शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

भविष्यात रायगडमधील शेती नामशेष होण्याची भीती- शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2019 06:36 IST

पनवेलमधील विद्यालयात शतक महोत्सवाचे आयोजन

पनवेल : एकेकाळी भाताचे कोठार म्हणून ओळख असलेल्या रायगड जिल्ह्यातील शेती नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. भविष्यात जिल्ह्यात शेती शिल्लक राहील की नाही, याची काळजी वाटते. याठिकाणी मोठ्या प्रमाणात कारखानदारी वाढणार असल्याने अशा परिस्थिती टिकुन राहण्यासाठी युवा पिढीला गुणवत्ता पूर्वक शिक्षणाची गरज असल्याचे मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पनवेल येथे व्यक्त केले. व्ही. के. (विठोबा खंडाप्पा) विद्यालयाच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.सध्याच्या घडीला रायगड जिल्ह्यात कारखानदारी वाढत चालली असल्याने युवा पिढीने गुणवत्ता पूर्वक शिक्षणाची गरज आहे. शिक्षणाच्या सार्वत्रिकरणाला आपला पाठिंबा असून फक्त त्या कौशल्य, गुणवत्ता असणे गरजेचे असल्याचे पवार यांनी नमूद केले. व्ही. के. विद्यालयाचे माजी विद्यार्थी व राज्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी देखील पनवेलमधील शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला. शरद पवार यांचा पक्ष वेगळा असला तरी नगरसेवक ते खासदार असेपर्यंत वेळोवेळो त्यांचे मागदर्शन लाभल्याने विचार जोशी यांनी व्यक्त केले. यावेळी उपस्थितांमध्ये व्ही. के. विद्यायालचे अध्यक्ष आमदार बाळाराम पाटील, खासदार सुनील तटकरे, माजी खासदार रामशेठ ठाकूर,आमदार प्रशांत ठाकूर, माजी आमदार विवेक पाटील, मीनाक्षी पाटील, विवेक पाटील, माजी नगराध्यक्ष जे एम म्हात्रे, कोएसोचे अध्यक्ष संजय पाटील आदींसह शाळेचे माजी विद्यार्थी व राजकीय क्षेत्रातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.व्ही. के. विद्यालयाला शंभरवर्ष पूर्ण झाल्याने शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन या शतक महोत्सवाचे आयोजन केले. याकरिता विद्यार्थ्यांनी वर्गणी काढली होती. शतक महोत्सवी वर्ष साजरा करण्यासाठी मागील महिनाभरापासून विद्यार्थी तसेच शाळेचे चेअरमन आमदार बाळाराम पाटील हे प्रयत्नशील होते.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवार