शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
4
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
5
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
6
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
7
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
8
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
9
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
10
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
11
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
12
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
13
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
14
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
15
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
16
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
17
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
18
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
19
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
20
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...

जिल्ह्यातील १५ पैकी ७ पंचायत समितींवर महिलांचे राज्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2019 23:57 IST

पंचायत समिती सभापतिपदाचे आरक्षण जाहीर

अलिबाग : रायगड जिल्ह्यातील १५ तालुक्यांपैकी सात पंचायत समितींवर महिलाराज अस्तित्वात येणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील विकासाची दोरी महिलांच्या हाती येणार असल्याने काही ठिकाणची पुरुषी राजवट संपुष्टात आली आहे. पंचायत समिती सभापतिपदासाठीचे आरक्षण मंगळवारी जिल्हाधिकाºयांच्या अध्यक्षतेखाली राजस्व सभागृहात एका लहान मुलीच्या हस्ते सोडत पद्धतीने काढण्यात आले. आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर विविध राजकीय पक्षांनी आता मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे.

मुरुड, पेण पंचायत समितीचे सभापतिपद नागरिकांचा मागास प्रवर्गातील (नामाप्र) महिलेसाठी आरक्षित ठेवण्यात आले आहे. पोलादपूर, म्हसळा, तळा आणि महाड पंचायत समितीच्या सभापतिपदी सर्वसाधारण प्रवर्गातील महिलेसाठी राखीव करण्यात आले आहे. अलिबाग, उरण, कर्जत आणि सुधागड पंचायत समितीच्या सभापतिपदी आता सर्वसाधारण गटातील सदस्य विराजमान होणार आहेत. पनवेल पंचायत समितीच्या सभापतिपदी अनुसूचित जमाती प्रवर्गातील महिला कारभार पाहणार आहेत, तर रोहा पंचायत समितीचे सभापतिपद अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आले आहे.

खालापूर आणि श्रीवर्धन पंचायत समितीचे सभापतिपद हे नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी राखून ठेवण्यात आले आहे. माणगाव पंचायत समिती सभापतिपदी अनुसूचित जातीसाठी आरक्षित झाले आहे.गेल्या काही दिवसांपासून या आरक्षण सोडतीकडे विविध राजकीय पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे लक्ष लागले होते. चिठ्ठी सोडत पद्धतीने आरक्षण काढण्यात आले तसेच त्यामध्ये जास्तीत जास्त महिलाराज आल्याने अनेक इच्छुक उमेदवारांचा अपेक्षा भंग झाला आहे. काहींनी या सोडतीबाबत नाराजी व्यक्त केली, तर काहींनी समाधान व्यक्त केले आहे. या वेळी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात सर्व पक्षातील कार्यकर्ते उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीत ही सोडत जाहीर करण्यात आली.

म्हसळा सभापती आरक्षण सर्वसाधारण महिला

रायगड जिल्हात पंचायत समितीच्या सभापतिपदांची आरक्षणाची सोडत आजच जाहीर झाल्याने म्हसळा पंचायत समितीचे सभापती सर्वसाधारण महिला आरक्षण पडले आहे. यामुळे म्हसळा पंचायतीच्या सदस्यांचा अपेक्षाभंग झाल्याने आपल्या राजकीय कारकिर्दीत सभापतिपदाची उत्सुकता सदस्यांना असताना सभापतिपदाचा बहुमान आरक्षणामुळे गमवावा लागला आहे.

म्हसळा पंचायत समितीचे सदस्य मधुकर गायकर, संदीप चाचले यांनी उपसभापतिपद स्वीकारले होते. सुरुवातीला सभापती उज्ज्वला सावंत तर उपसभापती मधुकर गायकर यांनी सव्वा वर्षाचा कार्यकाळ पार पडला, त्यानंतर पक्षाच्या आदेशानुसार पुन्हा सव्वा वर्षासाठी सभापती छाया म्हात्रे, उपसभापती संदीप चाचले हे पदावर विराजमान झाले;

आपल्याला सभापतिपद भेटेल अशी अपेक्षा ठेवून काम करत असताना आरक्षण सर्वसाधारण महिला पडल्याने आपले दरवाजे बंद झाले. आता पुढील अडीच वर्षे दोन सदस्यांना उपसभापतिपदावरच समाधान मानावे लागणार आहे. तर सभापतिपदासाठी पुन्हा एकदा महिलाराज म्हणून उज्ज्वला सावंत यांना संधी प्राप्त झाल्याचे संकेत नाकारता येत नाहीत.

टॅग्स :ElectionनिवडणूकRaigadरायगड