शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

महाड एमआयडीसीतील सांडपाणी रस्त्यावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2019 04:48 IST

जुनाट वाहिन्यांना गळती : एमआयडीसीचे प्रदूषण मंडळाकडे बोट

दासगाव : महाड एमआयडीसीतील सांडपाणी वाहिन्या जीर्ण झाल्याने त्यांना गळती लागली आहे. त्यातच टेमघर गावातील रस्त्यावर सी.ई.टी.पी. केंद्राजवळ शुक्र वारी रात्री सांडपाणी वाहिनीचे चेंबर भरल्याने पाणी रस्त्यावर आले. यापूर्वी दोन वेळा असे प्रकार घडले आहेत. एमआयडीसीने सांडपाणी वाहिनी साफ केली असली तरी महिन्याभरात दुसऱ्यांदा पाणी रस्त्यावर आल्याने स्थानिकांकडून नाराजी व्यक्त होत आहे.

महाड औद्योगिक वसाहतीमधील टेमघर रस्त्यालगत सांडपाणी वाहिनी आहे. या रस्त्यावर किमान पाच कारखाने आहेत. यातील सांडपाणी या वाहिनीच्या माध्यमातून सामाईक सांडपाणी केंद्रात येत असते. या ठिकाणी असलेल्या चेंबरमधून काही दिवसांपूर्वी सांडपाणी बाहेर आले होते. यातील स्लज स्वरूपातील घनकचरा बाहेर काढण्यात आला आणि वाहिनी पूर्ववत करण्यात आली. मात्र, काही दिवसांतच पुन्हा एकदा या मार्गावरील चेंबरमधून सांडपाणी बाहेर पडल्याने हे पाणी रस्ता आणि शेजारील टेमघर नाल्यात गेले. या वेळीदेखील ही पाइपलाइन घन कचºयाने बंद झाली असल्याचे एमआयडीसीच्या अधिकाºयांनी स्पष्ट केले.

सांडपाणी वाहिनी जुनी असून, केवळ १ फूट व्यासाची आहे. पूर्वीपेक्षा महाड एम.आय.डी.सी.मध्ये कारखाने वाढले आहेत. शिवाय, कारखान्यांचे विस्तारीकरणदेखील झाले आहे. यामुळे कारखान्यातून बाहेर पडणाºया पाण्याचे प्रमाणदेखील वाढले असले तरी ही वाहिनी मात्र कमी क्षमतेची आहे. यामुळे पाण्याचे प्रमाण वाढल्यानंतर पाइपलाइनला असलेल्या चेंबरमधून हे पाणी बाहेर रस्त्यावर येत आहे. महाड सी.ई.टी.पी.मधून पाणी ओवळे गावानजीक खाडीत सोडले जाते. ही पाइपलाइनही जुनी आणि जीर्ण झाली आहे. यामुळे या परिसरात कायम गळती होऊन शेतीचे नुकसान झाले असल्याच्या घटना घडल्या आहेत. आता हे चित्र एम.आय.डी.सी.तच दिसू लागले आहे. औद्योगिक परिसरात विविध ठिकाणी चेंबरमधून पाणी बाहेर येत असल्याचे दिसत आहे. मात्र, महाड एम.आय.डी.सी. आपली जबाबदारी झटकून प्रदूषण मंडळावर बोट दाखवत आहे.कंपन्यांना सुविधा पुरवण्याची जबाबदारी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची आहे. त्यांनी सांडपाणी वाहिनीची पाहणी करून असा प्रकार का होत आहे, हे शोधले पाहिजे.- प्रकाश ताटे, क्षेत्र अधिकारी,प्रदूषण मंडळ, महाडएमआयडीसी परिसरातील कंपन्यांच्या सांडपाण्यात घन पदार्थाचे प्रमाण अधिक आहे, यामुळे ही पाइपलाइन तुंबते, यामुळे पाणी चेंबरमधून बाहेर पडत आहे. प्रदूषण मंडळाने याचा शोध घ्यावा.- पी. एस. ठेंगे,उपकार्यकारी अभियंता 

टॅग्स :Raigadरायगडalibaugअलिबाग