शहरं
Join us  
Trending Stories
1
भररस्त्यात पाठलाग करून मंगेश काळोखेंवर केले २७ वार; आरोपींच्या निर्दयीपणाचे 'सीसीटीव्ही' फुटेज समोर
2
जम्मू काश्मीर: ३० ते ३५ दहशतवादी लपल्याची शंका, बर्फवृष्टीतही भारतीय सैन्याची शोधमोहिम सुरु
3
भाजपा, शिंदेसेनेत युतीसाठी कोणतीही अडचण नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
4
Solapur Municipal Election: काँग्रेसने २० उमेदवारांच्या नावाची केली घोषणा, पहिल्या यादीत कुणाची नावे?
5
खोपोलीतील घटना अत्यंत निंदनीय, निषेध करत सुनिल तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
6
"PM मोदींचा हा वन मॅन शो फक्त..."; मनरेगाच्या नामांतरावरून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल, काँग्रेस ५ जानेवारीपासून रस्त्यावर उतरणार
7
VIDEO : इटलीच्या बॅटरकडून शाहीन आफ्रिदीची धुलाई; पाक गोलंदाजावर 'लंगडी' घालत मैदान सोडण्याची वेळ!
8
शिंदेसेनेच्या बैठकीत राडा? शहरप्रमुख नाना भानगिरे रागारागात बाहेर पडले आणि गेले निघून; व्हिडीओ आला समोर
9
जळगाव: बापच बनला हैवान! चौथी मुलगी झाल्याच्या रागातून अवघ्या ३ दिवसांच्या मुलीची हत्या
10
बांगलादेशमध्ये एका मिस्ट्री गर्लची एंट्री, बनू शकते भविष्यातील शेख हसीना किंवा खलिदा झिया
11
Sukesh Chandrashekhar : "२१७ कोटी देण्यास तयार, पण...", महाठग सुकेश चंद्रशेखरचा मास्टरस्ट्रोक; खंडणी प्रकरणात मोठी ऑफर
12
AUS vs ENG: डोक्यात निवृत्तीचा विचार, मनात भीती… आणि त्यानेच सामना फिरवला!
13
कौतुकास्पद! आईने दागिने विकून शिकवलं, १० वेळा अपयश आलं पण लेकाने वडिलांचं स्वप्न पूर्ण केलं
14
विराट कोहलीचा VIDEO घेण्यासाठी बस ड्रायव्हरची भन्नाट 'आयडिया', सोशल मीडियावर क्लिप VIRAL
15
राजकारण पेटलं! कर्नाटकमध्ये काँग्रेस सरकारची बुलडोझर कारवाई; ४०० हून अधिक घरं पाडली
16
शाकंभरी नवरात्र २०२५: शाकंभरी मातेच्या कृपेने 'या' राशींचे उजळणार भाग्य; २०२६ ची होणार स्वप्नवत सुरुवात!
17
"भाजपाने आमच्या पाठीत खंजीर खुपसला, मतदारांचाही विश्वासघात करेल"; राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मुळीक यांचे टीकास्त्र
18
Battle Of Galwan Teaser: मौत से क्या डरना...! 'बॅटल ऑफ गलवान'चा टीझर, 'या' दिवशी सिनेमा रिलीज होणार
19
जिवलग जीवाचा... विराट कोहली!! स्वत:चीच विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला दिलं एकदम खास 'गिफ्ट'
20
सोन्या-चांदीची भरारी, विदेशींची माघार अन् भारतीयांचा एल्गार! हे वर्ष कोणासाठी ठरलं फायद्याचं
Daily Top 2Weekly Top 5

शाळेसाठी विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास

By admin | Updated: July 21, 2015 04:57 IST

रायगड किल्ल्याच्या कुशीत, टकमक टोकाच्या खाली असलेल्या छत्रीनिजामपूर या गावातील इयत्ता ५ वी ते १० वीमधील ४५ आदिवासी विद्यार्थ्यांना

