शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे ठप्प; मेट्रो सेवा सुरळीत, प्रवाशांना अल्प दिलासा
2
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधू बाजी मारणार की महायुती चितपट होणार? निकालाची उत्सुकता शिगेला
3
पापा की परी... सावधान! स्कुटरच्या हँडलमधून साप निघाला साप, तरुणीने उडीच मारली...
4
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
5
VIDEO : किन्नरच्या सौंदर्यावर नेटकरी 'फिदा'! व्हिडिओ पाहून युजर्स म्हणतायत...; तुम्हीही थक्क व्हाल!
6
Mangalagauri 2025: मंगळगौरीचे पावित्र्य आणि माधुर्य दर्शवणारे दीनानाथ दलाल यांचे चित्र; पहा बारकावे!
7
ऋतुराजनं बॉलिंगमध्ये आजमावला हात; सिक्सर मारल्यावर विकेट्स घेत हिशोब केला चुकता (VIDEO)
8
ती गुढ आग... ज्यात भारताचं सेमीकंडक्टर बनवण्याचं स्वप्न झालं होतं जळून खाक, ७ फेब्रुवारी १९८९ रोजी नेमकं काय झालं होतं?
9
सावधान! अनोळखी व्यक्तीला कॅशच्या बदल्यात पैसे ट्रान्सफर करताय? 'या' एका चुकीमुळे जावं लागेल थेट तुरुंगात
10
Himachal Pradesh: हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटी; अनेक घरे, गाड्या गेल्या वाहून, ४०० रस्ते बंद!
11
Miss Universe India: २२ वर्षांच्या मनिका विश्वकर्माने जिंकला 'मिस युनिव्हर्स इंडिया २०२५' चा खिताब, कोण आहे ही सुंदरी?
12
Indian Railway: आता रेल्वेतही विमानासारखा नियम; ‘जादा' सामान बाळगल्यास दंड!
13
ट्रम्प यांना भेटायला गेलेल्या झेलेन्स्कींनी मेलानियांसाठी पाठवले खास पत्र; काय आहे या पत्रात?
14
आज उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवाराची घोषणा करणार 'I.N.D.I.A.'? ही 3 नावं शर्यतीत!
15
पैसे दुप्पट करते ही सरकारी योजना; ५ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळेल १० लाखांचा गॅरंटीड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
पतीच्या निधनामुळे खचलेल्या तिच्या आयुष्यात 'तो' आला अन् मोठा झटका देऊन गेला! तरुणीसोबत घडलं असं काही की...
17
LIC ची मोठी घोषणा! बंद पडलेल्या पॉलिसी पुन्हा सुरू करण्याची सुवर्णसंधी; विलंब शुल्कातही मोठी सूट
18
मुंबईतील सर्व सरकारी कार्यालयांना सुट्टी; खासगी कंपन्यांना वर्क फ्रॉम देण्याच्या सूचना, शाळा, कॉलेज बंद
19
रोनाल्डोचा साखरपुडा आणि सौदीचे ‘रहस्य’! स्थानिकांना वेगळा नियम आणि स्टारला वेगळा न्याय, का?
20
ठाकरे बंधू किंवा महायुती कुणीही निवडणूक जिंकली तरी बेस्ट कर्मचाऱ्यांना न्याय मिळेल का?

आरसीएफ शाळेच्या विद्यार्थ्यांना रजत पुरस्कार

By admin | Updated: September 14, 2015 23:35 IST

येथील आरसीएफ शाळेतील विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता मंडळ चमूला मुंबई येथे झालेल्या २९ व्या गुणवत्ता मंडळ विभागीय अधिवेशनात रजत पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

अलिबाग : येथील आरसीएफ शाळेतील विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता मंडळ चमूला मुंबई येथे झालेल्या २९ व्या गुणवत्ता मंडळ विभागीय अधिवेशनात रजत पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शालेय विद्यार्थ्यांच्या समस्यांबाबत त्यांनी केलेल्या प्रस्तुतीकरणासाठी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. इयत्ता दहावीतील मिहीर देशमुख याच्या नेतृत्वाखालील या विद्यार्थी गुणवत्ता मंडळ चमूत मिताली देशमुख, पार्थ कवळे, आभा घारपुरे, आल्विन जेकब, श्रुती म्हात्रे, ओमकार हिरगुडे या विद्यार्थ्यांचा समावेश होता.गुणवत्ता मंडळ ही मूळ जपानी संकल्पना असून वस्तू आणि सेवांच्या गुणवत्तापूर्ण उत्पादनापासून ते ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याच्या प्रक्रि येत येणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी तिचा प्रभावी वापर केला जातो. विशेषत: कारखान्यांच्या वेगवेगळ्या विभागात काम करणारे कर्मचारी छोटी छोटी गुणवत्ता मंडळे स्थापन करून संबंधित विभागातील समस्यांचे निराकरण करीत असतात. या गुणवत्ता मंडळांच्या वार्षिक अधिवेशनात समस्या निराकरणाचे प्रस्तुतीकरण करून विचारांचे आदानप्रदान करतात. आरसीएफ थळ कारखान्यात देखील गुणवत्ता मंडळ चळवळ प्रभावीरीत्या कार्यरत असून यापासून प्रेरणा घेऊन आरसीएफ शाळेतील विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांच्या समस्या निराकरणासाठी ‘दिल मांगे मोअर’ या नावाने एक गुणवत्ता मंडळ स्थापन केले होते. ‘विद्यार्थ्यांचे गुणवत्ता मंडळ’ या अभिनव कल्पनेस प्रोत्साहन मिळावे आणि त्यांचे मनोबल वाढावे यादृष्टीने आरसीएफ व्यवस्थापनाने पुढाकार घेऊन विध्यार्थ्यांच्या या गुणवत्ता मंडळास मुंबई विभागीय अधिवेशनात सहभागी होण्याकरिता पाठविले होते.मुंबई विभागीय अधिवेशनात सहभागी २३५ गुणवत्ता मंडळात शालेय विद्यार्थ्यांचे हे एकमेव प्रस्तुतीकरण असल्याने आयोजकांनी उद्घाटन समारंभातच प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत या विद्यार्थ्यांना प्रस्तुतीकरणाची संधी दिली. समारंभास उपस्थित कॅम्लिनचे व्यवस्थापकीय संचालक श्रीराम दांडेकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात आरसीएफ शाळेतील विद्यार्थ्यांच्या या गुणवत्ता मंडळ संकल्पनेचे कौतुक करून शालेय विद्यार्थ्यांच्या या प्रयत्नास दिलेल्या प्रोत्साहनाबद्दल आरसीएफ व्यवस्थापनाबद्दल गौरवोद्गार काढले. यावेळी अखिल भारतीय गुणवत्ता मंडळ फोरमचे राष्ट्रीय अध्यक्ष दि. के. श्रीवास्तव, मुंबई विभागाचे अध्यक्ष के. बी. भारती आदी उपस्थित होते. (विशेष प्रतिनिधी)