शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

वाळीत प्रथा हे सामाजिक प्रदूषण

By admin | Updated: September 11, 2015 01:17 IST

वाळीत प्रथा हे सामाजिक प्रदूषण आहे. यामुळे सामाजिक एकता नाहीशी होत आहे. सामाजिक स्वाथ्य बिघडवणाऱ्या या अनिष्ट प्रथेविरु ध्द सर्वांनी लोकशाही मार्गाने एल्गार पुकारला

अलिबाग : वाळीत प्रथा हे सामाजिक प्रदूषण आहे. यामुळे सामाजिक एकता नाहीशी होत आहे. सामाजिक स्वाथ्य बिघडवणाऱ्या या अनिष्ट प्रथेविरु ध्द सर्वांनी लोकशाही मार्गाने एल्गार पुकारला पाहिजे अशी अपेक्षा मानवी हक्क संरक्षण क्षेत्रात सक्रिय कार्यरत अ‍ॅड. असीम सरोदे यांनी केले. गुरुवारी अलिबाग प्रेस असोसिएशनर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘वाळीत प्रथा एक शाप ’ या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. पी. एन. पी. एज्युकेशन सोसायटी मुख्यालय सभागृहात आयोजित या कार्यक्र मास अ‍ॅड. दत्ता पाटील कॉलेज आॅफ लॉच्या उपप्राचार्या अ‍ॅड. नीलम हजारे, अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे सरचिटणीस नितीनकुमार राऊत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. अ‍ॅड.सरोदे म्हणाले, पैसा, राजकीय ताकद, दंड शक्ती आणि स्वत:चेच महत्व टिकवून राहावे असे वाटणाऱ्या लोकांनी जातपंचायती व गावकी वाढविल्या. जातपंचायत व गावकी या बदला घेण्याचे केंद्रच बनले आहे. अमानुषतेचा राक्षस जातपंचायती जोपासत आहेत.हा राक्षस लोकशाहीच्या मुळावर उठला आहे. हा भस्मासूर वेळीच गाडला पाहिजे, असे सांगितले.वाळीत प्रकरणात जे तक्र ारदार असतात त्यांची बाजू समजून घेणे गरजेचे आहे. पोलीस तसे करत नाहीत. वाळीत प्रकरणांची तक्र ार पोलीस दाखल करून घेत नाहीत. तक्र ार दाखल करताना पोलीस पुरावे मागतात. हे चुकीचे आहे. पोलिसांनी न्यायालयाची भूमिका स्वीकारु नये. त्यांनी तक्र ार दाखल करून घ्यावी. आपली तक्र ार खरी आहे हे तक्र ारदार न्यायालयात सिध्द करेल. ती त्याची जबाबदारी. तक्र ार दाखल करून घेणे व त्याची प्रत तक्र ारदाराला देणे ही पोलिसांची जबाबदारी असल्याचे अ‍ॅड.सरोदे यांनी स्पष्ट केले.संपूर्ण महाराष्ट्रात सामाजिक बहिष्काराची सर्वाधिक प्रकरणे रायगड जिल्ह्यात घडली आहेत. या जिल्ह्यातील अनेक कुटुंबे गावकीचा अन्याय सहन करत आहेत. जिल्ह्यातून सामाजिक बहिष्काराविरूध्द आवाज उठला आणि हा आवाज विधानसभेत पोहचला. आता या अनिष्ट प्रथेविरूध्द कायदा अस्तित्वात येणार आहे. या कायद्यामुळे जातपंचायती व गावकी यांना मूठमाती मिळेल ,असा विश्वास अ‍ॅड. सरोदे यांनी अखेरीस व्यक्त केला. यावेळी प्रकाश सोनवडेकर, रमेश कांबळे, हर्षद कशाळकर आदी उपस्थित होते. (विशेष प्रतिनिधी)अनिष्ट प्रथेविरूध्द कायदा - संपूर्ण महाराष्ट्रात सामाजिक बहिष्काराची सर्वाधिक प्रकरणे रायगड जिल्ह्यात घडली आहेत.या जिल्ह्यातील अनेक कुटुंबे गावकीचा अन्याय सहन करत आहेत. जिल्ह्यातून सामाजिक बहिष्काराविरूध्द आवाज उठला. आणि हा आवाज विधानसभेत पोहचला. आता या अनिष्ट प्रथेविरूध्द कायदा अस्तित्वात येणार आहे, असे प्रतिपादन अ‍ॅड. सरोदे यांनी केले.