शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

शोधमोहिमेला पूर्णविराम! मंत्री उदय सामंत यांची माहिती; इर्शाळवाडीत २७ मृतदेह लागले हाती

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2023 05:35 IST

५७ जण बेपत्ता . रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी येथे बुधवारी रात्री दरड कोसळून अनेक घरे ढिगाऱ्याखाली गाडली गेली.

अलिबाग : रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी येथे बुधवारी रात्री दरड कोसळून अनेक घरे ढिगाऱ्याखाली गाडली गेली. यानंतर तीन दिवस प्रशासनातर्फे तेथे बचावकार्य सुरू होते. ही शोधमोहीम रविवारी साडेपाच वाजता थांबविण्यात आली आहे, अशी माहिती रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांनी रविवारी दिली. आतापर्यंत ढिगाऱ्याखालून २७ मृतदेह बाहेर काढले असून, ५७ जण अजूनही बेपत्ता आहेत. बेपत्ता ग्रामस्थांना मृत घोषित करण्याबाबत राज्य सरकार निर्णय घेईल. तळिये येथील दुर्घटनेवेळी घेतलेल्या निर्णयाप्रमाणे तसा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाला राज्य सरकारला पाठवावा लागणार आहे. 

रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांनी इर्शाळवाडी येथील दुर्घटनास्थळी भेट देत खालापूर पोलिस ठाण्यात सर्व अधिकाऱ्यांची रविवारी बैठक घेतली. त्यानंतर ग्रामस्थांशी चर्चा करून शोध व बचाव मोहीम थांबवत असल्याचे त्यांनी जाहीर केले. यावेळी आ. महेश बालदी, आ. महेंद्र थोरवे, विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर, विशेष पोलीस निरीक्षक प्रविण पवार, जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे, जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बढे, एनडीआरएफ कंमाडर तिवारी उपस्थित होते.

सिडकोमार्फत जागेचा विकास

संबंधित कुटुंबांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्यासाठी जागा निश्चित करून सिडकोमार्फत या जागेचा विकास करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. तसेच आ. महेश बालदी यांनी विधानसभेत दिलेल्या माहितीनुसार ५ वाड्यांचे आणि जिल्ह्यातील २० धोकादायक गावांचे पुनर्वसन करण्याबाबत शासन सकारात्मक असल्याचेही उदय सामंत यांनी सांगितले.

एक हजार लोकांमार्फत बचावकार्य

दुर्घटनेच्या ठिकाणी बचाव कार्यासाठी एनडीआरएफ, टीडीआरएफर, इमॅजिका कामगार, सिडकोचे कर्मचारी तसेच इतर सामाजिक स्वयंसेवी संस्थाचे प्रतिनिधी असे एकूण जवळपास १ हजार १०० लोकांनी चांगले काम केले, त्यांचे शासनामार्फत आभार मानले. भविष्यात अशी दुर्दैवी घटना घडू नये म्हणून शासन खबरदारी घेईन, असेही सामंत यांनी स्पष्ट केले.

हजारांवर गावे दरडीच्या सावटाखाली !

कोकण विभागातील २० टक्क्याहून अधिक  म्हणजे तब्बल १,०५० गावे   दरडप्रवण क्षेत्रात आहेत. ‘दुसरी इर्शाळवाडी’ घडण्यापूर्वी संबंधित गावातील रहिवाशांचे तातडीने स्थलांतर करणे गरजेचे आहे. 

इर्शाळवाडी येथे दरड कोसळल्याने आदिवासी वाडीतील ४३ घरे मातीच्या ढिगाऱ्याखाली गेली. इर्शाळवाडीतील लोकसंख्या २२८ इतकी होती. यापैकी या दुर्घटनेत २७ लोक मृत्युमुखी पडले. ५७ लोक बेपत्ता असून १४४ लोक हयात आहेत. हयात असलेल्या लोकांचे तात्पुरत्या जागेत पुनर्वसन करण्यात आले आहे. तसेच त्यांना लागणाऱ्या सर्व सोयी-सुविधा शासनाकडून पुरविण्यात आल्या आहेत.- उदय सामंत, पालकमंत्री, रायगड

पुनर्वसन लवकरच करण्याचे आश्वासन 

या दुर्घटनेतून वाचलेल्या १४४ जणांचे लवकरात लवकर पुनर्वसन केले जाईल, असेही पालकमंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले. तसेच अशी घटना पुन्हा होऊ नये म्हणून पाच आदिवासी वाड्यांचे पुनर्वसन करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Raigad Irshalwadi Landslide Incidentरायगड इर्शाळवाडी दुर्घटना प्रकरणRaigadरायगड