शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B व्हिसा पार्श्वभूमीवर एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
4
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
5
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
6
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
7
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
8
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
9
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
10
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
11
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
12
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
13
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
14
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
15
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
16
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
17
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
18
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
19
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
20
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  

महाडमधील ग्रामपंचायतींंवर शिवसेनेचे वर्चस्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2018 01:52 IST

महाड तेरा ग्रामपंचायतींपैकी अकरा ग्रामपंचायतींवर शिवसेनेने वर्चस्व प्रस्थापित केले आहे. काँग्रेस पक्षाला केवळ दोन ग्रामपंचायतींमध्ये सत्ता मिळाली आहे.

महाड : महाड तेरा ग्रामपंचायतींपैकी अकरा ग्रामपंचायतींवर शिवसेनेने वर्चस्व प्रस्थापित केले आहे. काँग्रेस पक्षाला केवळ दोन ग्रामपंचायतींमध्ये सत्ता मिळाली आहे.मतमोजणी महाड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकामध्ये करण्यात आली.विजयी थेट सरपंचांमध्ये तळोशी- मंगेश पार्टे, किंजळोली खुर्द - अश्विनी केंद्रे, चांढवे बुद्रुक- रूबीना अंतुले, शेल - कमल काटेकर, कोथुर्डे -अंकिता पवार, नेराव- सुनील कोर्पे, किय - नारायण वाडकर, रावढळ -राजाराम मांडवकर, तेलंगे - सरिता राणे, टोळ - शीतल खराळे, आणि नांदगांव खुर्द -मयूर महाडिक हे शिवसेना उमेदवार विजयी झाले तर तेलंगे मोहोल्ला -जफर झटाम आणि राजेवाडी-सुरैय्या सावंत हे दोघे काँग्रेस उमेदवार विजयी झाले.कोंडीवते ग्रमपंचायतीमध्ये सरपंच आणि काही जागा बिनविरोध झाल्या असून, तीन जागांसाठी मतदान झाले त्या शिवसेनेने जिंकल्या आहेत.या विजयानंतर महाड येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत आ. भरत गोगावले यांनी महाड विधानसभा मतदार संघातील ५३ ग्रामपंचायतींपैकी शिवसेनेने ३५ ग्रामपंचायतींवर सेनेचे सरपंच निवडून आले असल्याचे सांगितले.सुधागड निवडणुक शेकापची बाजीराबगाव/ पाली : सुधागड तालुक्यातील १४ ग्रामपंचायतींमध्ये १४ पैकी नांदगाव व गोमाशी या दोन्ही ग्रामपंचायती शेकापने बिनविरोध घेतल्या तर पाली ग्रामपंचायतीवर बहिष्कार टाकल्याने निवडणूकच झाली नाही.उर्वरित ११ पंचायतीमध्ये शेकापने रासळ , राबगाव , पाचापूर , महागाव ग्रामपंचायती काबीज केल्या तर , कळंब (महाआघाडी) , नाडसूर (ग्रामविकास आघाडी), जांभूळपाडा(भाजपा), भार्जे (राष्ट्रवादी काँग्रेस), दहिगाव (आघाडी), परळी (आघाडी), नवघर (राष्ट्रवादीशेकाप आघाडी)असे यश संपादन केले आहे.शेतकरी कामगार पक्षाने बाजी मारली असून शिवसेनेला हा गड राखण्यात यश आले नाही. तर जांभूळपाडा ग्रामपंचायतीमध्ये भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष गणेश कानडे यांनी आपल्या पत्नीला निवडून आणून भाजपाचे वर्चस्व सिध्द केले आहे. राष्ट्रवादीला फक्त एकाच ग्रामपंचायतीवर सरपंच निवडणूक आणून समाधान मानावे लागल आहे . शेकापचा बालेकिल्ला असणारी नाडसूर ग्रामपंचायतीवर एका नवनिर्वाचित कार्यकर्त्याने ग्रामविकास आघाडीचा झेंडा फडकविला आहे.सुधागडात झालेल्या दुसऱ्या टप्प्यातील १३ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये शेतकरी कामगार पक्षाने बाजी मारली असून, मागील झालेल्या १४ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीपेक्षा आता मात्र राष्ट्रवादी पक्षाची पीछेहाट झालेली दिसत आहे. पाली ग्रामपंचायतीचा सर्वपक्षीय बहिष्कार हा मुद्दा तापत राहाणार असून त्यातून मार्ग काय निघतो याकडे पालीवासीयांचे आता लक्ष लागून राहिले आहे.