जयंत धुळप ,अलिबागरायगड किल्ल्याच्या कुशीत, टकमक टोकाच्या खाली असलेल्या छत्रीनिजामपूर या गावातील इयत्ता ५ वी ते १० वीमधील ४५ आदिवासी विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी गेल्या तीन वर्षांपासून पावसाळ््यात जीवावर उदार होवून काळ नदी पार करावी लागत आहे. छत्रीनिजामपूर आणि वारंगी दरम्यानच्या काळ नदीवरील पूल तीन वर्षांपूर्वी पुरात वाहून गेला. मात्र शासकीय यंत्रणेस पूल तुटल्याचा पत्ताच नसल्याने मुलांना जीव धोक्यात घालून, नदी पार करुन वाघेरी-वारंगी येथील जयजवान जयकिसान माध्यमिक विद्यालयात यावे लागते. साकव दुरूस्त करण्यासाठी संबंधित लघुपाटबंधारे विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. परिणामी शाळेत येण्याकरिता तब्बल तीन किमीची पायपीट ४५ आदिवासी विद्यार्थ्यांना दररोज करावी लागते. दररोजच्या सहा किमीची पायपीट वाचविण्याकरिता हे विद्यार्थी तुटलेल्या पुलाच्या बाजूने काळ नदीच्या पात्रात उतरुन, जीव धोक्यात घालून मानवी साखळी करुन नदी पार करतात. अतिवृष्टी झाल्यास पाण्याच्या पातळीत मोठी वाढ होते. अशा वेळी प्रवाहात वाहून जाण्याची भीती असते, परंतु फेरा वाचविण्यासाठी विद्यार्थी नदी पार करत असल्याचे जयजवान जयकिसान माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक संतोष कदम यांनी सांगितले. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी पूल(साकव) नव्याने बांधण्यात यावा, याकरिता शाळा सुरु झाल्यावर जयकिसान माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक संतोष कदम यांनी राज्याचे आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांना एक निवेदन पाठवून सर्व गंभीर परिस्थिती लक्षात आणून दिली. परंतु महिनाभरात त्यावरही कोणतेही आदेश झाले नाही आणि कार्यवाहीचा तर पत्ताच नाही. छत्रीनिजामपूर आदिवासीवाडी आणि वारंगी गावाचा साकव गेल्या तीन वर्षांपूर्वी मोडला आहे. हा साकव दुरूस्तीसाठी संबंधित लघुपाटबंधारे विभागाने अक्षम्य दुर्लक्ष केले आहे. तब्बल तीन किलोमीटर अंतराची पायपीट करुन या ४५ आदिवासी विद्यार्थ्यांना शाळेत यावे लागते. जाता-येता दररोजच्या सहा किमी अंतराची पायपीट वाचविण्याकरिता ही मुले तुटलेल्या पुलाच्या शेजारुनच काळ नदीपात्रातून जीव धोक्यात घालून मानवी साखळी करुन दररोज नदी पार करतात. अतिवृष्टी होत असेल तर या नदीची पातळी वाढते. अशा वेळी या प्रवाहात वाहून जाण्याची भीती असते, परंतु या मुलांना तो धोका पत्करुन नदी पार करावी लागते. आदिवासी विद्यार्थ्यांच्या या समस्येवर मार्ग निघावा, पूल(साकव) नव्याने बांधण्यात यावा याकरिता स्थानिक ग्रामस्थांनी महाड सार्वजनिक बांधकाम विभागास देखील याची कल्पना दिली होती, परंतु त्यांच्याकडूनही कोणतीही कार्यवाही झाली नाही. अखेर यंदा शाळा सुरु झाल्यावर शाळेचे मुख्याध्यापक संतोष कदम यांनी राज्याचे आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांना एक निवेदन पाठवून सर्व गंभीर परिस्थिती लक्षात आणून दिली. परंतु महिनाभरात त्यावर कोणतेही आदेश झाले नाही. महाडचे आमदार शिवसेनेचे भरतशेठ गोगावले आहेत. त्यांच्या माध्यमातून या ४५ विद्यार्थ्यांची समस्या सुटावी, अशी अपेक्षा छत्रीनिजामपूर ग्रामस्थांची आहे.