शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
2
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
3
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
4
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
5
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
6
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
7
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
8
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
9
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?
10
"आता राज ठाकरे भेटतही नाहीत...", ज्येष्ठ अभिनेते मनमोहन माहिमकर यांनी व्यक्त केली खंत
11
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
12
काहीतरी गडबड..., सोनमचं पतीसोबत एवढं वैर कसं? पोलिसांकडून आता या ४ मुद्द्यांवर तपास केंद्रित    
13
कपड्यांपेक्षा अधिक मद्यावर अधिक खर्च करतोय देशातील सामान्य माणूस, केवळ एका वर्षात उडवले 'इतके' लाख कोटी
14
भारताकडे पाकिस्तानपेक्षा जास्त अण्वस्त्रे, कोणत्या देशाकडे मोठा साठा? यादी पाहा
15
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
16
...अखेर पाकिस्तान वठणीवर आला; सिंधुच्या पाण्यासाठी भारतासमोर पसरले हात
17
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता वाहतूक कोंडीतून सुटका, मुंबईत धावणार वॉटर मेट्रो! किती असेल तिकीट?
18
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
19
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
20
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी

महाडमधील ग्रामपंचायतींंवर शिवसेनेचे वर्चस्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2018 01:52 IST

महाड तेरा ग्रामपंचायतींपैकी अकरा ग्रामपंचायतींवर शिवसेनेने वर्चस्व प्रस्थापित केले आहे. काँग्रेस पक्षाला केवळ दोन ग्रामपंचायतींमध्ये सत्ता मिळाली आहे.

महाड : महाड तेरा ग्रामपंचायतींपैकी अकरा ग्रामपंचायतींवर शिवसेनेने वर्चस्व प्रस्थापित केले आहे. काँग्रेस पक्षाला केवळ दोन ग्रामपंचायतींमध्ये सत्ता मिळाली आहे.मतमोजणी महाड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकामध्ये करण्यात आली.विजयी थेट सरपंचांमध्ये तळोशी- मंगेश पार्टे, किंजळोली खुर्द - अश्विनी केंद्रे, चांढवे बुद्रुक- रूबीना अंतुले, शेल - कमल काटेकर, कोथुर्डे -अंकिता पवार, नेराव- सुनील कोर्पे, किय - नारायण वाडकर, रावढळ -राजाराम मांडवकर, तेलंगे - सरिता राणे, टोळ - शीतल खराळे, आणि नांदगांव खुर्द -मयूर महाडिक हे शिवसेना उमेदवार विजयी झाले तर तेलंगे मोहोल्ला -जफर झटाम आणि राजेवाडी-सुरैय्या सावंत हे दोघे काँग्रेस उमेदवार विजयी झाले.कोंडीवते ग्रमपंचायतीमध्ये सरपंच आणि काही जागा बिनविरोध झाल्या असून, तीन जागांसाठी मतदान झाले त्या शिवसेनेने जिंकल्या आहेत.या विजयानंतर महाड येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत आ. भरत गोगावले यांनी महाड विधानसभा मतदार संघातील ५३ ग्रामपंचायतींपैकी शिवसेनेने ३५ ग्रामपंचायतींवर सेनेचे सरपंच निवडून आले असल्याचे सांगितले.सुधागड निवडणुक शेकापची बाजीराबगाव/ पाली : सुधागड तालुक्यातील १४ ग्रामपंचायतींमध्ये १४ पैकी नांदगाव व गोमाशी या दोन्ही ग्रामपंचायती शेकापने बिनविरोध घेतल्या तर पाली ग्रामपंचायतीवर बहिष्कार टाकल्याने निवडणूकच झाली नाही.उर्वरित ११ पंचायतीमध्ये शेकापने रासळ , राबगाव , पाचापूर , महागाव ग्रामपंचायती काबीज केल्या तर , कळंब (महाआघाडी) , नाडसूर (ग्रामविकास आघाडी), जांभूळपाडा(भाजपा), भार्जे (राष्ट्रवादी काँग्रेस), दहिगाव (आघाडी), परळी (आघाडी), नवघर (राष्ट्रवादीशेकाप आघाडी)असे यश संपादन केले आहे.शेतकरी कामगार पक्षाने बाजी मारली असून शिवसेनेला हा गड राखण्यात यश आले नाही. तर जांभूळपाडा ग्रामपंचायतीमध्ये भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष गणेश कानडे यांनी आपल्या पत्नीला निवडून आणून भाजपाचे वर्चस्व सिध्द केले आहे. राष्ट्रवादीला फक्त एकाच ग्रामपंचायतीवर सरपंच निवडणूक आणून समाधान मानावे लागल आहे . शेकापचा बालेकिल्ला असणारी नाडसूर ग्रामपंचायतीवर एका नवनिर्वाचित कार्यकर्त्याने ग्रामविकास आघाडीचा झेंडा फडकविला आहे.सुधागडात झालेल्या दुसऱ्या टप्प्यातील १३ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये शेतकरी कामगार पक्षाने बाजी मारली असून, मागील झालेल्या १४ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीपेक्षा आता मात्र राष्ट्रवादी पक्षाची पीछेहाट झालेली दिसत आहे. पाली ग्रामपंचायतीचा सर्वपक्षीय बहिष्कार हा मुद्दा तापत राहाणार असून त्यातून मार्ग काय निघतो याकडे पालीवासीयांचे आता लक्ष लागून राहिले आहे.