शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

मुरुडमध्ये रताळ्यांचा बाजार फुलला, पण ग्राहकच नाहीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2021 00:14 IST

महाशिवरात्रीच्या पूर्वसंध्येला बाजार : भाव घसरले

संजय करडे

मुरूड : दरवर्षी महाशिवरात्र असण्याच्या तीन दिवस अगोदर कोर्लई येथील शेतकरी मोठ्या संख्येने आपल्या शेतात पिकविलेले रताळे विकण्यासाठी मुरुड शहरातील बाजारपेठेत येत असतात. शेकडो टन माल घेऊन येऊन मोठ्या प्रमाणात रताळ्याची विक्री करीत असतात. कोर्लई येथील रताळे खूप प्रसिद्ध असून, ही रताळी विकत घेण्यासाठी मोठी गर्दी होत असते, परंतु यंदा कोरोना व आर्थिक मंदीमुळे लोकांच्या हाताला असणारे काम गमावल्यामुळे रताळी खरेदीसाठी फार अल्प प्रतिसाद मिळत असल्याने दिसून येत आहे. माल विकणाऱ्या व्यापाऱ्यांनी रताळ्याचे भाव कमी करूनही रताळी घेण्यासाठी गर्दी दिसून येत नाही. ग्राहक नसल्याने माल विकणारे व्यापारी त्रस्त व हैराण झाले आहेत.

मागील वर्षी रताळी ८० रुपये किलोने विकली गेली, परंतु यंदा रताळ्याचे पीक भरघोस येऊनही रताळी विकत घेण्यासाठी गिऱ्हाईकच नाही. त्यामुळे उत्कृष्ट रताळी असूनही विक्रीला प्रतिसाद नसल्याने बाजारात शांतता दिसून येत आहे. महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी रताळ्याची शेती मोठ्या प्रमाणात करून भरघोस आवक प्राप्त करण्याचा त्याचा प्रयत्न असतो, परंतु यंदा बाजारातील ग्राहक खरेदी करीत नसल्याने रताळ्याचे भाव मोठ्या प्रमाणात घसरले आहेत. उपवासासाठी लागणारी गावठी लालचुटूक गोड रताळ्यांची कोर्लई गावातून सुमारे ५०० क्विंटलची आवक वाढली आहे.गोड बटाटा अर्थात स्वीट पोटॅटो म्हणून जगभर ओळख असलेले गोड कंदमुळ रताळे बहुधा उपवासासाठी विशेषतः महाशिवरात्रीला वापरले जाते. 

४० ते ५० रुपये किलोला दरदरवर्षीप्रमाणे या वर्षी मुरुड नगरपरिषदेतर्फे रताळे बाजारात विद्युत पुरवठा व मंडपाची सुविधा उपलब्ध न केल्यामुळे सुमारे ४० महिला विक्रेतींना पदरमोड करून मंडप घालावा लागल्याचे लोना मार्तिस यांनी सांगितले, तर गेल्या वर्षी ८० ते ९० रुपये किलोला आकारले तरी मागणी होती, परंतु या वर्षी उत्पादन वाढले असून, ४० ते ५० रुपये इतका कमी दर असूनही मालाला अपेक्षित उठाव नसल्याचे महिला बचत गट प्रमुख अजेलीन डिसोझा यांनी सांगितले.

उत्पन्नात गेल्या वर्षापेक्षा दुप्पट वाढयंदा रताळ्याचे उत्पन्न गेल्या वर्षापेक्षा दुप्पट वाढ झाली असून, प्रति किलो ५० रुपये भाव असूनही कोरोनामुळे फारसा रताळ्यांना मागणी नसल्याने शेतकरी तोट्यात असल्याने नाराजीचे वातावरण दिसत आहे. या वर्षी अधिक मास आल्याने रताळे पिकविण्यास पुरेसा अवधी मिळाला. परिणामी, अडीच तीन महिन्यांचा कालावधी मिळाल्याने भरघोस पीक मिळू शकले. मात्र, रताळ्याला मोठ्या प्रमाणावर मागणी नसल्याने जेमतेम उत्पादन खर्च निघाल्याचे रताळी उत्पादक शेतकरी रॉक रुसारीयो यांनी सांगितले. 

टॅग्स :RaigadरायगडMahashivratriमहाशिवरात्री