शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
3
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
क्रिकेटच्या देवाकडून जेमी-हरमनप्रीतला शाब्बासकी! ऐतिहासिक विजय युवी, एबी आणि गंभीरलाही भावला
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
8
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
9
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
10
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
11
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
12
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
13
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
14
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
15
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
16
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
17
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
18
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
19
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
20
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा

Video : तब्बल 17 तास पडले हाेते बार्जवर अडकून; जेएसडब्यूच्या 16 खलाशांची सुखरुप सुटका  

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2021 15:49 IST

Stuck on a barge for 17 hours : भारतीय तटरक्षक दल, रायगड पाेलिस, बंदर विभागाचे संयुक्त बचावकार्य      

ठळक मुद्देसर्व खलाशांची वैद्यकीय चाचणी करण्यात आली आहे. सर्व खलाशी सुखरुप आहेत, असेही गुंजाळ यांनी स्पष्ट केले.

अभय आपटे                                                                                                                                                                                                                                                                         

रेवदंडा - अलिबाग तालुक्यातील रेवदंडा-साळाव येथील समुद्रात जेएसडब्ल्यू कंपनीच्या बार्जला अपघात झाला. रायगड पाेलिस, तटरक्षक दलाने रेस्क्यू ऑपरेशन करत 16 खलाशांचे प्राण वाचवले आहेत, अशी माहिती रायगडचे अतिरीक्त जिल्हा पाेलिस अधिक्षक सचिन गुंजाळ यांनी लाेकमतशी बाेलताना दिली. 

येथील जेएसडब्ल्यू कंपनीची एम.व्ही.मंगलम बार्ज सुमारे दाेन हजार 400 मेट्रिकटन आर्यन हा कच्चा माल घेऊन मुंबईहून बार्ज निघाली हाेती. बार्जवर 16 खलाशी हाेते. बुधवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास कंपनीपासून सुमारे दीड किलाेमीटर अंतरावर असताना बार्ज  समुद्रातील गाळात रुतून बसली. याबाबतची काेणतीच माहिती यंत्रणेला  संबंधीत कंपनीने दिली नाही.आहाेटी सुरु झाल्याने बार्ज गाळात रुतली. काही कालावधीनेभरती सुरु हाेईल आणि बार्ज पुन्हा कंपनीकडे येईल असे व्यवस्थापनाला वाटले असावे परंतू सुमारे आठ-दहा तासांनी बार्ज खालून लिक झाली. बार्जमध्ये हळूहळू पाणी शिरु लागल्याने नंतर सर्वांचीच तारांबळ उडाली. सकाळी याबाबत रायगड पाेलिसांना माहिती मिळताच. भारतीय तटरक्षक दलाच्या मदतीने गुरुवारी सकाळी साडे दहा वाजता बचाव कार्य हाती घेण्यात आले, असे गुंजाळ यांनी सांगितले. बुधवारी सायंकाळी साडेपाच ते गुरुवारी सकाळी साडे दहा असे तब्बल 17 तास खलाशी बार्जवरच अडकून पडले हाेते. बचाव कार्यासाठी भारतीय तटरक्षक दलाचे दाेन हेलीकाॅप्टर, बाेटी बचाव कार्यात पुढे हाेत्या. बार्जवरील 13 खलाशांना हेलीकाॅप्टरच्या, तर तीन खलाशांना बाेटीच्या सहायाने बाहेर काढण्यात आले. त्यानंतर सर्व खलाशांची वैद्यकीय चाचणी करण्यात आली आहे. सर्व खलाशी सुखरुप आहेत, असेही गुंजाळ यांनी स्पष्ट केले.

सदर मोहिम यशस्वी होण्यासाठी तटरक्षक दलाचे कॅप्टन अरूण कुमार सिंग, कर्मचारी, प्रादेशिक बंदरचे कॅप्टन चोकेश्वर लेपांडे, बंदर अधिक्षक, अलिबाग अरविंद सोनावणे, रेवदंडा बंदर निरिक्षक अमर पालवणकर, जिल्हा पोलिस अधिक्षक अशोक दुधे यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलिस अधिक्षक सचिन गुंजाळ,उपविभागीय पोलिस अधिकारी सोनाली कदम ,रेवदंडा पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक अशोक थोरात, पोलिस कर्मचारी, महाराष्ट्र सुरक्षा बलाचे कर्मचारी सहभागी हाेते.दरम्यान, आपत्तीच्या कालावधीत कंपनीने यंत्रणेला माहिती दिली नाही. त्यामुळे 16 खलाशांच्या जीव धाेक्यात घालण्यात आला. कंपनीच्या या भूमिकेवर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. याबाबत संबंधीत कंपनी व्यवस्थापनावर कारवाई हाेणार का हा खरा प्रश्न आहे

टॅग्स :RaigadरायगडPoliceपोलिसalibaugअलिबाग