शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

रायगडला वादळाचा तडाखा, जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2018 07:09 IST

अलिबाग, नागोठणेत वीजपुरवठा खंडित

अलिबाग : परतीच्या पावसाबरोबर जोरदार वादळाच्या तडाख्यामुळे शुक्रवारी अलिबाग, कार्लेखिंड, पेण, नागोठणे परिसरात मोठे नुकसान होऊन जनजीवन विस्कळीत झाले आहे. शुक्रवारी सायंकाळी ७ च्या सुमारास विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस सुरू झाला. कार्लेखिंड-रेवस विभागातील २२ तास वीजपुरवठा खंडित झाला. तर अलिबाग तालुक्यातील संपूर्ण वीजपुरवठा खंडित झाला. या वादळामुळे याचा फटका जास्त रेवस फिडरच्या लाइनला बसला आहे.

लघुदाब वाहिनी आणि उच्चदाब वाहिनीवरील विद्युत जनित्रयंत्रावर, इन्सुलेटरवर वीज कोसळून काही ठिकाणी तारा जंपर, तर पोल पडलेले आहेत. वादळामुळे विद्युत जनित्र यंत्र तुटून पडलेले आहेत. वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी युद्धपातळीवर काम चालू असून, त्यासाठी संपूर्ण दिवस लागणार आहे, असे मंडळाच्या अधिकृत सूत्रांकडून सांगण्यात आलेले आहे. वादळामुळे तयार झालेली भात शेती कणसाच्या वजनामुळे वाऱ्याबरोबर जमीनदोस्त झाली आहे, तर काही ठिकाणी सर्वच भातशेती पाण्याखाली केली आहे. हातातोंडाशी आलेल्या पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. कार्लेखिंड-रेवस विभागात आंबा कलमाच्या बागा आहेत, त्या बागांमधील झाडे कोसळल्याने बागायतदारांची मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे.या वादळामुळे परिसरातील वीजवाहिन्या, वीज खांबांचे नुकसान झाल्याने परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला होता. तडाख्याने अनेक ठिकाणच्या घरांवरील छपरे उडून गेली आहेत. वादळी पावसाने परिसरातील झाडे उन्मळून पडली. रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडांच्या फांद्या तुटून अनेक ठिकाणी पडल्याने चालकांना वाहने चालवताना अडचणी येत आहेत. अनेक ठिकाणी सुरूच्या बागांचे नुकसान झाले.चिरनेरला घरावर वीज कोसळून सामान खाकच्विजेच्या कडकडाटासह आलेल्या पावसामुळे शुक्र वारी चिरनेरमधील एक घर जळाले. घराला लागलेल्या आगीत सामानासह संपूर्ण घर खाक झाले. महसूल विभागाने केलेल्या पंचनाम्यात एकूण १७ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.च्शुक्र वारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास या घरावर वीज पडली आणि घराला आग लागली. संजय पाटील यांच्या मालकीच्या या घरातील मंडळी साखरचौथ गणपतीच्या दर्शनासाठी गेली असल्यामुळे जीवितहानी झाली नाही. आगीत घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तू टीव्ही, फ्रीज, कपाट, कपाटातील दागिने, घरातील अन्नधान्य, भांडी आणि कागदपत्रे जळून खाक झाली.च्विजेची तीव्रता एवढी होती की, घरातील भांडी, पंखे आणि कपाट वितळून गेले. कपाटातील दागिने आणि रोख रक्कम एक लाख ५० हजारही जळाले. चिरनेरचे सरपंच संतोष चिर्लेकर, पोलीस पाटील संजय पाटील, तलाठी यांनी रात्री उशिरापर्यंत घराचा पंचनामा केला. या वेळी १७ लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याचे सांगितले. शनिवार उरणच्या तहसीलदार कल्पना गोडे यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली आणि नैसर्गिक आपत्ती म्हणून या कुटुंबाला मदत करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

टॅग्स :RaigadरायगडRainपाऊस