शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
5
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
6
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
7
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
8
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
9
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
10
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
11
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
12
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
13
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
14
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
15
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
16
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
17
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
18
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
19
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
20
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना

Taliye Landslide : तळीयेमधील बचावकार्याला पूर्ण विराम! दरडीने घेतला 84 निष्पापांचा बळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2021 18:40 IST

Taliye Landslide : नैसर्गिक आपत्तीमध्ये तब्बल 84 जणांना आपला प्राण गमवावा लागला आहे, तर पाच जण जखमी असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.

- आविष्कार देसाई

रायगड : महाड तालुक्यातील तळीये येथील दरड दुर्घटनेत तब्बल 53 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. बेपत्ता असणाऱ्या 31 जणांना जिल्हा प्रशासनाने आज मृत घोषित करुन बचाव कार्य संपल्याचे जाहिर केले. नैसर्गिक आपत्तीमध्ये तब्बल 84 जणांना आपला प्राण गमवावा लागला आहे, तर पाच जण जखमी असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.

महाड तालुक्यातील तळीये येथे 22 जुलैला अतिवृष्टीमुळे दरड कोसळली होती. या दरडीमध्ये 84 नागरिक अडकल्याची भिती व्यक्त करण्यात आली होती. 23 जुलै रोजी प्रशासनाने एनडीआरएफ, एसडीआरएफ, टीडीआरएफ आणि 12 स्थानिक बचाव पथकांच्या सहायाने बचावकार्य सुरु केले होते. रविवारी रात्री उशिरापर्यंत 53 मृतदेह काढण्यात आले होते. 31 जण बेपत्ता होते. बेपत्ता नागरिकांचा शोध घेत असताना मातीच्या ढिगाऱ्यातून कोणाचे हात, पाय, डोके, धड असे सापडत होते. त्यामुळे मृतांच्या शरिराची विंटबना थांबवा अशी मागणी ग्रामस्थांनी लावून धरील होती. रविवारी याबाबत बैठक झाली. 

मृतांच्या नातेवाईकांनी, ग्रामस्थांनी संमतीपत्र दिल्यावरच बचावकार्य थांबवण्यात येईल, असे जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी स्पष्ट केले होते. त्यानुसार सोमवारी दुपारी एनडीआरएफ, एसडीआरएफ, टीडीआरएफचे मत आणि बेपत्ता झालेल्या नातेवाईकांच्या भावना जाणून घेण्यात आल्या.सर्वसमावेशक निर्णय घेऊन बचाव कार्य थांबवण्यात येत असल्याची घोषणा जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी केली.

टॅग्स :Raigadरायगडlandslidesभूस्खलन