शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

रायगडसाठी सरकारने उघडली तिजोरी; आणखी ३०१ कोटी मंजूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2020 00:28 IST

; मदतीचा आकडा पोहोचला ३७३ कोटी रुपयांवर

अलिबाग : रायगड जिल्ह्यातील नुकसानग्रस्तांच्या मदतीसाठी सरकारने आणखीन ३०१ कोटी रुपयांची आर्थिक मदत मंजूर केली असल्याची माहिती रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी येथे दिली. जिल्ह्यात निसर्ग चक्रीवादळामुळे झालेले नुकसान आणि त्या अनुषंगाने प्रशासन करत असलेल्या कार्यवाहीचा आढाव पालकमंत्री आदिती तटकरे यांनी शुक्रवारी अलिबाग येथे घेतला. त्यानंतर, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेते त्या बोलत होत्या.आतापर्यंत ७२ कोटी रुपयांचे अनुदान जिल्ह्याला प्राप्त झाले आहे. मदत वाटपाचे काम सुरू आहे. जिल्ह्यात झालेले नुकसान लक्षात घेऊन, राज्य सरकारने आणखी ३०१ कोटी रुपयांची वाढीव आर्थिक मदत रायगडला देऊ केली आहे. यापैकी २४२ कोटी रुपयांची मदत ही पडघड झालेल्या घरांच्या उभारणीसाठी आहे. आतापर्यंत प्रशासनाने केलेल्या पंचनाम्यांनुसार घरांचे ३९५ कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचे समोर आले. अजूनही पंचनामे करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे नुकसानीचा आकडा सुमारे ७०० कोटी रुपयांच्या घरात जाण्याचा अंदाज आहे, असेही तटकरे यांनी सांगितले.दरम्यान, ३०१ कोटी जिल्हा प्रशासनाकडे जमा झाल्यानंतर पुढील आठ ते पंधरा दिवसांत ही मदत नुकसानग्रस्तांच्या खात्यांमध्ये जमा होईल, असा विश्वास पालकमंत्र्यांनी दिला आहे.याप्रसंगी जिल्हाधिकारी निधी चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे, अपर जिल्हाधिकारी डॉ.भरत शितोळे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्यावर खासदार नाराजपत्रकार परिषदेच्या सुरुवातीलाच खासदार सुनील तटकरे यांनी जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्यावर नाराजी प्रकट केली. काही ठिकाणी वीज, इंटरनेट नसल्याने राष्ट्रीयकृत बँका आपत्तीची मदत लाभार्थ्यांना देत नाहीत. लाभार्थी सरकारच्या मदतीपासून वंचित राहत आहेत, हे योग्य नाही. आपण तातडीने बँकेच्या व्यवस्थापनाला सूचना करा, असे निर्देश खासदार तटकरे यांनी दिले.भूमिगत वीजवाहिनीचे काम सुरूराष्ट्रीय आपत्ती धोके निवारण योजनेंतर्गत अलिबाग शहरामध्ये ८९ कोटी रुपयांच्या भूमिगत वीजवाहिनीच्या कामांना सुरुवात झालेली आहे. त्याचप्रमाणे कोस्टल विभागातील उरण, मुरुड आणि श्रीवर्धन या शहरांमध्येही लवकरच भूमिगत वीजवाहिनी टाकण्याच्या कामासाठी सरकारकडून मंजुरी घेण्यात येईल.मच्छीमारांना मिळणार नुकसानभरपाईज्या मच्छीमारांच्या होड्यांचे नुकसान झाले आहे, त्यापैकी अंशत: नुकसानीसाठी पूर्वी चार हजार रुपये देण्यात येत होते. त्यात वाढ करून अंशत: नुकसानीसाठी १० हजार रुपयांची मदत देण्यात येणार आहे, तर ज्या होड्यांचे पूर्णत: नुकसान झाले आहे, त्यांना २५ हजार रुपयांची मदत दिली जाणार असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.नारळ, सुपारी, कोकम यांचा नुकसानीच्या यादीत सामावेशनारळ, सुपारी आणि कोकम या पिकांचा नुकसानीमध्ये समावेश करण्यात आला नव्हता.त्यामुळे आता नव्याने या पिकांचा समावेश नुकसानीच्या यादीत करण्यात आला असल्याने बागायतदार शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.नुकसानीची नोंदणी करताना जुन्या निकषानुसार रोजगार हमी योजना लागू करण्याची मागणी नागरिकांनी व्यक्त केली होती.त्यानुसार, सरकारकडे मागणी केली आहे, तसेच कोकणामध्ये बागायतदारांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे कृषी विद्यापीठाने किमान तीन गावे दत्तक घ्यावीत, अशी मागणीही करण्यात आली असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.खासगी शाळांना मिळणार मदतसरकारी शाळांबरोबरच खासगी शाळांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सरकारी शाळांना ज्या निकषानुसार नुकसानभरपाई देण्यात येईल, तेच निकष खासगी शाळांसाठी राहणार आहेत.गणपती कारखानदारांनाही निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा बसला आहे. त्यामुळे त्यांनाही नुकसानभरपाई देण्यात येणार असल्याचे तटकरे यांनी सांगितले. जिल्ह्यातील आदिवासी वाड्यांमधील घरांचे मोठ्या संख्येने नुकसान झाले आहे.आदिवासी बांधवांनी स्वत:च तात्पुरती घरांची डागडुजी केली आहे. त्यामुळे प्रशासन पंचनामे करण्यासाठी तेथे गेल्यावर नुकसानीचे फोटो मागत आहेत. मात्र, तांत्रिक निकषात पंचनामे अडकवू नका, असे आदेश त्यांनी जिल्हा प्रशासनाला तटकरे यांनी दिले.

टॅग्स :Cyclone Nisargaनिसर्ग चक्रीवादळ