शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

श्रीवर्धनमधील पर्यटनाला वादळाचा फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2019 01:21 IST

पावसाने झोडपले : दिघी किनाऱ्यावरील मच्छीमारांना सतर्कतेचा इशारा; वृक्ष कोसळल्याने वीजपुरवठा ठप्प

दिघी : गुजरातच्या किनाºयावर धडकणाºया वायू या चक्रिवादळाचा तडाखा श्रीवर्धनमधील किनारपट्टीला बसला आहे. दिघी खाडीतून होणारी दिघी-आगरदांडा ही जलवाहतूक बंद करण्यात आली आहे. वायू चक्रिवादळाचा श्रीवर्धन तालुक्यातील पर्यटनाला मोठा फटका बसला असून, समुद्रकिनारी सध्या शुकशुकाट आहे.

श्रीवर्धन तालुक्यातील पर्यटन व्यावसायिकांना रोजगार मिळवण्यासाठी मान्सूनपूर्व जून महिन्यातील सुरुवातीचा काही कालावधी महत्त्वाचा असतो. मे महिन्याच्या शेवटच्या दिवसांत पर्यटन हळूहळू वाढू लागते. मुंबई, पुणे साताराहून येणारे पर्यटक दिघी जंगलजेटी मार्गे फेरी बोटीने येतात. यामुळे श्रीवर्धन, हरिहरेश्वर, दिवेआगर अशा विस्तीर्ण समुद्रकिनाºयाला पर्यटकांची पसंती राहते. वायू चक्रिवादळाचे राज्यातील संकट टळले असले, तरी वादळामुळे कोकण किनारी भागातील पर्यटनाला फटका बसला आहे. बुधवार दिवसभर ढगाळ वातावरण होते. दिवसा हलक्या व रात्री जोरदार सरी पडल्या. पावसामुळे विद्युतपुरवठा खंडित होता.वादळामुळे समुद्र खवळलेला असून सहा मीटर उंचीच्या लाटा उसळणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे मच्छीमार, पर्यटक, नागरिकांना सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे. चक्रिवादळ अरबी समुद्रातच घोंगावणार असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे. मात्र, त्याचा परिणाम काही प्रमाणात कोकण, गोव्यातील समुद्रकिनाऱ्यांवर जाणवण्याची शक्यता असल्याने कोकणासह अनेक भागांत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली.प्रवासी जलवाहतूक बंदवादळामुळे बुधवारी दुपारपासून दिघी ते जंजिरा किल्ला व राजपुरी ते किल्ला लाँच तसेच दिघी ते आगरदांडा ही प्रवासी वाहतूकही बंद राहणार असल्याची माहिती दिघी बंदर निरीक्षक प्रकाश गुंजाळ यांनी दिली. पुढील आदेश येईपर्यंत ही वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे.प्रशासनाची सतर्कताच्श्रीवर्धन तहसील विभागाकडून दिघी बंदर परिसरात सतर्कता घेण्यात आली आहे. बुधवारी वादळी पावसामुळे श्रीवर्धन-कार्ले-बोर्लीपंचतन मार्गावर वावेपंचतन येथे वृक्ष कोसळल्याने वाहतूक काही काळ खोळंबली होती. दिवेआगरमधील ग्रामसेवक शंकर मयेकर आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने वृक्ष बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.च्दिघी सागरी पोलिसांकडून सावधानतेचे आवाहन केले जात आहे. वादळामुळे कोणतीही दुर्घटना होऊ नये, यासाठी खबरदारी घेत असल्याचे दिघी सागरी पोलीस ठाण्याचे सहा पोलीस निरीक्षक डी. टी. सोनके यांनी सांगितले. किनाºयावरील धोका पाहता समुद्रकिनारी पर्यटकांनी जाऊ नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. 

टॅग्स :Raigadरायगडtourismपर्यटनCyclone Vayuवायू चक्रीवादळ