शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना फटका, पेरणीच्या तोंडावर भात बियाण्यांचा तुटवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2018 02:21 IST

शासनाचे बियाणे पुरवठा करणाºया महाबीजकडून यंदाच्या खरीप हंगामाकरिता सुवर्णा आणि जया जातीच्या भात बियाण्यांचा पुरवठा करण्यात येत आहे. मात्र, हा पुरवठा अपुºया प्रमाणात झाल्याने ऐन पेरणीच्या तोंडावर शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.

अलिबाग : शासनाचे बियाणे पुरवठा करणाºया महाबीजकडून यंदाच्या खरीप हंगामाकरिता सुवर्णा आणि जया जातीच्या भात बियाण्यांचा पुरवठा करण्यात येत आहे. मात्र, हा पुरवठा अपुºया प्रमाणात झाल्याने ऐन पेरणीच्या तोंडावर शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. बियाणे वेळेत मिळत नसल्याने यंदा पेरण्यांना विलंब होऊन त्याचा परिणाम संपूर्ण खरीप भात उत्पादनावर होण्याची चिन्हे निर्माण झाल्याने शेतकरी चिंता व्यक्त करत आहेत.खरीप हंगामात रायगड जिल्ह्यात १ लाख २३ हजार हेक्टर क्षेत्रावर भात पिकाची लागवड होणार असून, यासाठी विविध वाणाचे १८ हजार ५०० क्विंटल भात बियाणांची मागणी शेतकºयांकडून करण्यात आली आहे. यातील ६५ टक्के बियाणे महाबीज व कृषिविद्यापीठाकडून उपलब्ध केले जाते.शेतकºयांकडून सुवर्णा व जया या महाबीजच्या बियाण्यांना सर्वाधिक मागणी असते. मात्र, यावर्षी या दोन्ही वाणांची उपलब्धता कमी झाल्याने पुरवठा कमी होत असल्याने ही समस्या निर्माण झाली असल्याचे जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी पांडुरंग शेळके यांनी सांगितले. शेतकºयांना चांगल्या दर्जाचे बियाणे मिळण्यासाठी दापोली येथील कोकण कृषी विद्यापीठ आणि महाबीजच्या तज्ज्ञमंडळींचे मार्गदर्शन घेतले जात आहे. मागणी नोंदविल्याप्रमाणे अपेक्षित बियाण्यांचा साठा न आल्याने ही टंचाई भासत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.जिल्ह्यातील शेतकºयांची रोहिणी नक्षत्रातील भातपेरणीची लगबग सुरू झाली आहे. जिल्ह्यात पडणाºया पावसाच्या प्रमणावरूनसाधरणपणे १४० ते १४५ दिवसांत तयार होणाºया सुवर्णा व जया या गरव्या वाणांचा वापर येथील शेतकरी करीत असतात. यावर्षी पुरेशा प्रमाणात हे वाण मिळत नसल्याने शेतकºयांना नाईलाजास्तव कर्जत-२, कर्जत-३ आणि पनवेल या जातीच्या वाणांची निवड पेरणीसाठी करावी लागत असल्याने शेतकºयांनी नाराजी व्यक्त केली आहे.उत्तर विदर्भातील अनियमित पावसामुळे बियाण्यांचा तुटवडायंदाच्या खरीप हंगामाकरिता मागील वर्षीच्या हंगामात बियाणे तयार करण्यात येत. महाबीज उत्तर विदर्भातून सुवर्णा आणि जया जातीच्या भाताचे बियाणे घेते. मात्र, गतवर्षी उत्तर विदर्भात झालेल्या अनियमित पावसामुळे अपेक्षित प्रमाणात भात बियाणे निर्माण होऊ शकले नाही. त्यामुळे हा बियाण्यांचा तुटवडा निर्माण झाला. मात्र, आता पर्यायी कर्जत-०९, श्रीराम, एसएमपी आणि कर्जत-०२ भात बियाणे शेतकºयांना उपलब्ध करुन देण्यात येत असल्याची माहिती महाबीजचे जिल्हा व्यवस्थापक नासीर इनामदार यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी