शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

श्रीवर्धनचे गतवैभव पुन्हा मिळवून देणार - तटकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2020 00:13 IST

श्रीवर्धनचे गतवैभव पुन्हा एकदा मिळवून देऊ, असे खासदार सुनील तटकरे यांनी श्रीवर्धन नगरपरिषदेच्या सभागृहात आयोजित आढावा व पत्रकार परिषदेत सांगितले.

संतोष सापते श्रीवर्धन : चक्रीवादळाने श्रीवर्धन उद्ध्वस्त केले आहे. शेतकरी, सर्वसामान्य व्यक्ती त्रासला आहे. मात्र, त्याने नाउमेद होऊ नये. आम्ही शरद पवार साहेबांच्या मार्गदर्शनानुसार श्रीवर्धनचे गतवैभव पुन्हा एकदा मिळवून देऊ, असे खासदार सुनील तटकरे यांनी श्रीवर्धन नगरपरिषदेच्या सभागृहात आयोजित आढावा व पत्रकार परिषदेत सांगितले.श्रीवर्धनमधील बागायतदार, सर्वसामान्य शेतकरी, मजूर सर्व घटकांना चक्रीवादळाने बाधित केले आहे. तालुक्यातील सर्व घरांचे नुकसान झाले आहे. अगोदरच्या सरकारने विविध नैसर्गिक आपत्तीत दिलेल्या मदतीपेक्षा जास्त मदत विद्यमान सरकारने जनतेला दिली आहे. आज मी व माझे संपूर्ण कुटुंब जनतेच्या दु:खात सहभागी आहोत. पालकमंत्री आदिती तटकरे, विधान परिषदेचे आमदार अनिकेत तटकरे व मी संपूर्ण रायगड जिल्ह्यात फिरून जनतेच्या समस्या जाणून घेत आहोत.शेतकरी व बागायतदार यांच्यासाठी जास्तीतजास्त निधी उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही सर्वंकष प्रयत्न केले आहेत. सामान्य माणसाच्या घरासाठी दीड लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. अगोदर ही रक्कम अतिशय नगण्य स्वरूपात होती. चक्रीवादळात अन्नधान्य, कपडे व इतर वस्तू यांच्याही नुकसानभरपाईची तरतूद सरकारने केली आहे.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्य व उच्चशिक्षणमंत्री उदय सामंत व मी यांच्यात झालेल्या बैठकीत कोकणासाठी तत्काळ मदत देण्याचे ठरविले गेले. त्यानुसार आपल्या श्रीवर्धनसाठी अपेक्षित असलेली रक्कम ४५ कोटी आपण उपलब्ध करून घेतली आहे. कोकणच्या जनतेच्या पाठीशी विद्यमान सरकार ठामपणे उभे आहे. शेतकरी वर्गासाठी मोफत बियाणे आपण देऊ व शेतीसाठी लागणाऱ्या विविध रोजगार हमी योजना आपण आपल्या भागात आणणार आहोत. कोल्हापूर व सांगलीला पूर आल्यावर त्यांनी किती मदत केली, हे सर्वांनी अनुभवले आहे. मात्र, विद्यमान सरकारने तत्काळ मदत दिली आहे. आम्ही आपत्ती व्यवस्थापन अतिशय चांगल्या पद्धतीने करण्यात यशस्वी झालो आहोत. आपत्तीपूर्व, आपत्तीच्या दरम्यान व आपत्तीपश्चात श्रीवर्धन तालुका प्रशासनाने अतिशय चांगले काम केले. त्यामुळे जीवितहानी टाळण्यात आपण यशस्वी झालो आहोत. भरडखोल, दिघी, हरिहरेश्वर व श्रीवर्धनमधील जीवना सर्व ठिकाणी तालुका प्रशासनाने सुंदर नियोजन केले. स्थलांतरित निर्वासित लोकांना व्यवस्थित व चांगले अन्न पोहोचविले आहे.>पर्यटन विकास हाच ध्यासश्रीवर्धनचा पर्यटन विकास हा माझा ध्यास आहे. आगामी काळात विविध योजना करून आपण पर्यटन पूर्ववत करूच. कोविडमध्ये पर्यटन व्यवसाय पूर्णत: ठप्प झाला आहे. मात्र, पर्यटनास थोड्या दिवसांत उभारी देऊ. त्यासाठी विविध योजना आपण आपल्या भागात आणण्यासाठी प्रयत्नशील आहोत. शून्य व्याजदराने पर्यटक व्यावसायिकांसाठी कर्ज उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे.

टॅग्स :Cyclone Nisargaनिसर्ग चक्रीवादळsunil tatkareसुनील तटकरे