शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

विद्यार्थ्यांची सुरक्षा ऐरणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2018 00:30 IST

ग्रामपंचायत व शाळा व्यवस्थापनाच्या वादात संरक्षण भिंत रखडली

-कांता हाबळेनेरळ : कर्जत-कल्याण राज्यमार्गावर चिंचवली ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या आदिजन विद्या प्रसारक मंडळाच्या भाऊसाहेब राऊत विद्यालयाला अनेक वर्षांपासून संरक्षण भिंत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. चिंचवली ग्रामपंचायत आणि शाळा व्यवस्थापनाच्या वादामुळे संरक्षक भिंतीचे काम रखडल्याचे समोर आले आहे. या वादात सुमारे दोन हजार विद्यार्थ्यांची सुरक्षा धोक्यात आली आहे.कर्जत-कल्याण या राज्यमार्गाला लागून असणाऱ्या कर्जत तालुक्यातील चिंचवली ग्रामपंचायतीच्या हद्दीत असणारी माननीय भाऊसाहेब राऊत विद्यालय ही शाळा सध्या चर्चेच विषय बनली आहे. १९८१ मध्ये शाळेची स्थापना झाली आहे, तेव्हापासून आजपर्यंत शाळेला संरक्षण भिंत बांधण्यात आलेली नाही. शाळेच्या स्थापनेपासून ते आजतागायत सुमारे ३५ वर्षे शाळेला कुठल्याही प्रकारची संरक्षक भिंत नाही, त्यामुळे शाळेत शिकणाºया विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. शाळेत सध्या शिशु वर्गापासून बारावीपर्यंत सुमारे दोन हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या बाबतीत शाळा व्यवस्थापनाने कुठल्याही प्रकारची काळजी घेतल्याचे दिसत नाही.शाळेच्या समोर कर्जत-कल्याण राज्यमार्ग असल्याने वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. शाळा सुटण्याच्या वेळेला सर्व विद्यार्थी राज्यमार्गावर येत असल्याने भरधाव येणाºया वाहनांमुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शाळा व्यवस्थापन समिती आणि शाळा प्रशासनाने सकारात्मक विचार करून या शाळेला लवकरात लवकर संरक्षक भिंत उभारावी, अशी मागणी होत आहे.शाळेची कुंपण भिंत बांधण्याच्या आम्ही प्रयत्नात आहोत, यासाठी मोजमाप केले आहे. ८० मीटर लांबीची भिंत बांधून एक प्रवेशद्वार ठेवण्यात येणार आहे, चिंचवली ग्रामपंचायतीच्या काही अडचणी येत आहेत, त्या सोडवून भिंत पूर्ण केली जाईल.- पी. डी. वखारकर, मुख्याध्यापक, भाऊसाहेब राऊत विद्यालयचिंचवली ग्रामपंचायतीने जिल्हाधिकाºयांच्या मान्यतेने १५ वर्षांच्या कराराने जी जागा शाळेसाठी दिली होती. त्यांनी त्या वेळेसच कुंपण करणे आवश्यक होते. आता कुंपण भिंत बांधताना कल्याण-कर्जत राज्यमार्ग आणि शाळेचे कुंपण यामध्ये पालकांच्या गाड्या उभ्या करण्यासाठी जागा सोडावी, तसेच शिशु मंदिराजवळ असणारी अतिरिक्त जागा ग्रामपंचायत कार्यालय, तलाठी कार्यालय, तसेच अन्य शासकीय कार्यालयाच्या उभारणीसाठी ग्रामपंचायतीकडे हस्तांतरित करावी. ही अतिरिक्त जागा सोडून कुंपण भिंत बांधण्यास कोणाची हरकत नाही.- रामदास भगत, सदस्य, चिंचवली ग्रामपंचायत 

टॅग्स :RaigadरायगडSchoolशाळाStudentविद्यार्थी