शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

उपचाराविना पाठवले घरी; दुसऱ्या दिवशी मुलाचा मृत्यू: डॉक्टरांकडून हलगर्जीचा कुटुंबीयांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2025 11:18 IST

मुलावर उपचार न करता त्याला परत घरी पाठवण्यात आले. दुसऱ्या दिवशी गर्वांगचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्क, माणगाव : माणगाव उपजिल्हा रुग्णालयात दाखल झालेल्या १४ वर्षीय शाळकरी मुलाला उपचाराविनाच घरी पाठविल्यानंतर दुसऱ्या दिवशीच त्याचा मृत्यू झाल्याने आरोग्य विभागाचा कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. म्हसळा तालुक्यातील घुम गावात राहणाऱ्या या मृत मुलाचे नाव गर्वांग दिनेश गायकर असे असून, उपचाराअभावीच मुलाचा मृत्यू झाल्याचा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे. 

गर्वांगच्या पायावर केसपुळी आल्याने शुक्रवारी त्याला म्हसळा ग्रामीण रुग्णात उपचारासाठी नेण्यात आले होते. त्यानंतर त्याला ताप आल्याने शनिवारी, ५ एप्रिलला रात्री त्याला १०८ रुग्णवाहिकेच्या साह्याने माणगाव उपजिल्हा रुग्णालय येथे नेण्यात आले. येथे त्याच्यावर उपचार न करता त्याला परत घरी पाठविण्यात आले. दुसऱ्या दिवशी गर्वांगचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. 

कठोर कारवाईची मागणीगर्वांग याच्या मृत्यूला रुग्णालयातील डॉक्टरच जबाबदार असल्याचा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे. या प्रकरणानंतर शिवसेना आक्रमक झाली असून, त्यांनी रुग्णालयाला भेट देऊन याप्रकरणी कठोर कारवाई करण्याची मागणी पक्षाकडून करण्यात आली आहे

डॉ. सावंत व डॉ. राप्ते यांनी रुग्णाला तपासल्यानंतर तो व्यवस्थित असल्याने त्याला घरी पाठविले. वरिष्ठांकडून यासंदर्भात कारवाई प्रस्तावित करण्यात आली असून मुलाला आणि त्याच्या आई-वडिलांना १०० टक्के न्याय मिळेल. डॉ. महेश मेहता, प्रभारी वैद्यकीय अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय, माणगाव

उपजिल्हा रुग्णालय माणगाव येथे रुग्णाला तपासले असता ॲडमिट करण्याची आवश्यकता वाटली नाही, असे तपासणी करणाऱ्या डॉक्टरांचे म्हणणे आहे. कोणतीही रक्त तपासणी न करता तापाच्या गोळ्या देऊन रुग्णाला घरी पाठवण्यात आले. या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करून अहवाल वरिष्ठांकडे सादर केला जाईल.  डॉ. किरण शिंदे, सहायक जिल्हा शल्यचिकित्सक, अलिबाग (रायगड)

टॅग्स :RaigadरायगडHealthआरोग्यhospitalहॉस्पिटल