शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

भविष्यात रायगडमधील शेती नामशेष होण्याची भीती- शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2019 06:36 IST

पनवेलमधील विद्यालयात शतक महोत्सवाचे आयोजन

पनवेल : एकेकाळी भाताचे कोठार म्हणून ओळख असलेल्या रायगड जिल्ह्यातील शेती नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. भविष्यात जिल्ह्यात शेती शिल्लक राहील की नाही, याची काळजी वाटते. याठिकाणी मोठ्या प्रमाणात कारखानदारी वाढणार असल्याने अशा परिस्थिती टिकुन राहण्यासाठी युवा पिढीला गुणवत्ता पूर्वक शिक्षणाची गरज असल्याचे मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पनवेल येथे व्यक्त केले. व्ही. के. (विठोबा खंडाप्पा) विद्यालयाच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.सध्याच्या घडीला रायगड जिल्ह्यात कारखानदारी वाढत चालली असल्याने युवा पिढीने गुणवत्ता पूर्वक शिक्षणाची गरज आहे. शिक्षणाच्या सार्वत्रिकरणाला आपला पाठिंबा असून फक्त त्या कौशल्य, गुणवत्ता असणे गरजेचे असल्याचे पवार यांनी नमूद केले. व्ही. के. विद्यालयाचे माजी विद्यार्थी व राज्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी देखील पनवेलमधील शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला. शरद पवार यांचा पक्ष वेगळा असला तरी नगरसेवक ते खासदार असेपर्यंत वेळोवेळो त्यांचे मागदर्शन लाभल्याने विचार जोशी यांनी व्यक्त केले. यावेळी उपस्थितांमध्ये व्ही. के. विद्यायालचे अध्यक्ष आमदार बाळाराम पाटील, खासदार सुनील तटकरे, माजी खासदार रामशेठ ठाकूर,आमदार प्रशांत ठाकूर, माजी आमदार विवेक पाटील, मीनाक्षी पाटील, विवेक पाटील, माजी नगराध्यक्ष जे एम म्हात्रे, कोएसोचे अध्यक्ष संजय पाटील आदींसह शाळेचे माजी विद्यार्थी व राजकीय क्षेत्रातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.व्ही. के. विद्यालयाला शंभरवर्ष पूर्ण झाल्याने शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन या शतक महोत्सवाचे आयोजन केले. याकरिता विद्यार्थ्यांनी वर्गणी काढली होती. शतक महोत्सवी वर्ष साजरा करण्यासाठी मागील महिनाभरापासून विद्यार्थी तसेच शाळेचे चेअरमन आमदार बाळाराम पाटील हे प्रयत्नशील होते.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवार