात आले होते. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने निर्णय घेऊन, तालुक्यात ३ गावे आणि १५ आदिवासी वाड्यांना टँकरचे पाणीपुरवठा करण्यात येईल, असा निर्णय जिल्हाधिकारी यांनी १८ मार्च २०१९ रोजी घेतला. त्यासाठी मनोज ओसवाल यांच्या मालकीचा (एमएच ०२ के ७००२) आणि कान्हू मालू खडके यांच्या मालकीचा ( एमएच ४६ ई ४२३२) टँकरचे अधिग्रहण करण्यात आले आहे. पावसाळा सुरू होईपर्यंत हे दोन्ही टँकर पाणीपुरवठा करण्यासाठी मंजूर करण्यात आले होते. प्रत्यक्षात ४ एप्रिलपासून हे दोन टँकर तालुक्यातील टंचाईग्रस्त मोग्रज, धामणी, पिंगळस या तीन गावांना तसेच १५ आदिवासी वाड्यांना टँकरने पाणी पुरविणार आहे. त्यात भक्ताचीवाडी, भल्याचीवाडी, जांभूळवाडी, मेचकरवाडी, चौधरवाडी, खानंद, सागाचीवाडी, धामणदांड, भूतीवली, बोरीचीवाडी, चिंचवाडी, पालीधनगरवाडी, मोरेवाडी आणि ताडवाडी अशा १५आदिवासी वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा सुरू केला.सरकारी दर परवडत नसल्याने टँकर ठेकेदार आपली वाहने देतो, पण प्रत्यक्ष पाणीपुरवठा करताना वेळेवर करीत नाही. गेल्या महिनाभरात पाणीटंचाई दूर करण्यासाठी शासनाने ज्या गावात - वाड्यात टँकर पाठविण्याचे आदेश दिले आहेत. त्या ठिकाणी १५ आदिवासी वाड्या आणि ४ गावांत टँकर दिवसाआडही गेलेला नाही. टँकर मंजूर झालेल्या आदिवासी वाड्यात कर्जत तालुका आदिवासी ठाकूर कातकरी संघटनेच्या वतीने कार्यकर्ते पाठवून चौकशी सुरू केली. त्यावेळी शासनाकडून पाच ते आठ दिवसातून एकदा पाणीपुरवठा होत असल्याचे उघडकीस आले आहे. यामुळे संतप्त आदिवासी समाजाच्या कर्जत तालुका पदाधिकाऱ्यांनी १४ मेपासून कर्जत तहसील कार्यालयाबाहेर उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.कर्जत तालुक्यात मार्च महिन्यापासून पाणीटंचाईचे दुर्भिक्ष निर्माण झाले आहे. पाणीटंचाई निर्माण झाल्याने टंचाईग्रस्त गावे-वाड्यातील ग्रामस्थांनी टँकरची मागणी करण्यास सुरुवात केली होती. १२ मार्च २०१९ रोजी पहिल्यांदा टँकरची मागणी करणारे प्रस्ताव कर्जत पंचायत समितीकडे पोहचले होते. मार्चअखेर टँकरची मागणी करणाºया प्रस्तावाची संख्या १८ वर गेली.शासनाकडून मूलभूत सुविधाही पुरवल्या जात नाहीत. आम्हाला हक्काचे पाणी देखील शासन देत नसल्याने आम्हाला संविधानाने दिलेल्या अधिकाराप्रमाणे सनदशीर मार्गे आंदोलन करावे लागेल.- जैतू पारधी, अध्यक्ष,आदिवासी ठाकूर कातकरी समाज३ एप्रिलपासून टँकरने पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले असले तरी भोपळेवाडी, जांभूळवाडी, मॉग्रेज ग्रामपंचायतीमधील नंदकरपाडा येथे टँकर द्यावेत, असा प्रस्ताव प्रलंबित आहे.

टॅग्स :Waterपाणी