शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
2
अखेर ठरलं! एल्फिन्स्टन पूल 'या' दिवशी होणार बंद, वाहतूक विभागाने दिली माहिती
3
'एकीला पाठवून आता पश्चात्ताप करतोय, आता दुसरीला त्यांच्याकडे...'; लेकीच्या आठवणीने निक्कीची आईला अश्रू अनावर!
4
तुमच्याकडेही SBI क्रेडिट कार्ड आहे का? आता 'हे' फायदे कायमचे बंद, १ सप्टेंबरपासून नवा नियम लागू
5
तेल व्यवसायाचा King! अमेरिका पाहत राहिला..; भारताने जगाला विकले ५.३५ लाख कोटींचे तेल
6
शाहरुखसोबत अनेक वर्षांनी मिटला वाद, आता सनी देओलने किंग खानच्या लेकाची केली स्तुती
7
'या'वर लागू शकतो मोठा टॅक्स, महाग होऊ शकतात 'या' वस्तू; पुढील आठवड्यात घोषणा होणार?
8
गर्भनिरोधक गोळ्यांचं ऑनलाइन पेमेंट फेल झालं अन् पतीचं 'लफडं' उघडं पडलं; मग पत्नीनं उचललं टोकाचं पाऊल
9
पाण्याच्या टाकीत लपवले होते ३९ लाख रुपये! जप्त केलेल्या पैशांचे आणि मालमत्तेचे पुढे काय होते?
10
राहुल गांधी विरुद्ध निवडणूक आयोग! 'मतचोरी'च्या मुद्द्यावर जनतेची साथ कुणाला? सर्व्हेतून धक्कादायक खुलासा
11
कधीही पिऊ नका 'हे' ३ ज्यूस, फायद्याऐवजी होईल नुकसान; डॉक्टरांनीच दिला धोक्याचा इशारा
12
Maharashtra Rain: कमी दाबाच्या पट्टा कसा तयार होतो, त्यामुळे महाराष्ट्रात इतका पाऊस का पडतो?
13
खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासह ३ जणांची मनसेतून हकालपट्टी; राज ठाकरेंचे आदेश
14
सर्वांनी यावेळी तुटून पडा; मनोज जरांगे यांनी मुंबईकडे कूच करण्याचा संपूर्ण प्लॅनच सांगितला!
15
मनसेच्या २ माजी नगरसेवकांचा शिंदेसेनेत प्रवेश; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत हाती घेतला धनुष्यबाण
16
"मनोज जरांगे, तुम्हाला एवढीच जर खाज आहे, तर ज्या शरद पवारांनी..."; आमदार लाड, दरेकर का भडकले?
17
गणेश चतुर्थी २०२५: गणेशोत्सवात कोणते नियम अवश्य पाळायलाच हवेत? पाहा, शास्त्र काय सांगते...
18
Asia Cup 2025 : विराट-रोहितच्या खांद्यावरून पाकच्या माजी क्रिकेटरचा सूर्या दादावर निशाणा, म्हणे...
19
Ganpati Invitation Messages: गणेश चतुर्थीला मित्र-नातेवाईकांना WhatsApp, Facebook वर हे खास संदेश पाठवून करा स्पेशल आमंत्रण
20
आयुष्य संपवण्यासाठी नदीत उडी मारली पण नंतर मूड बदलला, मदतीसाठी ओरडला अन्...

उपचाराविना पाठवले घरी; दुसऱ्या दिवशी मुलाचा मृत्यू: डॉक्टरांकडून हलगर्जीचा कुटुंबीयांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2025 11:18 IST

मुलावर उपचार न करता त्याला परत घरी पाठवण्यात आले. दुसऱ्या दिवशी गर्वांगचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्क, माणगाव : माणगाव उपजिल्हा रुग्णालयात दाखल झालेल्या १४ वर्षीय शाळकरी मुलाला उपचाराविनाच घरी पाठविल्यानंतर दुसऱ्या दिवशीच त्याचा मृत्यू झाल्याने आरोग्य विभागाचा कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. म्हसळा तालुक्यातील घुम गावात राहणाऱ्या या मृत मुलाचे नाव गर्वांग दिनेश गायकर असे असून, उपचाराअभावीच मुलाचा मृत्यू झाल्याचा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे. 

गर्वांगच्या पायावर केसपुळी आल्याने शुक्रवारी त्याला म्हसळा ग्रामीण रुग्णात उपचारासाठी नेण्यात आले होते. त्यानंतर त्याला ताप आल्याने शनिवारी, ५ एप्रिलला रात्री त्याला १०८ रुग्णवाहिकेच्या साह्याने माणगाव उपजिल्हा रुग्णालय येथे नेण्यात आले. येथे त्याच्यावर उपचार न करता त्याला परत घरी पाठविण्यात आले. दुसऱ्या दिवशी गर्वांगचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. 

कठोर कारवाईची मागणीगर्वांग याच्या मृत्यूला रुग्णालयातील डॉक्टरच जबाबदार असल्याचा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे. या प्रकरणानंतर शिवसेना आक्रमक झाली असून, त्यांनी रुग्णालयाला भेट देऊन याप्रकरणी कठोर कारवाई करण्याची मागणी पक्षाकडून करण्यात आली आहे

डॉ. सावंत व डॉ. राप्ते यांनी रुग्णाला तपासल्यानंतर तो व्यवस्थित असल्याने त्याला घरी पाठविले. वरिष्ठांकडून यासंदर्भात कारवाई प्रस्तावित करण्यात आली असून मुलाला आणि त्याच्या आई-वडिलांना १०० टक्के न्याय मिळेल. डॉ. महेश मेहता, प्रभारी वैद्यकीय अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय, माणगाव

उपजिल्हा रुग्णालय माणगाव येथे रुग्णाला तपासले असता ॲडमिट करण्याची आवश्यकता वाटली नाही, असे तपासणी करणाऱ्या डॉक्टरांचे म्हणणे आहे. कोणतीही रक्त तपासणी न करता तापाच्या गोळ्या देऊन रुग्णाला घरी पाठवण्यात आले. या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करून अहवाल वरिष्ठांकडे सादर केला जाईल.  डॉ. किरण शिंदे, सहायक जिल्हा शल्यचिकित्सक, अलिबाग (रायगड)

टॅग्स :RaigadरायगडHealthआरोग्यhospitalहॉस्पिटल