शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित साटम मुंबई भाजपाचे नवे अध्यक्ष; महापालिकेत नवा रेकॉर्ड करणार, CM देवेंद्र फडणवीसांचा दावा
2
सरकारच्या एक निर्णयाने अडचणीत आली ₹6,98,44,77,87,200 ची कंपनी; कोण आहेत ड्रीम-11 चे मालक हर्ष जैन? अंबानी कुटुंबाशी खास नातं!
3
एक मुलगा छातीवर बसला, दुसऱ्याने हात-पाय बांधले; रिटायर्ड DSP ना मारहाण; हिसकावलं ATM
4
Prithvi Shaw : संघ बदलला अन् फार्मात आला! पृथ्वी शॉच्या भात्यातून आली आणखी एक कडक खेळी
5
Nikki Murder Case : हुंड्यासाठी निक्कीला जाळून मारलं; पती, सासूनंतर आता दीर आणि सासऱ्यालाही अटक
6
जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा का दिला? अमित शाह म्हणाले, 'जास्त ताणून काहीतरी...'
7
हरितालिका व्रत २०२५: ‘हे’ नियम अवश्य पाळावेत; व्रत पूजनानंतर म्हणावी हरितालिका आरती
8
Latur Crime: लातूर हादरले! नदीत सापडलेल्या सुटकेसमध्ये महिलेचा मृतदेह; घटना समोर कशी आली?
9
१० वेळा बॉयफ्रेंडसोबत पळाली, आता विवाहित महिलेने ठेवला १५-१५ चा अजब फॉर्म्युला; ऐकून सगळेच हैराण
10
TCS ते इन्फोसिस-विप्रोपर्यंत IT कंपन्यांचे शेअर्स रॉकेट; निफ्टी-सेन्सेक्सही वधारले; का आली अचानक तेजी?
11
"रीलस्टार म्हणजे अभिनेते नाहीत", हास्यजत्रेत प्रसाद ओकचं वक्तव्य; धनंजय पोवार म्हणाला...
12
भाजपा राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी 'बडा' मंत्री शर्यतीत, दोन वर्षांनी घेतली मोहन भागवतांची भेट
13
जगद्गुरू रामभद्राचार्यांनी प्रेमानंद महाराजांना दिले खुले आव्हान; 'संस्कृताचा एक श्लोक तरी...'
14
Bigg Boss 19 : "वाटलं नव्हतं बिग बॉसची ऑफर येईल...", मराठमोळ्या प्रणित मोरेला अजूनही बसत नाहीये विश्वास
15
हरितालिका २०२५: हरितालिकेचे व्रत कुणी करू नये? पाहा, महती, महात्म्य, महत्त्व अन् मान्यता
16
'बिग बॉस १९' मध्ये काही आठवड्यांसाठीच दिसणार सलमान खान? चाहत्यांमध्ये निराशा
17
महालक्ष्मी योगात हरितालिका व्रत २०२५: पूजनाची सोपी पद्धत, शुभ मुहूर्त; स्वर्णगौरीची कहाणी
18
तीन महत्त्वपूर्ण निर्णयांमुळे सर्वोच्च न्यायालय अडचणीत, अलाहाबाद प्रकरणी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी अखेर केला हस्तक्षेप
19
ड्रीम-11ने भारतीय संघाची स्पॉन्सरशिप सोडली! आशिया कपपूर्वीच BCCI ला मोठा धक्का; किती पैसा मिळायचा?
20
म्हणे, परमेश्वराचे बोलावणे आले, आम्ही ८ सप्टेंबरला देहत्याग करणार, अनंतपुरात २० भाविकांच्या निर्णयाने प्रशासनात खळबळ

विविध समस्या सोडविण्यासाठी श्रीरंग बारणे यांना साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2020 22:52 IST

जनता दरबार : वाचनालये, विरंगुळा केंद्रांच्या प्रश्नांबाबत गाऱ्हाणे

पनवेल : मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी पनवेल विधानसभा मतदारसंघातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी सोमवारी सेनेच्या खारघर शहरातील मध्यवर्ती कार्यालयात जनता दरबाराचे आयोजन केले होते. या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित नागरिकांनी आपल्या प्रभागातील समस्या सोडविण्यासाठी बारणे यांना साकडे घातले.लोकसभा मतदारसंघाची निवडणूक पार पडल्यानंतर प्रथमच खासदार बारणे यांच्यामार्फत जनतेच्या भेटीसाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात खारघर, कामोठे, पनवेल, शहर पनवेल - ग्रामीण आदी भागांतील रहिवाशांनी आपली हजेरी लावली होती. पनवेल महापालिकेचे शेकापचे नगरसेवकदेखील उपस्थित होते.जनता दरबारात विशेषत: ज्येष्ठ नागरिकांची संख्या उल्लेखनीय होती. शहरातील वाचनालये, ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्रे आदी प्रश्नांबाबत खासदारांकडे गाºहाणे मांडले. पालिका क्षेत्रातील गटई कामगारांचा प्रश्नदेखील या वेळी खासदारांकडे मांडण्यात आला. पनवेल तालुक्यातील ग्रुपग्रामपंचायत आपटा येथील कोरलवाडी आदिवासी वाडीत अद्यापही प्राथमिक सुविधांचा अभाव आहे. यासंदर्भात ग्रामसंवर्धन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष संतोष ठाकूर यांनी बारणे यांना निवेदन देऊन उपाययोजना करण्याची मागणी केली. शेकापचे नगरसेवक अरविंद म्हात्रे यांनी कासाडी नदीच्या प्रदूषणाबाबत हरित लवादाने संबंधित वेगवगेळ्या प्रशासनाला योग्य ते आदेश दिले असल्याचे सांगितले. या वेळी कासाडी नदीला पुनर्जीवित करण्यासाठी हरित लवादाने आदेश देऊनदेखील नदीच्या पुनर्जीवित करण्याच्या कामाला टाळाटाळ केली जात असल्याचे म्हात्रे यांनी खासदारांना सांगितले.तळोजा एमआयडीसीमधील प्रदूषणाचा विषय लोकसभेत उपस्थित केला जाईल, असे आश्वासन या वेळी बारणे यांनी दिले. कामोठे शहरातील समस्यांसंदर्भात कफच्या सदस्य रंजना सडोलीकर यांनीदेखील खासदार बारणे यांच्याशी संवाद साधला. या वेळी जिल्हा प्रमुख शिरीष घरत, महानगरप्रमुख रामदास शेवाळे, जिल्हा सल्लागार बबनदादा पाटील, रामदास पाटील, भरत पाटील, दीपक निकम, राकेश गोवारी, मनेश पाटील आदी उपस्थित होते. बारणे यांनी, उपस्थितांचे प्रश्न, समस्या ऐकून घेत यासंदर्भात वैयक्तिक पातळीवर पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. मतदारांच्या समस्या जाणून घेण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन भविष्यातदेखील केले जाईल, असे बारणे यांनी स्पष्ट केले.