शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

श्रीवर्धनमध्ये कुत्र्यांच्या तावडीतून सांबराच्या पिल्लाची सुटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2019 01:40 IST

श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर समुद्र किनारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास सात ते आठ भटकी कुत्री चुकून वाट हरविलेल्या सांबराच्या पिल्लाचा मागोवा घेत त्याला मारण्याचा प्रयत्न करीत आल्याचे तेथे उपस्थित नागरिकांनी पाहिले.

बोर्ली पंचतन - श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर समुद्र किनारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास सात ते आठ भटकी कुत्री चुकून वाट हरविलेल्या सांबराच्या पिल्लाचा मागोवा घेत त्याला मारण्याचा प्रयत्न करीत आल्याचे तेथे उपस्थित नागरिकांनी पाहिले. प्रसंगावधान दाखवून कुत्र्यांच्या तावडीतून सांबराच्या पिल्लाची सुटका के ली. सांबराच्या मानेला कुत्र्याने चावा घेतल्याने त्याला जखम झाली होती. ग्रामस्थांनी वनखात्याच्या वनरक्षकांकडे सांबराला सुपूर्द केले व वनखात्याने त्यावर उपचार करून जंगलात सोडून दिले.श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर समुद्र किनारी सध्या किरकोळ पर्यटक असल्याने समुद्र किनारी असणारे जीवरक्षक प्रितम भुसाणे, तसेच ग्रामस्थ अरफान बाक्कर, अर्षद बोदलाजी, रवींद्र दवटे यांनी सात ते आठ भटके कुत्रे समुद्रकिनारी एका छोट्या प्राण्याचा माग करीत त्याच्यावर हल्ला करीत असल्याचे पाहिले. त्यांनी लगेचच त्याठिकाणी धाव घेत भटक्या कुत्र्यांना हाकलून लावले व पाण्यामध्ये पळणाऱ्या सांबराच्या पिल्लाला शिताफीने पकडले.पाण्याच्या बाहेर काढल्यानंतर सांबराच्या मानेला कुत्र्यांनी चावा घेतल्याचे निदर्शनास आल्यानंतर गावचे सरपंच उदय बापट यांच्या मदतीने त्यांनी वनखात्याच्या कर्मचाऱ्यांना सदर प्रकार सांगितला. तत्काळ वनरक्षक दीपक शिंदे, वनरक्षक भास्कर राठोड,बुराण शेख, दिनेश गिराणे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी सांबराच्या पिल्लाला ताब्यात घेतले व दांडगुरी येथील पशुधन विकास अधिकारी मानसिंग शिसोदे यांनी त्या सांबराच्या मानेला झालेल्या दुखापतीवर प्राथमिक उपचार केले व वनखात्याच्या कर्मचाºयांनी सांबराच्या पिल्लाला श्रीवर्धन मार्गावरील हुनरवेली गावच्या छोट्या जंगलात सोडून दिले.जंगलच कमी झाल्याने वन्यप्राणी अशी समुद्राच्या किनारी असलेल्या झाडीमध्ये वास्तव्यास राहत असल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहे. भटक्या कुत्र्यांचा उपद्रव समुद्र किनारी वाढत असून पर्यटकांना देखील कुत्र्यांचा त्रास होत असतो. समुद्र किनारी असणाºया जीवरक्षक व ग्रामस्थांनी प्रसंगावधान दाखविल्याने सांबराच्या पिलाचा जीव वाचला.

टॅग्स :Raigadरायगड