शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
3
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
4
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
5
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
6
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
7
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
8
Travel : मन मोहून टाकतील असे भारतातील 'हिडन' हिल स्टेशन्स; ९०% लोकांना या जागांबद्दल माहितीच नाही!
9
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
10
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
11
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
12
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
13
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
14
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट
15
अरे बापरे! डोक सटकलं आणि गेम झोनच्या कर्मचाऱ्याचे नाक युवकाने हातोड्याने फोडले
16
११ कोटींची लॉटरी जिंकणारा 'तो' व्यक्ती अखेर सापडला! रस्त्यावर विकत होता कांदे-बटाटे अन्...
17
Smartphones: २४ जीबी रॅम, ७५०० mAh बॅटरी आणि सुपरफास्ट चार्जिंग; जबरदस्त फोन लॉन्च!
18
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
19
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
20
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!

श्रीवर्धनमधील पर्यटनाला वादळाचा फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2019 01:21 IST

पावसाने झोडपले : दिघी किनाऱ्यावरील मच्छीमारांना सतर्कतेचा इशारा; वृक्ष कोसळल्याने वीजपुरवठा ठप्प

दिघी : गुजरातच्या किनाºयावर धडकणाºया वायू या चक्रिवादळाचा तडाखा श्रीवर्धनमधील किनारपट्टीला बसला आहे. दिघी खाडीतून होणारी दिघी-आगरदांडा ही जलवाहतूक बंद करण्यात आली आहे. वायू चक्रिवादळाचा श्रीवर्धन तालुक्यातील पर्यटनाला मोठा फटका बसला असून, समुद्रकिनारी सध्या शुकशुकाट आहे.

श्रीवर्धन तालुक्यातील पर्यटन व्यावसायिकांना रोजगार मिळवण्यासाठी मान्सूनपूर्व जून महिन्यातील सुरुवातीचा काही कालावधी महत्त्वाचा असतो. मे महिन्याच्या शेवटच्या दिवसांत पर्यटन हळूहळू वाढू लागते. मुंबई, पुणे साताराहून येणारे पर्यटक दिघी जंगलजेटी मार्गे फेरी बोटीने येतात. यामुळे श्रीवर्धन, हरिहरेश्वर, दिवेआगर अशा विस्तीर्ण समुद्रकिनाºयाला पर्यटकांची पसंती राहते. वायू चक्रिवादळाचे राज्यातील संकट टळले असले, तरी वादळामुळे कोकण किनारी भागातील पर्यटनाला फटका बसला आहे. बुधवार दिवसभर ढगाळ वातावरण होते. दिवसा हलक्या व रात्री जोरदार सरी पडल्या. पावसामुळे विद्युतपुरवठा खंडित होता.वादळामुळे समुद्र खवळलेला असून सहा मीटर उंचीच्या लाटा उसळणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे मच्छीमार, पर्यटक, नागरिकांना सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे. चक्रिवादळ अरबी समुद्रातच घोंगावणार असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे. मात्र, त्याचा परिणाम काही प्रमाणात कोकण, गोव्यातील समुद्रकिनाऱ्यांवर जाणवण्याची शक्यता असल्याने कोकणासह अनेक भागांत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली.प्रवासी जलवाहतूक बंदवादळामुळे बुधवारी दुपारपासून दिघी ते जंजिरा किल्ला व राजपुरी ते किल्ला लाँच तसेच दिघी ते आगरदांडा ही प्रवासी वाहतूकही बंद राहणार असल्याची माहिती दिघी बंदर निरीक्षक प्रकाश गुंजाळ यांनी दिली. पुढील आदेश येईपर्यंत ही वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे.प्रशासनाची सतर्कताच्श्रीवर्धन तहसील विभागाकडून दिघी बंदर परिसरात सतर्कता घेण्यात आली आहे. बुधवारी वादळी पावसामुळे श्रीवर्धन-कार्ले-बोर्लीपंचतन मार्गावर वावेपंचतन येथे वृक्ष कोसळल्याने वाहतूक काही काळ खोळंबली होती. दिवेआगरमधील ग्रामसेवक शंकर मयेकर आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने वृक्ष बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.च्दिघी सागरी पोलिसांकडून सावधानतेचे आवाहन केले जात आहे. वादळामुळे कोणतीही दुर्घटना होऊ नये, यासाठी खबरदारी घेत असल्याचे दिघी सागरी पोलीस ठाण्याचे सहा पोलीस निरीक्षक डी. टी. सोनके यांनी सांगितले. किनाºयावरील धोका पाहता समुद्रकिनारी पर्यटकांनी जाऊ नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. 

टॅग्स :Raigadरायगडtourismपर्यटनCyclone Vayuवायू चक्रीवादळ