शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

भाजी विकायला गेली म्हणून वाचली; पण मुलगा, पतीसह संसार ढिगाऱ्याखाली गेला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2023 08:32 IST

...पण पती, मुलगा गमावून बसली

लोकमत न्यूज नेटवर्क अलिबाग : नेहमीप्रमाणे शेतात पिकलेली भाजी काढून ती पनवेल बाजारात विक्रीस गेली. घरी नवरा, मुलगा. मात्र, गुरुवार हा तिच्या कुटुंबासाठी काळ ठरेल, अशी पुसटशी कल्पनाही तिच्या मनात नव्हती. भाजी विकण्यास गेल्याने ती दरड दुर्घटनेत वाचली. मात्र, तिचा पती आणि मुलगा दरड दुर्घटनेत गाडले गेले. तारी पारधी हिची ही दुःखद कहाणी आहे. इर्शाळवाडी आदिवासी दरड दुर्घटनेत नवरा पांडू पारधी, मुलगा अबोस पारधी हे मरण पावल्याने तिच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. 

तारी ही आपला पती आणि मुलासोबत पन्नास वर्षांपासून वाडीत वास्तव्य करीत आहे. घरच्या शेतीवर पारधी कुटुंबाची गुजराण सुरू होती. शेतात पिकवलेली भाजी घेऊन डोंगर उतरून रोज पाच-सहा किलोमीटर चालत मुख्य रस्त्यावर येऊन पनवेलला विकायला जात होती. बुधवारीही तारी नेहमीप्रमाणे भाजी विकण्यास पनवेल येथे गेली होती. तर पती आणि मुलगा हे घरीच होते. बुधवारी तारी ही पनवेलला आपल्या नातेवाईकांकडे राहिली. परंतु, इकडे रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास इर्शाळवाडीवर डोंगरातील मातीचा ढिगारा कोसळून उभारलेला तारीचा संसार गाडला गेला.  सकाळी दुर्घटनेबाबत कळल्यावर तातडीने ती गावात आली. मातीचा ढिगारा पाहून तिने हंबरडा फोडला. मेहनतीने उभा केलेला संसार एका झटक्यात उद्ध्वस्त झाला. आता उरला तो मातीचा ढिगारा आणि कुटुंबाच्या आठवणी.

टॅग्स :RaigadरायगडRaigad Irshalwadi Landslide Incidentरायगड इर्शाळवाडी दुर्घटना प्रकरण