शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
4
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
5
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
6
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
7
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
8
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
9
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
10
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
11
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
12
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
13
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
14
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
15
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
16
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
17
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
18
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
19
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
20
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी

धक्कादायक! पूरग्रस्तांपर्यंत मदत पोहोचलीच नाही, कर्जतमधून पाठवलेला धनादेश गायब

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2020 07:18 IST

चार महिन्यांपूर्वी सांगलीमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. अनेक गावे पाण्यामध्ये बुडाली होती.

कर्जत : चार महिन्यांपूर्वी सांगलीमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. अनेक गावे पाण्यामध्ये बुडाली होती. कर्जत नगरपरिषदेच्या आवाहनानुसार कर्जतमधील काही मित्रांनी  सांगलीच्या पूरग्रस्तांसाठी १८ हजार ५०० रुपयांची मदत धनादेशाद्वारे पोहोचवली होती. मात्र, अद्याप धनादेश त्यांना मिळालाच नाही; त्यामुळे तो धनादेश नक्की कुठे आहे याची विचारणा कर्जतमधील ‘त्या’ नागरिकांनी केली आहे. अनेक वेळा संबंधितांना पत्रव्यवहार करूनही याबाबत कोणतीच माहिती हाती लागत नाही. नक्की धनादेश कुठे गेला? याचा उलगडा अद्याप चार महिन्यानंतरही होत नाही.कर्जत नगरपरिषदेच्या आवाहनानुसार कर्जतमधील विजय हरिश्चंद्रे व त्यांचे मित्र यांनी १९ आॅगस्ट २०१९ रोजी पूरग्रस्त बांधवांच्या मदतीसाठी १८ हजार ५०० रुपयांचा धनादेश सांगली महानगरपालिकेचे आयुक्त यांच्या नावे कर्जत नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी रामदास कोकरे यांच्याकडे सादर केला होता; परंतु चार महिने झाले तरी त्यांच्याकडून धनादेश प्राप्त झालेल्याची पोचपावती मिळाली नाही, तसेच या धनादेशाची रक्कम माझ्या खात्यातून कमी झाल्याची बँकेच्या पासबुकमध्ये नोंदही नाही.याबाबत विजय हरिश्चंद्रे यांनी १२ डिसेंबर २०१९ रोजी कर्जत नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रामदास कोकरे यांना कळवले असता, त्यांनी सांगली महानगरपालिकेचे आयुक्त नितीन कपडणीस यांचा भ्रमणध्वनी देऊन त्यांच्याशी संपर्क साधण्यास सांगितले. त्यानुसार हरिश्चंद्रे यांनी आयुक्त यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला, त्या वेळी आयुक्त यांनी आमचे लेखा अधिकारी रजेवर आहेत. दोन दिवसांनी याबाबत आपणास कळवतो, असे सांगितले व संबंधित कर्मचारी यांचा दूरध्वनी क्रमांक देऊन तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधावा, असे सांगितले. हरिश्चंद्रे यांनी त्यांच्याशी संपर्क साधला असता उडवाउडवीची उत्तरे मिळाली. अखेर हरिश्चंद्रे यांनी १६ डिसेंबर २०१९ रोजी सांगलीच्या महानगरपालिकेचे आयुक्त यांना लेखी पत्र पाठवून याबाबत कळविले. याबाबत त्वरित कळवावे अन्यथा मला माहितीच्या अधिकारात याबाबत विचारणा करावी लागेल, असे कळवले. त्याबाबत त्यांनी त्यांना पत्राद्वारे हा धनादेश या महानगरपालिकेत प्राप्त झालेला दिसून येत नाही, असे कळविले....हा प्रकार संतापजनक व निंदनीयपूरग्रस्त बांधवांचे अतोनात नुकसान झाले. घरदार, शेती उद्ध्वस्त झाली, अशा वेळेला आम्ही माणुसकीच्या भावनेने त्यांना अल्पशी मदत केली होती; परंतु ती मदत त्यांच्यापर्यंत पोहोचली नाही, हा प्रकार संतापजनक व निंदनीय आहे, अशी प्रतिक्रिया हरिश्चंद्रे यांनी व्यक्त केली. त्याच्याबाबत चौकशी करून त्या धनादेशाचे नक्की काय झाले याची माहिती घ्यावी, अशी विनंती केली आहे.

टॅग्स :floodपूरSangli Floodसांगली पूरKarjatकर्जतRaigadरायगड