शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
2
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
3
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
4
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
5
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
6
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
7
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
8
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
9
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
11
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
12
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
13
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
14
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
15
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
16
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
17
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
18
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
19
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
20
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य यंत्रणेसमोर कोरोनाला रोखतानाच ‘सारी’ चेही आव्हान; १० महिन्यात १६० रुग्ण, ६ मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2020 07:33 IST

सारीचा ताप समूहरोग म्हणून गणला जातो़. सारी आणि कोरोना हे दोन वेगवेगळे आजार असले, तरी या दोन्ही आजारांची प्राथमिक लक्षणे सारखीच असल्याचे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी सांगितले.

निखिल म्हात्रेअलिबाग :  कोरोनाचा विळखा घट्ट होत असतानाच जिल्ह्यात सारी या साथीच्या आजारानेही नागरिक त्रस्त आहेत. मागील दहा महिन्यांत सारीचे १६० रुग्ण आढळले आहेत, तर ६ रुग्णांचा मृत्यू झाला. कोरोनाबरोबरच सारी आजाराचे संकट उभे राहिण्याची शक्यता आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेला कोरोनाला रोखतानाच सारीवरही लक्ष केंद्रित करावे लागणार आहे.

सारीचा ताप समूहरोग म्हणून गणला जातो़. सारी आणि कोरोना हे दोन वेगवेगळे आजार असले, तरी या दोन्ही आजारांची प्राथमिक लक्षणे सारखीच असल्याचे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी सांगितले. सारीच्या रुग्णांवर वेळीच उपचार झाल्यास, तो पूर्णबरा होऊ शकतो. या तापाच्या आजारात जंतुसंसर्ग होऊन सूज येते़. त्याचबरोबर न्यूमोनिया होऊन रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण खालावते. त्यामुळे हृदय, मेंदू, किडनी निकामी होतात.शरीरात जंतुसंसर्ग झाल्याने आजाराचे वेळेवर निदान होत नाही. त्यामुळे तापाचे विषाणू रक्तात मिसळतात. रक्त तपासणीनंतरही आजाराचे निदान होत नाही़ त्यामुळे त्याचे रुग्ण लवकर लक्षात येत नाहीत. जिल्ह्यात ऑक्टोबर, ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यांत  रुग्णवाढ झाली आहे. या महिन्यांत हवामानात सारखा बदल होत राहिल्याने रुग्ण वाढले आहेत. 

सारीच्या रुग्णांसाठी वेगळी व्यवस्थाया आजारामध्ये सर्दी, खोकला, ताप येणे, श्वास घेण्यास त्रास होणे, ही लक्षणे असतात. जिल्हा रुग्णालयात वेगळा वाॅर्ड तयार करून या रुग्णांवर उपचार होत आहेत. रुग्णांना वेळोवेळी औषध देत, त्यांचा ताप ही थर्मामीटरने तपासण्यात येत होता, तसेच या साथीवर मात करण्यासाठी पौष्टिक आहार ही महत्त्वाचा आहे. 

मास्कसह सामाजिक अंतर राखणे अत्यावश्यकजिल्ह्यात सारीबाबत आरोग्य विभागाकडून उपाययोजना सुरू आहे. जे कन्टेन्मेंट झोन नाहीत, अशा ठिकाणी घरांचे सर्वेक्षण केले आहे, तसेच नागरिकांनी मास्कचा वापर करीत सामाजिक अंतर ठेवणे गरजेचे आहे. - डाॅ.राजीव तंबाळे, वैद्यकीय अधिकारी, जिल्हा रुग्णालय

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस