शहरं
Join us  
Trending Stories
1
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
2
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
3
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
4
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
5
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
6
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
7
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
8
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
9
अटल सेतूवर खड्डे! कंत्राटदाराला २० लाखांचा दंड; पाऊस, तेल गळतीमुळे प्रकार 
10
लेख: आषाढी पायी वारी :विज्ञाननिष्ठ उत्सव
11
मुंबईत विमानाच्या महिला पायलटचा कॅब प्रवासादरम्यान विनयभंग; चालकासह दोन तरुणांविरोधात गुन्हा 
12
मुलाला आईची जात लावण्यास मुंबई उच्च न्यायालयाने दिला नकार; प्रकरण काय? 
13
भारतीय संगीत पुढे आणण्याची गरज, आशा भोसले यांनी मांडले मत; देवेंद्र फडणवीसांनी गायले गाणे
14
फिजिओथेरपीच्या इंटर्न्सच्या वेतनात वाढ, बीएस्सी नर्सिंगच्या इंटर्सना मिळणार विद्यावेतन
15
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
16
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
17
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
18
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
19
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
20
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग

शाळेसाठी विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास

By admin | Updated: July 21, 2015 04:57 IST

रायगड किल्ल्याच्या कुशीत, टकमक टोकाच्या खाली असलेल्या छत्रीनिजामपूर या गावातील इयत्ता ५ वी ते १० वीमधील ४५ आदिवासी विद्यार्थ्यांना

जयंत धुळप ,अलिबागरायगड किल्ल्याच्या कुशीत, टकमक टोकाच्या खाली असलेल्या छत्रीनिजामपूर या गावातील इयत्ता ५ वी ते १० वीमधील ४५ आदिवासी विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी गेल्या तीन वर्षांपासून पावसाळ््यात जीवावर उदार होवून काळ नदी पार करावी लागत आहे. छत्रीनिजामपूर आणि वारंगी दरम्यानच्या काळ नदीवरील पूल तीन वर्षांपूर्वी पुरात वाहून गेला. मात्र शासकीय यंत्रणेस पूल तुटल्याचा पत्ताच नसल्याने मुलांना जीव धोक्यात घालून, नदी पार करुन वाघेरी-वारंगी येथील जयजवान जयकिसान माध्यमिक विद्यालयात यावे लागते. साकव दुरूस्त करण्यासाठी संबंधित लघुपाटबंधारे विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. परिणामी शाळेत येण्याकरिता तब्बल तीन किमीची पायपीट ४५ आदिवासी विद्यार्थ्यांना दररोज करावी लागते. दररोजच्या सहा किमीची पायपीट वाचविण्याकरिता हे विद्यार्थी तुटलेल्या पुलाच्या बाजूने काळ नदीच्या पात्रात उतरुन, जीव धोक्यात घालून मानवी साखळी करुन नदी पार करतात. अतिवृष्टी झाल्यास पाण्याच्या पातळीत मोठी वाढ होते. अशा वेळी प्रवाहात वाहून जाण्याची भीती असते, परंतु फेरा वाचविण्यासाठी विद्यार्थी नदी पार करत असल्याचे जयजवान जयकिसान माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक संतोष कदम यांनी सांगितले. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी पूल(साकव) नव्याने बांधण्यात यावा, याकरिता शाळा सुरु झाल्यावर जयकिसान माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक संतोष कदम यांनी राज्याचे आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांना एक निवेदन पाठवून सर्व गंभीर परिस्थिती लक्षात आणून दिली. परंतु महिनाभरात त्यावरही कोणतेही आदेश झाले नाही आणि कार्यवाहीचा तर पत्ताच नाही. छत्रीनिजामपूर आदिवासीवाडी आणि वारंगी गावाचा साकव गेल्या तीन वर्षांपूर्वी मोडला आहे. हा साकव दुरूस्तीसाठी संबंधित लघुपाटबंधारे विभागाने अक्षम्य दुर्लक्ष केले आहे. तब्बल तीन किलोमीटर अंतराची पायपीट करुन या ४५ आदिवासी विद्यार्थ्यांना शाळेत यावे लागते. जाता-येता दररोजच्या सहा किमी अंतराची पायपीट वाचविण्याकरिता ही मुले तुटलेल्या पुलाच्या शेजारुनच काळ नदीपात्रातून जीव धोक्यात घालून मानवी साखळी करुन दररोज नदी पार करतात. अतिवृष्टी होत असेल तर या नदीची पातळी वाढते. अशा वेळी या प्रवाहात वाहून जाण्याची भीती असते, परंतु या मुलांना तो धोका पत्करुन नदी पार करावी लागते. आदिवासी विद्यार्थ्यांच्या या समस्येवर मार्ग निघावा, पूल(साकव) नव्याने बांधण्यात यावा याकरिता स्थानिक ग्रामस्थांनी महाड सार्वजनिक बांधकाम विभागास देखील याची कल्पना दिली होती, परंतु त्यांच्याकडूनही कोणतीही कार्यवाही झाली नाही. अखेर यंदा शाळा सुरु झाल्यावर शाळेचे मुख्याध्यापक संतोष कदम यांनी राज्याचे आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांना एक निवेदन पाठवून सर्व गंभीर परिस्थिती लक्षात आणून दिली. परंतु महिनाभरात त्यावर कोणतेही आदेश झाले नाही. महाडचे आमदार शिवसेनेचे भरतशेठ गोगावले आहेत. त्यांच्या माध्यमातून या ४५ विद्यार्थ्यांची समस्या सुटावी, अशी अपेक्षा छत्रीनिजामपूर ग्रामस्थांची आहे.