शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

महाडमधील ग्रामपंचायतींंवर शिवसेनेचे वर्चस्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2018 01:52 IST

महाड तेरा ग्रामपंचायतींपैकी अकरा ग्रामपंचायतींवर शिवसेनेने वर्चस्व प्रस्थापित केले आहे. काँग्रेस पक्षाला केवळ दोन ग्रामपंचायतींमध्ये सत्ता मिळाली आहे.

महाड : महाड तेरा ग्रामपंचायतींपैकी अकरा ग्रामपंचायतींवर शिवसेनेने वर्चस्व प्रस्थापित केले आहे. काँग्रेस पक्षाला केवळ दोन ग्रामपंचायतींमध्ये सत्ता मिळाली आहे.मतमोजणी महाड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकामध्ये करण्यात आली.विजयी थेट सरपंचांमध्ये तळोशी- मंगेश पार्टे, किंजळोली खुर्द - अश्विनी केंद्रे, चांढवे बुद्रुक- रूबीना अंतुले, शेल - कमल काटेकर, कोथुर्डे -अंकिता पवार, नेराव- सुनील कोर्पे, किय - नारायण वाडकर, रावढळ -राजाराम मांडवकर, तेलंगे - सरिता राणे, टोळ - शीतल खराळे, आणि नांदगांव खुर्द -मयूर महाडिक हे शिवसेना उमेदवार विजयी झाले तर तेलंगे मोहोल्ला -जफर झटाम आणि राजेवाडी-सुरैय्या सावंत हे दोघे काँग्रेस उमेदवार विजयी झाले.कोंडीवते ग्रमपंचायतीमध्ये सरपंच आणि काही जागा बिनविरोध झाल्या असून, तीन जागांसाठी मतदान झाले त्या शिवसेनेने जिंकल्या आहेत.या विजयानंतर महाड येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत आ. भरत गोगावले यांनी महाड विधानसभा मतदार संघातील ५३ ग्रामपंचायतींपैकी शिवसेनेने ३५ ग्रामपंचायतींवर सेनेचे सरपंच निवडून आले असल्याचे सांगितले.सुधागड निवडणुक शेकापची बाजीराबगाव/ पाली : सुधागड तालुक्यातील १४ ग्रामपंचायतींमध्ये १४ पैकी नांदगाव व गोमाशी या दोन्ही ग्रामपंचायती शेकापने बिनविरोध घेतल्या तर पाली ग्रामपंचायतीवर बहिष्कार टाकल्याने निवडणूकच झाली नाही.उर्वरित ११ पंचायतीमध्ये शेकापने रासळ , राबगाव , पाचापूर , महागाव ग्रामपंचायती काबीज केल्या तर , कळंब (महाआघाडी) , नाडसूर (ग्रामविकास आघाडी), जांभूळपाडा(भाजपा), भार्जे (राष्ट्रवादी काँग्रेस), दहिगाव (आघाडी), परळी (आघाडी), नवघर (राष्ट्रवादीशेकाप आघाडी)असे यश संपादन केले आहे.शेतकरी कामगार पक्षाने बाजी मारली असून शिवसेनेला हा गड राखण्यात यश आले नाही. तर जांभूळपाडा ग्रामपंचायतीमध्ये भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष गणेश कानडे यांनी आपल्या पत्नीला निवडून आणून भाजपाचे वर्चस्व सिध्द केले आहे. राष्ट्रवादीला फक्त एकाच ग्रामपंचायतीवर सरपंच निवडणूक आणून समाधान मानावे लागल आहे . शेकापचा बालेकिल्ला असणारी नाडसूर ग्रामपंचायतीवर एका नवनिर्वाचित कार्यकर्त्याने ग्रामविकास आघाडीचा झेंडा फडकविला आहे.सुधागडात झालेल्या दुसऱ्या टप्प्यातील १३ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये शेतकरी कामगार पक्षाने बाजी मारली असून, मागील झालेल्या १४ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीपेक्षा आता मात्र राष्ट्रवादी पक्षाची पीछेहाट झालेली दिसत आहे. पाली ग्रामपंचायतीचा सर्वपक्षीय बहिष्कार हा मुद्दा तापत राहाणार असून त्यातून मार्ग काय निघतो याकडे पालीवासीयांचे आता लक्ष लागून राहिले आहे.