शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

रायगडला वादळाचा तडाखा, जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2018 07:09 IST

अलिबाग, नागोठणेत वीजपुरवठा खंडित

अलिबाग : परतीच्या पावसाबरोबर जोरदार वादळाच्या तडाख्यामुळे शुक्रवारी अलिबाग, कार्लेखिंड, पेण, नागोठणे परिसरात मोठे नुकसान होऊन जनजीवन विस्कळीत झाले आहे. शुक्रवारी सायंकाळी ७ च्या सुमारास विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस सुरू झाला. कार्लेखिंड-रेवस विभागातील २२ तास वीजपुरवठा खंडित झाला. तर अलिबाग तालुक्यातील संपूर्ण वीजपुरवठा खंडित झाला. या वादळामुळे याचा फटका जास्त रेवस फिडरच्या लाइनला बसला आहे.

लघुदाब वाहिनी आणि उच्चदाब वाहिनीवरील विद्युत जनित्रयंत्रावर, इन्सुलेटरवर वीज कोसळून काही ठिकाणी तारा जंपर, तर पोल पडलेले आहेत. वादळामुळे विद्युत जनित्र यंत्र तुटून पडलेले आहेत. वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी युद्धपातळीवर काम चालू असून, त्यासाठी संपूर्ण दिवस लागणार आहे, असे मंडळाच्या अधिकृत सूत्रांकडून सांगण्यात आलेले आहे. वादळामुळे तयार झालेली भात शेती कणसाच्या वजनामुळे वाऱ्याबरोबर जमीनदोस्त झाली आहे, तर काही ठिकाणी सर्वच भातशेती पाण्याखाली केली आहे. हातातोंडाशी आलेल्या पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. कार्लेखिंड-रेवस विभागात आंबा कलमाच्या बागा आहेत, त्या बागांमधील झाडे कोसळल्याने बागायतदारांची मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे.या वादळामुळे परिसरातील वीजवाहिन्या, वीज खांबांचे नुकसान झाल्याने परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला होता. तडाख्याने अनेक ठिकाणच्या घरांवरील छपरे उडून गेली आहेत. वादळी पावसाने परिसरातील झाडे उन्मळून पडली. रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडांच्या फांद्या तुटून अनेक ठिकाणी पडल्याने चालकांना वाहने चालवताना अडचणी येत आहेत. अनेक ठिकाणी सुरूच्या बागांचे नुकसान झाले.चिरनेरला घरावर वीज कोसळून सामान खाकच्विजेच्या कडकडाटासह आलेल्या पावसामुळे शुक्र वारी चिरनेरमधील एक घर जळाले. घराला लागलेल्या आगीत सामानासह संपूर्ण घर खाक झाले. महसूल विभागाने केलेल्या पंचनाम्यात एकूण १७ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.च्शुक्र वारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास या घरावर वीज पडली आणि घराला आग लागली. संजय पाटील यांच्या मालकीच्या या घरातील मंडळी साखरचौथ गणपतीच्या दर्शनासाठी गेली असल्यामुळे जीवितहानी झाली नाही. आगीत घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तू टीव्ही, फ्रीज, कपाट, कपाटातील दागिने, घरातील अन्नधान्य, भांडी आणि कागदपत्रे जळून खाक झाली.च्विजेची तीव्रता एवढी होती की, घरातील भांडी, पंखे आणि कपाट वितळून गेले. कपाटातील दागिने आणि रोख रक्कम एक लाख ५० हजारही जळाले. चिरनेरचे सरपंच संतोष चिर्लेकर, पोलीस पाटील संजय पाटील, तलाठी यांनी रात्री उशिरापर्यंत घराचा पंचनामा केला. या वेळी १७ लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याचे सांगितले. शनिवार उरणच्या तहसीलदार कल्पना गोडे यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली आणि नैसर्गिक आपत्ती म्हणून या कुटुंबाला मदत करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

टॅग्स :RaigadरायगडRainपाऊस