शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षीक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
3
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
4
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
5
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीचं धक्कादायक कृत्य
6
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
7
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
8
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
9
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
10
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
11
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
12
कमाल! नणंद-भावजयीने फडकवला यशाचा झेंडा; एक DSP तर दुसरी टॅक्स ऑफिसर, रचला इतिहास
13
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
14
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
15
लग्नानंतर पती-पत्नीने केली कमाल! मेहनतीनं अभ्यास करून एकाचवेळी दोघेही बनले सरकारी अधिकारी
16
Travel : 'भारताचं स्कॉटलँड' पाहिलंय का? उन्हाळ्याच्या सुट्टीत मनाली-शिमला सोडा, 'या' नंदनवनाला नक्की भेट द्या!
17
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
18
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
19
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
20
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मिरची लागेल!
Daily Top 2Weekly Top 5

रायगडमध्ये सात तालुक्यांना वादळाचा धोका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2020 23:25 IST

प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा : जिल्ह्यातील समुद्र, खाडीकिनाऱ्यालगतच्या गावांमधील नागरिकांना घराबाहेर पडण्यास मनाई

लोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग : रायगड जिल्ह्याच्या सागरी किनारपट्टीला ३ जून रोजी निसर्ग चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला आहे. ताशी १०० ते १२० किलोमीटरच्या वेगाने वारे वाहणार आहेत. त्यामुळे वादळाची तीव्रता भयंकर रूप धारण करण्याची शक्यता असल्याने जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. रायगडमधील सात तालुक्यांना या वादळाचा फटका बसण्याची शक्यता असून समुद्र आणि खाडी किनाºयालगतच्या गावांमधील नागरिकांना मनाई आदेश लागू करण्यात आले आहेत.अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा झाल्यामुळे चक्रीवादळाची स्थिती निर्माण झाली आहे. निसर्ग असे या आपत्तीला नाव देण्यात आले आहे. सुरुवातीला श्रीवर्धनमधील हरिहरेश्वरच्या दिशेने हे वादळ सरकत असतानाच अचानक ते अलिबागला धडकण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तविली आहे. भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार ४ जूनपर्यंत महाराष्ट्र पश्चिम किनारपट्टीला चक्रीवादळाचा इशारा दिला आहे. रायगड जिल्ह्यातील अलिबाग, पेण, मुरूड, तळा, म्हसळा, श्रीवर्धन व रोहा या सात तालुक्यांतील किनाºयालगतच्या गावांमधील नागरिकांना मंगळवारी २ जून रात्री १२ वाजल्यापासून ३ जून रोजी रात्री १२ वाजेपर्यंत घराबाहेर पडण्यास तसेच पाळीव प्राण्यांना मोकळ्या जागेत सोडण्यास मनाई आदेश लागू करण्यात आला आहे. मासेमारीसाठी समुद्रात गेलेल्या ५ हजार ६६८ मच्छीमारांना परत बोलावून घेण्यात आले आहे. वादळी परिस्थिती लक्षात घेऊन वीजपुरवठा बंद करण्याची शक्यता आहे अशी जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी केले आहे.वादळाचा अलिबागला फटकाबसण्याची शक्यता कमी - राजाराम भगतआतापर्यंत मोठ्या प्रमाणात विविध आपत्तीचा तडाखा जिल्ह्यातील अन्य भागांना बसला आहे. मात्र अद्यापही चक्रीवादळाचा अथवा त्सुनामीचाही धक्का अलिबागला लागला नव्हता. येथील वयोवृध्द कोळी समाजातील नागरिकांच्या म्हणण्यानुसार अलिबागही रामभूमी (रामखंड) आहे. श्रीराम जेंव्हा सीतामाईला रावणाच्या तावडीतून सोडवण्यासाठी लंकेला निघाले होते. तेंव्हा काही कालावधीसाठी त्यांनी अलिबाग कुरुळ (उंडिचाभाट) येथे विश्रांती घेतली होती. अलिबागच्या समुद्र किनारपट्टीचा आकार हा रामाच्या धुनष्याप्रमाणे आहे.त्यामुळे चक्रीवादळाचा मोठा फटका बसलेला नाही, असे राजाराम भगत यांनी लोकमतला सांगितले. त्याचप्रमाणे सूर्यादयाच्या वेळी पश्चिमेला किंवा सूर्यास्ताच्या वेळी पूर्वेला आकाशामध्ये अर्ध्या आकाराचे इंद्रधनुष्य दिसते. ते अद्याप दिसलेले नाही. त्यामुळे वादळाचा धोका पोचण्याची शक्यता कमी असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. समुद्र किनाºयातील वाळूमधील खेकड्यांनी वाळूमध्ये खोलवर होल करुन घरे केली आणि त्या होलमधून पाण्याचे मोठे फुगे तयार झाल्यास वादळाची तिव्रता अधिक असते असेही त्यांनी सांगितले.पहिल्याच पावसात वीज वितरण कोलमडलेकळंबोली : जूनच्या पहिल्या दिवसापासूनच पनवेल परिसरात पावसाचे आगमन झाले आहे. मंगळवारी पाच वाजता वाºयासह पावसाला सुरुवात झाली. वाºयामुळे पनवेल परिसरात दोन तास बत्ती गुल झाल्यामुळे नागरीकांना त्रास सहन करावा लागला. अवघ्या काही मिनिटाच्या पावसात बत्ती गुल झाल्याने महावितरणचे आपत्ती व्यवस्थापन फोल ठरल्याने दिसून आले आहे.गेल्या काही दिवसापासून तापमाणाचा पारा वाढत असतानाच सोमवारपासून पनवेल परिसरात रिमझिम पावसाला सुरुवात झाली. दरवर्षी ७ जूनला पावसाचे आगमन होते. मात्र यंदा जूनच्या पहिल्या दिवसापासूनच पावसाने हजेरी लावली. मंगळवारी साडेपाच वाजण्याच्या सुमारास पावसाच्या सरी बरसल्या. यात पनवेल परिसरासह खांदा वसाहत, विचूंबे परिसरातील बत्ती गुल झाली.यामुळे लॉकडाउनमध्ये वर्क फॉम होम करणाऱ्यांची पंचाईत झाली. वारंवार वीज पुरवठा खंडीत होत असल्याने मोबाईल , लॅपटॉप बंद पडून कामात खोळंबा झाला. वास्तविक, पावसाळ्यात वीज पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी महावितरणकडून मान्सूनपूर्व कामे, वेळोवेळी शटडाऊन घेण्यात आले आहे. मात्र पहिल्याच पावसात बत्ती गुल झाल्याने महावितरणचे आपत्ती व्यवस्थापन फोल ठरले आहे.

टॅग्स :Cyclone Nisargaनिसर्ग चक्रीवादळ