शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
2
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
3
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
4
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
5
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
6
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
7
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
8
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
9
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
10
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
11
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
12
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
13
Vivo Y400 5G: एमोलेड डिस्प्ले, ६००० mAh बॅटरी आणि बरेच काही; विवो व्हाय ४०० भारतात लॉन्च!
14
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
15
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
16
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
17
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
18
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
19
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
20
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...

शिवगर्जनेने दुमदुमला रायगड; शिवभक्तांसह चार देशांच्या राजदूतांची हजेरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2019 04:00 IST

किल्ले रायगडावर अखिल भारतीय शिवराज्याभिषेक सोहळा समितीमार्फत शिवराज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन केले जात आहे. दरवर्षीपेक्षा या वर्षी किल्ले रायगडावर तुफान गर्दी लोटली होती.

दासगाव/ महाड : रिमझिम पाऊस, मधूनच उठणारे धुके अशा आल्हाददायी वातावरणात किल्ले रायगडावर गुरुवारी शिवराज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. हा अभूतपूर्व सोहळा पाहण्यासाठी संपूर्ण देशभरातून लाखो शिवभक्तांनी किल्ले रायगडावर गर्दी केली होती. या वेळी शिवभक्तांच्या शिवगर्जनेने रायगड दुमदुमून गेला.

किल्ले रायगडावर अखिल भारतीय शिवराज्याभिषेक सोहळा समितीमार्फत शिवराज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन केले जात आहे. दरवर्षीपेक्षा या वर्षी किल्ले रायगडावर तुफान गर्दी लोटली होती. पायरी मार्ग, रायगड रोपवे शिवभक्तांच्या गर्दीने फुलून गेले होते. पहाटेच या शिवराज्याभिषेक सोहळ्याला सुरुवात झाली. गडावर वाजणारे ढोल-ताशे, हलगीवर खेळले जाणारे मर्दानी खेळ, गोंधळ, शाहिरी पोवाड्यांनी संपूर्ण आसमंत निनादून गेला. शाहिरांच्या या पोवाड्यांना उपस्थित शिवभक्तांनी देखील उठून दाद दिली. या वेळी छ.शिवाजी महाराज यांची पालखी वाजतगाजत राजसदर येथे आणण्यात आली. राजसदरेवर छत्रपती युवराज संभाजी राजे आणि त्यांचे पुत्र शहाजी राजे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिषेक करण्यात आला. त्यानंतर शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केल्यानंतर नाण्यांचा अभिषेक करण्यात आला. विशेष म्हणजे या सोहळ्याला चीनचे राजदूत लुई बिन, बल्गेरियाचे राजदूत एली बेरा, पोलंडचे दमयीन हेरोली, ट्युनेशिया या चार देशांचे राजदूत यांच्यासह पालकमंत्री रवींद्र चव्हाण, अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीचे अध्यक्ष फत्तेसिंह सावंत, राष्ट्रसेवा समूह या संस्थेचे अध्यक्ष राहुल पोकळे, निवृत्त कोकण आयुक्त प्रभाकर देशमुख आदी उपस्थित होते. सोहळा पालखीचा स्वराज्याच्या ऐक्याचा संकल्पनेखाली काढण्यात आलेल्या पालखी मिरवणुकीत अठरापगड जाती धमार्तील लोक सहभागी झाले होते. त्यात राजसदरेवर शेतकरी कुटुंबाला यंदा मान मिळाला. यावेळी मेडसिंगा (जि. उस्मानाबाद) येथील गणपती नामदेव आवचार, चिवाबाई आवचार, रेश्मा आवचार या शेतकरी कुटुंबाला संभाजीराजे यांच्या हस्ते एक लाख रुपयांची मदत देण्यात आली.

चीनच्या राजदूतांनी केला छत्रपतींचा गौरवचीनचे राजदूत लियू बिंग म्हणाले, चीन व भारताच्या संस्कृती जुन्या असून, छत्रपती शिवराय हे नॅशनल हिरो आहेत. भारत व चीनमध्ये राष्ट्रपुरुषांविषयी आदराची सामायिक भावना आहे.

राज्यातील गड-किल्ल्यांकडे दुर्लक्ष - संभाजीराजेएकीकडे देशात विविध प्रकल्पांसाठी पैसे उभे केले जात असताना महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांकडे मात्र दुर्लक्ष केले जात आहे अशी खंत व्यक्त करून याकरिता स्वतंत्र मंत्रालय असावे, असे प्रतिपादन संभाजीराजे यांनी व्यक्त केले. एकीकडे शासनाला बुलेट ट्रेनसारख्या उपक्रमांना पैसे उभे करता येतात मग गड-किल्ल्यांसाठी का करता येत नाहीत, असा प्रश्न त्यांनी केला. किल्ले रायगडावरील १२०० एकर जागेत ८४ छोटे-मोठे तलाव असून यापैकी २२ तलावामधील गाळ काढण्यात आला आहे.

गंगासागर व हत्ती तलावातील गाळ काढण्यात आला असून येत्या दोन वर्षात हे सर्व तलाव पाण्याने तुडुंब भरलेले असतील. गडावरील शुद्ध पाण्याचा पुरवठा २१ गावांना करण्याची योजना केली जाईल, असे संभाजीराजांनी सांगितले. तसेच राज्यातील दुष्काळ दूर करण्यास गेली अनेक वर्षांत उपाययोजना झालेल्या नाहीत. याठिकाणी संत्री, द्राक्ष आदी फळ पीक मोठ्या प्रमाणात उत्पादित होत असले तरी ते आयात करावे लागते. हे दुर्दैव असून यापुढे शेतकऱ्यांसाठी काम करणार असल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Shivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजRaigadरायगड