शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
3
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
4
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
5
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
6
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
7
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
8
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
9
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
10
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
11
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
12
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
13
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
14
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
15
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
16
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम
17
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
18
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  
19
'संजय राऊतांसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही', राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची टीका
20
Smriti Mandhana Run Out : चुकली अन् फसली! शतकी भागीदारीनंतर स्मृती-प्रतिका हिट जोडी फुटली!

धक्कादायक! किल्ले रायगडावर सुरक्षेसाठी बसवलेले सीसीटीव्ही ५ वर्षांपासून बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2025 06:24 IST

येत्या १२ एप्रिल रोजी शिवाजी महाराज पुण्यतिथी कार्यक्रमासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा येणार आहेत.

अलिबाग : रायगड किल्ल्यांवर सुरक्षेच्या दृष्टीने बसविण्यात आलेले १५ सीसीटीव्ही कॅमेरे गेल्या पाच वर्षापासून बंद आहेत. शिवाजी महाराज पुण्यतिथी कार्यक्रमासाठी १२ एप्रिल रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उपस्थित राहणार आहेत. यामुळे येथील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची राजधानी असलेल्या किल्ले रायगडाला दररोज शेकडो शिवभक्त, पर्यटक भेट देत असतात. या ऐतिहासिक स्थळी शिवराज्यभिषेक सोहळा, शिवपुण्यतिथी आदी मोठे कार्यक्रम होतात. येत्या १२ एप्रिल रोजी शिवाजी महाराज पुण्यतिथी कार्यक्रमासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा येणार आहेत. त्यामुळे कार्यक्रमाचा आढावा मान्यवरांकडून घेण्यात आला असतानाच गडावरील सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याची माहिती उघड झाली आहे.

अमित शहा १२ एप्रिलला किल्ले रायगडावरछत्रपती शिवाजी महाराजांची १२ एप्रिल रोजी ३६५ वी पुण्यतिथी आहे. या कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे गडावरील सुरक्षा व्यवस्थेचे काटेकोरपणे पालन करणे प्रशासन, शासनाचे कर्तव्य आहे. मात्र किल्ले रायगडावर सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याने सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला आहे. किल्ले रायगडावर सीसीटीव्ही बंद आहेत, याबाबत कल्पना नव्हती. मात्र पुरातत्त्व संशोधन विभागाला त्वरित सूचना देऊन हे कॅमेरे सुरू करण्याची सूचना करतो. - संभाजीराजे छत्रपती, माजी खासदार

पुरातत्त्व संशोधन विभागाकडून प्रतिसाद नाहीकिल्ले रायगडाची सुरक्षा अबाधित राहावी यासाठी पुरातत्त्व संशोधन विभागाने सात-आठ वर्षांपूर्वी या गडाच्या परिसरात १५ सीसीटीव्ही बसविले आहेत. मात्र ते पाच वर्षांपासून बंद आहेत. बंद असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांबाबत पुरातत्त्व संशोधन विभाग अधिकारी राजेश दिवेकर यांच्याशी संपर्क झाला नाही.

टॅग्स :FortगडRaigadरायगडAmit Shahअमित शाह