शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
3
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
4
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
5
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
6
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
7
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
8
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
9
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
10
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
11
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
12
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
13
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
14
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
15
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
16
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
17
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
18
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
19
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
20
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
Daily Top 2Weekly Top 5

म्हसळा येथे श्रमदानातून सहा बंधारे; ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ योजनेला हातभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2020 23:52 IST

डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचा उपक्रम

म्हसळा : राज्यातील विविध नद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. दरवर्षी त्यातील गाळ काढल्यास पाण्याच्या पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानमार्फत नद्या, तलावातील गाळ काढण्याचा उपक्रम सुरू आहे. श्रीसदस्यांनी म्हसळा तालुक्यात कोंढे, सकलप, मेंदडी, घोणसे, विठ्ठलवाडी या ठिकाणी मातीचे पाच बंधारे बांधले आहेत. यामुळे या ठिकाणी पाणीटंचाईची समस्या दूर होऊन मुबलक पाणी उपलब्ध होणार आहे. या उपक्रमाद्वारे प्रतिष्ठानने शासनाच्या ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ योजनेला हातभार लावला आहे.

पाण्याची उपलब्धता आहे म्हणून नागरिकांनी त्याचा अपव्यव करू नये ते जपून वापरावे, असे आवाहन प्रतिष्ठानकडून करण्यात आले आहे. दिवसेंदिवस पाण्याची समस्या गंभीर होत आहे. कोकणात मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो; त्यामुळे येथील तलाव, नद्या दुथडी भरून वाहतात; परंतु त्याच तलाव आणि नद्यांमधील गाळ काढल्याने त्यांची साठवण क्षमता वाढणार आहे, यामुळे पाणीटंचाईवर मात करता येईल. श्रीसदस्यांनी म्हसळा तालुक्यात कोंढे, सकलप, मेंदडी, घोणसे, विठ्ठलवाडी या ठिकाणी मातीचे पाच बंधारे बांधण्यात आले. प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी, सचिन धर्माधिकारी, राहुल धर्माधिकारी, उमेश धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली म्हसळा तालुक्यात बंधारे बाधण्यात आले.

तळेगाववाडी गावालगत बंधारा

मोहोपाडा : वासांबे-मोहोपाडा ग्रामपंचायत हद्दीतील तळेगाववाडी गावालगतच्या नदीवर ग्रामपंचायतीच्या ‘पाणी आडवा, पाणी जिरवा’ या उपक्रमांतर्गत वासांबे ग्रामपंचायत पदाधिकारी व कर्मचाऱ्यांनी श्रमदान करून वनराई बंधारा बांधला. या नदीवरील बंधाºयामुळे शेतकऱ्यांना आपले फळे, भाज्यांचे मळे फुलवण्यासाठी मदत होणार आहे. यामुळे ग्रामस्थांसह वासांबे-मोहोपाडा ग्रामपंचायत सरपंच व सदस्यांचे शेतकऱ्यांनी आभार मानले.

तळेगाववाडी गावाजवळून जाणाऱ्या नदीच्या पाण्यावर शेतकरी पालेभाज्या आदीचे पीक घेतो. तसेच आसपासच्या परिसरातील गुरे पिण्याच्या पाण्यासाठी या पाण्याचा वापर करतात; परंतु फेब्रुवारी महिना लागताच या नदीच्या पाण्याची पातळी कमी होत गेल्याने शेतकºयांना पाणीसमस्येला सामोरे जावे लागते, याकरिता वासांबे-मोहोपाडा ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी एकत्रित येऊन तळेगाववाडी नदीवर वनराई बंधारा बांधण्यासाठी श्रमदान केले.

या वेळी सरपंच ताई पवार, उपसरपंच राकेश खारकर, ग्रामविकास अधिकारी संजय बडे, माजी उपसरपंच दत्ता शिंदे, सदस्य स्वप्निल राऊत, ग्रामपंचायत इंजिनीअर उत्तम माळी आदीसह सदस्य व कर्मचाऱ्यांनी हातात घमेल, फावडे, टिकाव घेऊन श्रमदान केले. या बंध्यांमुळे डोंगरमाथ्यावरून येणारे पाणी अडविण्यात आले असून, या पाण्याचा उपयोग शेतकऱ्यांना होणार असल्याचे ग्रामविकास अधिकारी संजय बडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

प्रस्तावाला होता विरोध

ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सदस्य आणि कमचाºयांनी अशा प्रकारे श्रमदान करून ग्रामस्थांना पाणीटंचाई भसणार नाही याची काळजी घेतली आहे. त्यांच्या या उपक्रमाचे पंचक्रोशीतील ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे. सर्वांनीच असे प्रयत्न के ले तर गावचा विकास नक्कीच होईल अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

भूगर्भातील पाणीसाठा वाढण्यास होणार मदत

या बंधाऱ्यामुळे त्या भागातील भूगर्भातील पाण्याचा साठा वाढण्यास मदत होणार हे मातीचे बंधारे बांधल्याने पिण्याचे पाणी, विहिरीतील जलसाठा तसेच जनावरे, पक्ष्यांनाही त्याचा उपयोग होणार आहे.विशेष बंधारे बांधल्यामुळे त्या नदी-नाल्यातील पावसाच्या पाण्याने झालेली धूप थांबणार आहे. शासनाच्या ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ यामध्ये डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा यांनी मोलाचा वाटा उचलला आहे.या प्रतिष्ठानने असा समाजोपयोगी उपक्रम राबवत शासनाच्या ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ उपक्रमाला हातभार लावला आहे. वनराई बंधारे बांधल्याने गावातील ग्रामस्थ प्रतिष्ठानचे कौतुक करत आहेत.

टॅग्स :RaigadरायगडMaharashtraमहाराष्ट्र