शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

रायगड संवर्धनाच्या कामाला येत्या २० दिवसांत प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2018 03:10 IST

रायगड प्रधिकरणाच्या माध्यमातून ६०६ कोटी रुपये खर्च करून रायगड संवर्धन प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. येत्या २० दिवसांमध्येच या कामाला प्रत्यक्षात प्रारंभही करण्यात येणार आहे. या कामादरम्यान शासकीय अधिकाºयांकडून कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार झाल्यास तो प्रकार सहन करणार नाही.

महाड : रायगड प्रधिकरणाच्या माध्यमातून ६०६ कोटी रुपये खर्च करून रायगड संवर्धन प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. येत्या २० दिवसांमध्येच या कामाला प्रत्यक्षात प्रारंभही करण्यात येणार आहे. या कामादरम्यान शासकीय अधिकाºयांकडून कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार झाल्यास तो प्रकार सहन करणार नाही. त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराच रायगड प्रधिकरणाचे अध्यक्ष खा. युवराज छत्रपती संभाजीराजे यांनी महाड येथे दिला.मंगळवारी खा. संभाजीराजे यांनी किल्ले रायगडला भेट दिली. त्यानंतर त्यांनी महाड शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधला. रायगड संवर्धन प्रकल्पासाठी राज्य शासनाने ६०६ कोटी रु पयांचा निधी मंजूर केला आहे. त्यापैकी ११२ कोटी रुपये किल्ले रायगडावरील विविध अवशेषांचे संवर्धन करण्यासाठी वापरण्यात येणार असून, उर्वरित निधीतून रायगड परिसरातील २१ गावांमध्ये पर्यटनाच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. संवर्धन मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात किल्ले रायगडावर किमान साडेतीनशे ठिकाणी उत्खनन, नैसर्गिक स्वरूपातील पथवे आणि रायगड रोपवे (गड), कुशावर्त तलाव ते होळीचा माळ रस्ता, ही तीन कामे प्रथम हाती घेण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. पाचाड येथे राजमाता जिजाऊ राजवाडा परिसरात ८८ एकर जागा संपादित करण्यात येणार असून, तेथे पीपीपी तत्त्वावर संग्रहालय उभारण्यात येणार आहे. या ठिकाणी शिवकालीन सरदारांची माहिती, त्यांच्या वंशजांकडून मिळालेल्या ऐतिहासिक वस्तूंचेही जतन करण्यात येणार आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचीही भेट घेतली आहे. त्यांनी राज्यातील गडकोटांची जी छायाचित्रे काढली आहेत, ती छायाचित्रे या संग्रहालयात ठेवण्यासाठी उपलब्ध करून देण्याचे आवाहन केल्याचेही खा. संभाजीराजे यांनी सांगितले.यापूर्वी किल्ले रायगडावरील उत्खननात सापडलेल्या आणि सध्या पुरातत्त्व विभागाच्या औरंगाबाद येथील संग्रहालयात ठेवण्यात आलेल्या शिवकालीन वस्तू या संग्रहालयात ठेवण्यात येतील. त्याचप्रमाणे नव्याने करण्यात येणाºया उत्खननात सापडलेल्या शिवकालीन वस्तूदेखील या संग्रहालयात ठेवण्यात येणार आहेत. ज्या लोकांकडे शिवकालीन वस्तू असतील, त्यांनीही त्या या संग्रहालयात ठेवण्यासाठी उपलब्ध करून द्याव्यात, असे आवाहन खा. संभाजीराजे यांनी केले. छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसदार किंवा खासदार म्हणून नव्हे, तर एक शिवभक्त म्हणून रायगड प्रधिकरणाच्या अध्यक्षपदाचे आव्हान स्वीकारलेले आहे. मला रायगडमधून कोणतीही निवडणूक लढवायची नाही, रायगड संवर्धनाची जबाबदारी यशस्वीरीत्या पूर्ण करून आपण परत जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.१प्रत्यक्ष किल्ल्यावरील कामात, रायगडचे नैसर्गिक स्वरूप जपण्यावर भर देण्यात येणार आहे. ज्या ठिकाणी जाणे अवघड आहे, त्या ठिकाणी जाण्यासाठी नैसर्गिक टच असलेला रस्ता आणि अन्य सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्या तरी तेथील दुर्गम भाग कायम ठेवण्यात येणार आहे. केवळ साहसी व्यक्तीच तेथे जाऊ शकतील, असा या मागचा उद्देश असल्याचे ते म्हणाले.२रायगड संवर्धन प्रकल्पासाठी राज्य शासनाने ६०६ कोटी रु पयांचा निधी मंजूर केला आहे. हा निधी एकदाच उपलब्ध होणार आहे. त्यानंतर दुरु स्ती आणि देखभालीच्या कामासाठी शासनाकडून कोणताही निधी उपलब्ध होणार नाही. त्यामुळे प्रधिकरणाच्या माध्यमातून दुरु स्ती आणि देखभालीच्या कामासाठी स्वतंत्र निधी उभा करणे गरजेचे आहे. त्यासाठी काय करता येईल? यावर विचार सुरू असल्याचे ते म्हणाले.३महाड (नातेखिंड) ते रायगड या राज्यमार्गाचे राष्ट्रीय महामार्गात रूपांतर करण्यात येणार आहे. मात्र, हा महामार्ग इतर महामार्गांसारखा साचेबंद नसावा, त्याला इतिहासकालीन स्वरूप दिले जावे, अशी भूमिका खा. संभाजीराजे यांनी या वेळी मांडली. या संदर्भात लवकरच आपण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करणार असल्याचे सांगितले.- रायगड प्रधिकरणाच्या माध्यमातून रायगड संवर्धनाचे जे काम करण्यात येणार आहे, ते पारदर्शक असेल. याची ग्वाही खा. संभाजीराजे यांनी दिली. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हे काम करून घेतले जाणार आहे. मात्र, महाड सार्वजनिक बांधकाम विभागाचा कारभार पारदर्शक नाही, हा विभाग भ्रष्टाचाराच्या दलदलीत अडकला आहे.या विभागातील अधिकारी भ्रष्ट आहेत, ही बाब पत्रकारांनी खा. संभाजीराजे यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यावर भाष्य करताना, प्रधिकरणाचा अध्यक्ष म्हणून प्रत्येक कामावर बारकाईने लक्ष राहणार आहे, त्यामुळे कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार खपवून घेणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. कामामध्ये काहीही चुकीचे होत असल्यास ती बाब लक्षात आली तर योग्य ती कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Raigadरायगड