शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

दीड महिन्याच्या सुट्टीनंतर शाळा गजबजल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2019 23:37 IST

पावसाची उघडीप असल्याने पहिल्या दिवशी स्वच्छंदी वातावरणात विद्यार्थी शाळेत जाताना दिसत होते.

गेले दीड महिना शाळांना सुट्टी असल्याने जिल्ह्यातील सर्वच ठिकाणी शुकशुकाट पसरला होता. सोमवारी सकाळी शाळेची घंटा वाजू लागली आणि बच्चे कंपनीने शाळा गजबजून गेल्या. पावसाची उघडीप असल्याने पहिल्या दिवशी स्वच्छंदी वातावरणात विद्यार्थी शाळेत जाताना दिसत होते. स्कूल बसही मैदानावर दिसू लागल्या तशा एसटीच्या बसही शाळा सुरू झाल्याने ग्रामीण भागातील फेऱ्या पूर्ववत सुरू झालेल्या दिसल्या. शाळेत नवीन वर्ग, नवीन शिक्षक, नवीन पुस्तकांचा गंध यामुळे सर्वच वातावरण शैक्षणिक बनले होते. अनेक शाळेत विद्यार्थ्यांचे गुलाब फूल देऊन स्वागत करण्यात आले.कर्जतच्या विद्या विकास मंदिरात प्रवेशोत्सवकर्जत महिला मंडळाच्या विद्या विकास शाळेत सोमवारी पहिल्या दिवशी प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. शाळेच्या परिसरात रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या, सर्व विद्यार्थ्यांचे वाजतगाजत स्वागत करण्यात आले. मुख्याध्यापिका मीना प्रभावळकर यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले. यावेळी कार्यकारिणी सदस्या वैदेही पुरोहित, पूजा सुळे, मनीषा सुर्वे या उपस्थित होत्या. शालेय पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले.शालेय साहित्य वाटपधाटाव : रोहा तालुक्यातील नवजीवन शिक्षण प्रसारक मंडळ खांब संचालित रा. ग. पोटफोडे (मास्तर) विद्यालय खांब या शाळेत पहिल्याच दिवशी इयत्ता पाचवीच्या नवगत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना या विद्यालयातून सेवानिवृत्त झालेल्या शिक्षिका मालती मारुती खांडेकर यांनी शैक्षणिक साहित्याचे वाटप केले.खारपाड्यात पुस्तक वितरणवडखळ : पेण तालुक्यातील रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खारपाडा येथे विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक वितरण दुष्मी खारपाडाच्या सरपंच रश्मी दयानंद भगत यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी माजी सरपंच अरुण घरत, ग्रामपंचायत सदस्य मीनाक्षी घरत, अमित भगत, शिक्षक, पालक उपस्थित होते.पनवेलच्या आयुक्तांनी केले विद्यार्थ्यांचे स्वागतविद्यार्थ्यांसाठी शाळेचा पहिला दिवस उत्साहाचा होता. पनवेल तालुक्यातील जिल्हा परिषद, पनवेल महापालिकेसह खासगी शाळेतील विद्यार्थ्यांचे पहिल्या दिवसाचे औचित्य साधून जल्लोषात स्वागत करण्यात आले. विविध शाळांमध्ये यावेळी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पनवेल महापालिकेच्या श्री गणेश विद्यामंदिर शाळा धाकटा खांदा याठिकाणी पालिकेच्या माध्यमातून स्वागताचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाला आयुक्त गणेश देशमुख, महापौर कविता चौतमोल उपस्थित होत्या. आयुक्तांनी स्वत: विद्यार्थ्यांच्या हाताला धरून शाळेत स्वागत केले.विद्यार्थ्यांचे स्वागतआगरदांडा : दीड-दोन महिन्यानंतर शाळा सुरू होणार असल्याचे सोमवारी विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. शाळा प्रशासनाकडून पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले.नांदगाव विद्यालयात पाठ्यपुस्तकांचे वाटपमुरुड तालुक्यातील श्री छत्रपती शिवाजी नूतन विद्यालय यशवंतनगर, नांदगाव या विद्यालयात इयत्ता पाचवी ते आठवीपर्यंतच्या असणाºया सर्व विद्यार्थ्यांना शालेय पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष सहजीवन विद्या मंडळाचे अध्यक्ष फैरोज घलटे हे होते. तर त्यांच्या समवेत संचालक अरविंद भंडारी, पर्यवेक्षक उत्तमराव वाघमोडे, शिक्षक प्रतिनिधी दत्तात्रेय खुळपे, सहशिक्षक गणेश ठोसर आदी यावेळी उपस्थित होते.सर्व शिक्षा अभियानांतर्गत केंद्र व राज्य शासनाच्या निधीमधून इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या सर्व मुला-मुलींना मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप केले जाते. विद्यार्थ्यांनी पुस्तकांची व्यवस्थित काळजी घेऊन यातून ज्ञान प्राप्त करावे, असे आवाहन यावेळी उपस्थित मान्यवरांनी केले. सहजीवन विद्या मंडळाचे अध्यक्ष फैरोज घलटे यांनी शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना नवीन पुस्तके देऊन शाळेची सुरुवात करताना आनंद होत असल्याचा उल्लेख केला.

टॅग्स :Schoolशाळा