शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

Taliye Landslide : तळीयेमधील बचावकार्याला पूर्ण विराम! दरडीने घेतला 84 निष्पापांचा बळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2021 18:40 IST

Taliye Landslide : नैसर्गिक आपत्तीमध्ये तब्बल 84 जणांना आपला प्राण गमवावा लागला आहे, तर पाच जण जखमी असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.

- आविष्कार देसाई

रायगड : महाड तालुक्यातील तळीये येथील दरड दुर्घटनेत तब्बल 53 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. बेपत्ता असणाऱ्या 31 जणांना जिल्हा प्रशासनाने आज मृत घोषित करुन बचाव कार्य संपल्याचे जाहिर केले. नैसर्गिक आपत्तीमध्ये तब्बल 84 जणांना आपला प्राण गमवावा लागला आहे, तर पाच जण जखमी असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.

महाड तालुक्यातील तळीये येथे 22 जुलैला अतिवृष्टीमुळे दरड कोसळली होती. या दरडीमध्ये 84 नागरिक अडकल्याची भिती व्यक्त करण्यात आली होती. 23 जुलै रोजी प्रशासनाने एनडीआरएफ, एसडीआरएफ, टीडीआरएफ आणि 12 स्थानिक बचाव पथकांच्या सहायाने बचावकार्य सुरु केले होते. रविवारी रात्री उशिरापर्यंत 53 मृतदेह काढण्यात आले होते. 31 जण बेपत्ता होते. बेपत्ता नागरिकांचा शोध घेत असताना मातीच्या ढिगाऱ्यातून कोणाचे हात, पाय, डोके, धड असे सापडत होते. त्यामुळे मृतांच्या शरिराची विंटबना थांबवा अशी मागणी ग्रामस्थांनी लावून धरील होती. रविवारी याबाबत बैठक झाली. 

मृतांच्या नातेवाईकांनी, ग्रामस्थांनी संमतीपत्र दिल्यावरच बचावकार्य थांबवण्यात येईल, असे जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी स्पष्ट केले होते. त्यानुसार सोमवारी दुपारी एनडीआरएफ, एसडीआरएफ, टीडीआरएफचे मत आणि बेपत्ता झालेल्या नातेवाईकांच्या भावना जाणून घेण्यात आल्या.सर्वसमावेशक निर्णय घेऊन बचाव कार्य थांबवण्यात येत असल्याची घोषणा जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी केली.

टॅग्स :Raigadरायगडlandslidesभूस्खलन