शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

शाश्वत उत्पन्न देणारी वालशेती बहरली; बळीराजा सुखावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2020 22:54 IST

रब्बी हंगामात ५० ते ६० एकरमध्ये लागवड

- दत्ता म्हात्रे पेण : रब्बी हंगामातील शाश्वत उत्पन्न देणारे पीक म्हणून शेतकरी वाल पिकाला प्राधान्य देतात. गतवर्षी खरीप हंगामात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडल्याचा फायदा जमिनीत ओलावा टिकून राहण्यासाठी झाला. खरीप हंगाम संपताक्षणी जमिनीतील ओलावा दोन ते तीन महिने टिकेल, असा तर्क बांधून यंदा रब्बी हंगामात ५० ते ६० एकर शेतीत वालपीक लागवड करण्यात आली आहे.सध्या पेण तालुक्यातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात वालाची शेती बहरल्याने शेतकरी सुखावला आहे. वालाच्या शेंगा चवीला रुचकर असल्याने प्रति किलो ५० ते ६० दराने शेंगाची विक्री होत आहे. रब्बी हंगामातील शाश्वत उत्पन्न देणारे पीक सध्या परिसरातील शेतकरी वाल पिकाच्या शेतीलाच प्राधान्य देत आहेत. साधारणपणे नोव्हेंबर महिन्यात वाल पीक ओलावा असलेल्या जमिनीत पेरले जाते. पीक संरक्षणासाठी शेतीला सभोवार काटेरी कुंपण घातले की, शेतकरी निर्धास्त होतो. त्यानंतर एकदा का बी रुजून कोंब फुटले की, अल्पावधीतच शेती बहरू लागते. त्यानंतर खतांची अल्पप्रमाणात मात्रा दिली की, जेवढे थंड हवामान तेवढा फायदा पिकाला होतो.यंदा जमिनीला ओलावा, थंड व अनुकूल हवामान मिळाल्याने पीक जोमदार आल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. मार्च महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात वालाच्या शेंगा परिपक्व होऊन पीक काढणीला येईल. वेलवर्गीय प्रकारातील हे पीक शेतकऱ्यांना यंदा चांगली आर्थिककमाई करून देणार असल्याने शेतकºयांकडून समाधान व्यक्त होत आहे.उत्पादन अधिक व खर्च कमी असल्याने फायदेशीरपेण ग्रामीण भागातील करोनी, दुरशेत, जिते, आंबिवली, बळवली अशा बाळगंगा नदीखोºयातील भागात वालशेती मोठ्या प्रमाणात केली जाते. याशिवाय पाटणोली, वाशी नाका, पाबळ खोरे व हेटवणे धरणाच्या परिसरातील शेतकरीही वेलवर्गीय पिके मोठ्या प्रमाणात घेत आहेत. उत्पादन अधिक व खर्च कमी असल्याने शेतकºयांसाठी ही शेती फायदेशीर ठरत आहे. वालाच्या शेंगा व कडधान्यातील वालाला चांगला भाव मिळतो. वालाची विक्री प्रतिकिलो १३० ते १४० रुपये दराने केली जात आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी