शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
3
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
4
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
5
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
6
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
7
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
8
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
9
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
10
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
11
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
12
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
13
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
14
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
15
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
16
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
17
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
18
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
19
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
20
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला

श्रीवर्धनचे गतवैभव पुन्हा मिळवून देणार - तटकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2020 00:13 IST

श्रीवर्धनचे गतवैभव पुन्हा एकदा मिळवून देऊ, असे खासदार सुनील तटकरे यांनी श्रीवर्धन नगरपरिषदेच्या सभागृहात आयोजित आढावा व पत्रकार परिषदेत सांगितले.

संतोष सापते श्रीवर्धन : चक्रीवादळाने श्रीवर्धन उद्ध्वस्त केले आहे. शेतकरी, सर्वसामान्य व्यक्ती त्रासला आहे. मात्र, त्याने नाउमेद होऊ नये. आम्ही शरद पवार साहेबांच्या मार्गदर्शनानुसार श्रीवर्धनचे गतवैभव पुन्हा एकदा मिळवून देऊ, असे खासदार सुनील तटकरे यांनी श्रीवर्धन नगरपरिषदेच्या सभागृहात आयोजित आढावा व पत्रकार परिषदेत सांगितले.श्रीवर्धनमधील बागायतदार, सर्वसामान्य शेतकरी, मजूर सर्व घटकांना चक्रीवादळाने बाधित केले आहे. तालुक्यातील सर्व घरांचे नुकसान झाले आहे. अगोदरच्या सरकारने विविध नैसर्गिक आपत्तीत दिलेल्या मदतीपेक्षा जास्त मदत विद्यमान सरकारने जनतेला दिली आहे. आज मी व माझे संपूर्ण कुटुंब जनतेच्या दु:खात सहभागी आहोत. पालकमंत्री आदिती तटकरे, विधान परिषदेचे आमदार अनिकेत तटकरे व मी संपूर्ण रायगड जिल्ह्यात फिरून जनतेच्या समस्या जाणून घेत आहोत.शेतकरी व बागायतदार यांच्यासाठी जास्तीतजास्त निधी उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही सर्वंकष प्रयत्न केले आहेत. सामान्य माणसाच्या घरासाठी दीड लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. अगोदर ही रक्कम अतिशय नगण्य स्वरूपात होती. चक्रीवादळात अन्नधान्य, कपडे व इतर वस्तू यांच्याही नुकसानभरपाईची तरतूद सरकारने केली आहे.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्य व उच्चशिक्षणमंत्री उदय सामंत व मी यांच्यात झालेल्या बैठकीत कोकणासाठी तत्काळ मदत देण्याचे ठरविले गेले. त्यानुसार आपल्या श्रीवर्धनसाठी अपेक्षित असलेली रक्कम ४५ कोटी आपण उपलब्ध करून घेतली आहे. कोकणच्या जनतेच्या पाठीशी विद्यमान सरकार ठामपणे उभे आहे. शेतकरी वर्गासाठी मोफत बियाणे आपण देऊ व शेतीसाठी लागणाऱ्या विविध रोजगार हमी योजना आपण आपल्या भागात आणणार आहोत. कोल्हापूर व सांगलीला पूर आल्यावर त्यांनी किती मदत केली, हे सर्वांनी अनुभवले आहे. मात्र, विद्यमान सरकारने तत्काळ मदत दिली आहे. आम्ही आपत्ती व्यवस्थापन अतिशय चांगल्या पद्धतीने करण्यात यशस्वी झालो आहोत. आपत्तीपूर्व, आपत्तीच्या दरम्यान व आपत्तीपश्चात श्रीवर्धन तालुका प्रशासनाने अतिशय चांगले काम केले. त्यामुळे जीवितहानी टाळण्यात आपण यशस्वी झालो आहोत. भरडखोल, दिघी, हरिहरेश्वर व श्रीवर्धनमधील जीवना सर्व ठिकाणी तालुका प्रशासनाने सुंदर नियोजन केले. स्थलांतरित निर्वासित लोकांना व्यवस्थित व चांगले अन्न पोहोचविले आहे.>पर्यटन विकास हाच ध्यासश्रीवर्धनचा पर्यटन विकास हा माझा ध्यास आहे. आगामी काळात विविध योजना करून आपण पर्यटन पूर्ववत करूच. कोविडमध्ये पर्यटन व्यवसाय पूर्णत: ठप्प झाला आहे. मात्र, पर्यटनास थोड्या दिवसांत उभारी देऊ. त्यासाठी विविध योजना आपण आपल्या भागात आणण्यासाठी प्रयत्नशील आहोत. शून्य व्याजदराने पर्यटक व्यावसायिकांसाठी कर्ज उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे.

टॅग्स :Cyclone Nisargaनिसर्ग चक्रीवादळsunil tatkareसुनील तटकरे