शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

श्रीवर्धनमधील टंचाईग्रस्त गावे टँकरच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2018 00:53 IST

यंदा तापमानाचा पारा चांगलाच वाढला आहे, त्यामुळे पाणीटंचाईची समस्याही सर्वत्र भेडसावत आहे. श्रीवर्धन तालुक्यातील ग्रामीण भागातही सध्या पाणीटंचाई निर्माण झाली आहे.

संतोष सापते  श्रीवर्धन : यंदा तापमानाचा पारा चांगलाच वाढला आहे, त्यामुळे पाणीटंचाईची समस्याही सर्वत्र भेडसावत आहे. श्रीवर्धन तालुक्यातील ग्रामीण भागातही सध्या पाणीटंचाई निर्माण झाली आहे. टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी एक आठवड्यापूर्वीच प्रस्ताव सादर करण्यात आला असला, तरी त्याची परिपूर्ती करण्यात पंचायत समितीला अद्याप यश आलेले नाही. त्यामुळे नागरिकांची पाण्यासाठी वणवण सुरू आहे.तालुक्यातील साक्षी भैरी (हरेश्वर), गुलधे येथील कासारकोंड, वडशेत वावे येथील आदिवासीवाडी, शेखाडी येथील मूळगाव शेखाडी येथे टँकर पुरवठा करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत.रायगड जिल्ह्यात दरवर्षी चांगला पाऊस पडतो. मात्र, पाणी साठवणुकीसाठी आवश्यक उपाययोजना, शासकीय उदासीनता, नागरिकांमध्ये जनजागृतीच्या अभावामुळे अनेक गावांमध्ये मार्चपासून पाणीटंचाई भेडसावू लागते. श्रीवर्धन तालुक्यातील जलसाठ्यात यंदा कमालीची घसरण झाली आहे. पाणी आडवा, पाणी जिरवा, पाणलोट योजना, वनराई उपक्रम, शासनाचे विविध प्रकारचे उपक्र म कागदावरच यशस्वी झाले आहेत. वास्तविक पाहता, जनतेस त्याचा काहीच उपयोग होत नसल्याचे प्रत्यक्षात अनुभवास येत आहे.तालुक्यातील विविध गावांनी पंचायत समितीकडे २१ एप्रिल रोजी पाणीपुरवठा करण्यासंदर्भात प्रस्ताव पाठवले आहेत. रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनीही प्रस्तावास २४ एप्रिल रोजी मंजुरी दिली आहे, तरीसुद्धा पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाकडून संबंधित गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी टँकर उपलब्ध करून देण्यात आलेला नाही.श्रीवर्धन तालुक्यातील वावे, बोरला, नागलोली, धनगरमलई या गावांतील लोकांना पिण्याचे पाणी मिळणेही कठीण झाल्याने लहान मुले, वयोवृद्ध, महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. गावातील पाळीव प्राण्यांचा जगण्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. सदर गावांचे ग्रामसेवक व लोकप्रतिनिधी यांच्यात समन्वय नसल्याचे स्पष्ट दिसून येते.धनगरमलई गावासाठी १ जानेवारीला पाणी टँकरचा प्रस्ताव पाठवला आहे; परंतु अद्याप पंचायत समितीकडून पाणीप्रश्न सुटलेला नाही. पाणीप्रश्नाचे राजकारण करणे चुकीचे आहे. लहान मुले व वृद्ध व्यक्तींचे पाण्याअभावी हाल होत आहेत.- मंगेश कोबनाक, पंचायत समिती सदस्य, वाळवंटी गणप्राप्त झालेल्या सर्व पाणी टँकरच्या प्रस्तावाचा तत्काळ पाठपुरवठा केला आहे. २४ तारखेला जिल्हाधिकाऱ्यांनी प्रस्तावास मंजुरी दिली आहे. टँकर संदर्भात असलेल्या सर्व निकषांची परिपूर्तता करून संबंधित गावांना पाणी उपलब्ध करून दिले जाईल. प्रस्तावप्राप्त चारही गावांना पाणीपुरवठा केला जाईल.- सी. बी. हंबीर, सहायक गटविकास अधिकारी, श्रीवर्धन पंचायत समितीश्रीवर्धन तालुक्यातील ज्या गावांनी पाण्याच्या टँकरची मागणी केली आहे, त्या सर्वांना पाणी उपलब्ध करून देण्यात येईल, तसे आदेश संबंधित अधिकाºयांना दिले आहेत. कामचुकारपणा केल्याचे दिसून आल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल. पाणीप्रश्नी कुठेही पक्षपात होणार नाही, याची काळजी घेऊ.- बाबुराव चोरगे, उपसभापती, पंचायत समिती, श्रीवर्धन