शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
2
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
3
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
4
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
6
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
7
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
8
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
9
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
10
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
11
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
12
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
13
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
14
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
15
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
16
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
17
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
18
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
19
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
20
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

श्रीवर्धनमधील पर्यटनाला वादळाचा फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2019 01:21 IST

पावसाने झोडपले : दिघी किनाऱ्यावरील मच्छीमारांना सतर्कतेचा इशारा; वृक्ष कोसळल्याने वीजपुरवठा ठप्प

दिघी : गुजरातच्या किनाºयावर धडकणाºया वायू या चक्रिवादळाचा तडाखा श्रीवर्धनमधील किनारपट्टीला बसला आहे. दिघी खाडीतून होणारी दिघी-आगरदांडा ही जलवाहतूक बंद करण्यात आली आहे. वायू चक्रिवादळाचा श्रीवर्धन तालुक्यातील पर्यटनाला मोठा फटका बसला असून, समुद्रकिनारी सध्या शुकशुकाट आहे.

श्रीवर्धन तालुक्यातील पर्यटन व्यावसायिकांना रोजगार मिळवण्यासाठी मान्सूनपूर्व जून महिन्यातील सुरुवातीचा काही कालावधी महत्त्वाचा असतो. मे महिन्याच्या शेवटच्या दिवसांत पर्यटन हळूहळू वाढू लागते. मुंबई, पुणे साताराहून येणारे पर्यटक दिघी जंगलजेटी मार्गे फेरी बोटीने येतात. यामुळे श्रीवर्धन, हरिहरेश्वर, दिवेआगर अशा विस्तीर्ण समुद्रकिनाºयाला पर्यटकांची पसंती राहते. वायू चक्रिवादळाचे राज्यातील संकट टळले असले, तरी वादळामुळे कोकण किनारी भागातील पर्यटनाला फटका बसला आहे. बुधवार दिवसभर ढगाळ वातावरण होते. दिवसा हलक्या व रात्री जोरदार सरी पडल्या. पावसामुळे विद्युतपुरवठा खंडित होता.वादळामुळे समुद्र खवळलेला असून सहा मीटर उंचीच्या लाटा उसळणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे मच्छीमार, पर्यटक, नागरिकांना सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे. चक्रिवादळ अरबी समुद्रातच घोंगावणार असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे. मात्र, त्याचा परिणाम काही प्रमाणात कोकण, गोव्यातील समुद्रकिनाऱ्यांवर जाणवण्याची शक्यता असल्याने कोकणासह अनेक भागांत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली.प्रवासी जलवाहतूक बंदवादळामुळे बुधवारी दुपारपासून दिघी ते जंजिरा किल्ला व राजपुरी ते किल्ला लाँच तसेच दिघी ते आगरदांडा ही प्रवासी वाहतूकही बंद राहणार असल्याची माहिती दिघी बंदर निरीक्षक प्रकाश गुंजाळ यांनी दिली. पुढील आदेश येईपर्यंत ही वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे.प्रशासनाची सतर्कताच्श्रीवर्धन तहसील विभागाकडून दिघी बंदर परिसरात सतर्कता घेण्यात आली आहे. बुधवारी वादळी पावसामुळे श्रीवर्धन-कार्ले-बोर्लीपंचतन मार्गावर वावेपंचतन येथे वृक्ष कोसळल्याने वाहतूक काही काळ खोळंबली होती. दिवेआगरमधील ग्रामसेवक शंकर मयेकर आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने वृक्ष बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.च्दिघी सागरी पोलिसांकडून सावधानतेचे आवाहन केले जात आहे. वादळामुळे कोणतीही दुर्घटना होऊ नये, यासाठी खबरदारी घेत असल्याचे दिघी सागरी पोलीस ठाण्याचे सहा पोलीस निरीक्षक डी. टी. सोनके यांनी सांगितले. किनाºयावरील धोका पाहता समुद्रकिनारी पर्यटकांनी जाऊ नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. 

टॅग्स :Raigadरायगडtourismपर्यटनCyclone Vayuवायू चक्रीवादळ