शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

Taliye Landslide: तळीयेमध्ये ८४ मृतांचे उत्तर कार्य; मृतांच्या १३ व्याला नातेवाईकांच्या अश्रूंचा बांध फुटला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2021 21:03 IST

महाड तालुक्यातील तळीये दरड दुर्घटनेला आज 13 दिवस पूर्ण झाले. मृत पावलेल्यांचे उत्तरकार्य आज गावात करण्यात आले.

लाेकमत न्यूज नेटवर्करायगड ः महाड तालुक्यातील तळीये दरड दुर्घटनेला आज 13 दिवस पूर्ण झाले. मृत पावलेल्यांचे उत्तरकार्य आज गावात करण्यात आले. मृतांच्या नातवाईकांच्या डाेळ्यातून आजही अश्रूंचा बांध फुटला होता. त्यामुळे तळीयेमध्ये अत्यंत शाेकाकुल वातावरण हाेते.

22 जुलै राेजी तळीयेमध्ये अख्खा डाेंगर वाडीवर काेसळला आणि क्षणार्धात वाडीला गिळून टाकले हाेते. सरकार आणि प्रशासनाने बचाव कार्य हाती घेतले मात्र एकही जीवंत व्यक्ती सापडली नाही. 53 मृत देह शाेधण्यात प्रशासनाला यश आले. उर्वरीत 31 नागरिकांना मृत घाेषित करण्याचा प्रस्ताव सरकार दरबारी पाठवण्यात आला आहे. काही मृतांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत देण्यात आली आहे.तळीये दुर्घटनेला आज 13 दिवस पूर्ण झाले. मृत्यांच्या आत्माला शांती लाभावी यासाठी रिती रिवाजाप्रमाणे 84 मृतांचे 13 व्याचे उत्तरकार्य गावात करण्यात आले. मृतांच्या नातेवाईकांना दुःख अनावर हाेत हाेते. तसबीरे दर्शन घेताना आपला माणूस गेल्याच्या भावनेने त्यांनी हंबरडा फाेडला. तळीये गावावर शाेककळा पसरली हाेती.

उत्तर कार्यासाठी प्रशासनाने उत्तम सहकार्य केले. सर्व व्यवस्था करण्यात आली हाेती. त्यासाठी ग्रामस्थांनीही माेलाचे सहकार्य केले, अशी माहिती स्थानिक आमदार भरत गाेगावले यांनी लाेकमतशी बाेलताना दिली. घडलेली दुर्घटना अत्यंत वाईट असून मृत्यांच्या आत्याम्याला शांती लाभाे अशी श्रध्दांजली त्यांनी वाहीली.याप्रसंगी जिल्हाधिकारी निधी चाैधरी, ठाण्याचे उपमहापाैर नरेश म्हस्के,अशाेक पांडे पंचायत समिती सभापती स्वप्ना मालुसरे, जिल्हा परिषद सदस्य मनाेज काळीजकर, प्रांताधिकारी प्रतिमा पुदलवाड यांच्यासह ग्रामस्थ,मृतांचे नातेवाईक उपस्थित हाेते

टॅग्स :RaigadरायगडRainपाऊस