शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
4
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
5
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
6
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
7
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
8
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
11
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
12
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
13
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
14
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
15
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
16
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
17
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
18
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
19
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
20
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...

श्रीवर्धनमधील १६ ग्रामसेवक रजेवर

By admin | Updated: November 18, 2016 03:30 IST

तालुक्यातील ४३ ग्रामपंचायतीचा कारभार पाहणारे १६ ग्रामसेवक गुरुवारी १७ नोव्हेंबरपासून विविध मागण्यांसाठी

श्रीवर्धन : तालुक्यातील ४३ ग्रामपंचायतीचा कारभार पाहणारे १६ ग्रामसेवक गुरुवारी १७ नोव्हेंबरपासून विविध मागण्यांसाठी सामुदायिक रजेवर गेले आहेत. तलाठ्यापाठोपाठ ग्रामसेवकांनीही ‘काम बंद’ आंदोलन पुकारल्यामुळे ग्रामपंचायतीचे कामकाज ठप्प झाले आहे. श्रीवर्धन तालुक्यात ४ ग्रामसेवक कंत्राटी आहेत, दोघाजणांना निलंबित करण्यात आले आहे. ग्रामसेवकांवरील चुकीच्या पद्धतीने केलेली कारवाई रद्द करण्यात यावी, कंत्राटी कामगारांचा ३ वर्षे सेवाकाळ नियमित होण्यासाठी तातडीने निर्णय घेण्यात यावा आदी १५ मागण्यांसंदर्भात राजव्यापी संपात श्रीवर्धन तालुक्यातील ग्रामसेवक सामील आहेत. आपल्याकडील चाव्या पंचायत समितीमधील गटविकास अधिकाऱ्यांकडे देऊन हे ग्रामसेवक ‘काम बंद’ आंदोलनात उतरले आहेत. आपल्या मागण्या मान्य झाल्याशिवाय आंदोलन मागे न घेण्याचा इशारा ग्रामसेवक युनियनने दिला आहे.ग्रामसेवकांनी ७ नोव्हेंबरला श्रीवर्धन पंचायत समिती कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले होते. यापूर्वी ग्रामसेवकांनी विविध आंदोलने करून आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता; परंतु त्याची दखल राज्य सरकारने न घेतल्यामुळे ग्रामसेवकांना आपल्या विविध मागण्यांसाठी झगडावे लागत आहे. मात्र, आश्वासनापलीकडे काहीही पदरात न पडल्यामुळे ग्रामसेवकांनी संताप व्यक्त केला, त्यामुळे मागण्या मान्य झाल्याशिवाय कामगार हजर होणार नाहीत, असा इशारा ग्रामसेवक युनियनने दिला आहे. (वार्ताहर)कर्जतमध्ये ग्रामसेवकांचे काम बंद आंदोलनकर्जत : तालुक्यातील तहसील कार्यालय आणि पंचायत समितीच्या माध्यमातून अनेक कामे मार्गी लागत असतात त्यामुळे या दोन कार्यालयांत नेहमीच नागरिकांची गर्दी पाहायला मिळते. बुधवारपासून महसूल खात्यातील तलाठी सामूहिक रजेवर गेले आहेत आणि गुरुवारपासून पंचायत समितीच्या ग्रामसेवकांनी ‘काम बंद’ आंदोलन सुरू केले आहे. तालुक्यातील दोन्ही मुख्य कार्यालयांतील कर्मचाऱ्यांनी ‘काम बंद’ आंदोलन पुकारल्याने सर्व सामान्य नागरिकांची कामे रखडणार आहेत. १५ न्याय्य प्रलंबित मागण्यांची सोडवणूक व्हावी, यासाठी ७ नोव्हेंबरपासून राज्यभर ग्रामसेवकांनी असहकार पुकारला होता.