शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
3
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
4
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
5
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
6
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
7
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
8
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
9
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
10
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
11
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
12
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
13
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
14
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
15
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
16
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
17
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
18
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
19
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
20
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'

सांबरखिंड प्रकल्प एक महिन्याच्या आत मार्गी लागेल; जलसंपदा भवन इमारतीचे लोकार्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2021 00:37 IST

खा. सुनील तटकरे यांनी माणगाव शहराशी माझे अतूट नाते आहे. माणगाव शहरात काळनदीवर माणगावकरांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी बंधारा होणे गरजेचे आहे.

माणगाव : कोकण हा विविधतेने नटलेला, अपार निसर्गसान्निध्य लाभलेला व पर्यटनासाठी उत्तम असा महाराष्ट्रातील एक भाग आहे. अलिबागमधील सांबरखिंड प्रकल्प एक महिन्याच्या आत मार्गी लागेल. तसेच कुंभे जलप्रकल्प व पन्हळघर येथील बंधाऱ्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी बैठक घेऊन योग्य तो निर्णय घेतला जाईल. माणगाव शहरासाठी काळनदीवर उत्तम नियोजन करून पर्यावरणाच्या दृष्टीने सोयीस्कर असा बंधारा बांधण्यात येणार असल्याचे आश्वासन महाराष्ट्र राज्य जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री जयंत पाटील यांनी दिले.

रायगड जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या माणगाव तालुक्यात जलसंपदा भवनाच्या इमारतीचा लोकार्पण सोहळा महाराष्ट्र राज्य जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत खासदार सुनील तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली २५ जानेवारी रोजी पार पडला. यावेळी जयंत पाटील बोलत होते. खा. सुनील तटकरे यांनी माणगाव शहराशी माझे अतूट नाते आहे. माणगाव शहरात काळनदीवर माणगावकरांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी बंधारा होणे गरजेचे आहे. तसेच माणगाव शहरातून जो एक किलोमीटर अंतराचा कालवा गेलेला आहे, त्याचीही दुरुस्ती होणे गरजेचे आहे. कोकणातील पाणी हे इतरत्र न वळवता फक्त कोकणामध्येच पाण्याचा योग्य पद्धतीने विस्तार, वाटप व संधारण व्हावे. खासदार शरद पवार यांनी म्हटल्याप्रमाणे कोकणचा कॅलिफोर्निया कसा करता येईल, यावर जास्तीत जास्त भर देऊन कोकणाला प्रगतिपथावर कसे नेता येईल, याचा पुरेपूर प्रयत्न प्रामाणिकपणे करणार असल्याचे खासदार सुनील तटकरे यांनी सांगितले. या लोकार्पण सोहळ्याला राष्ट्रीय कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश लाड, जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुधाकर घारे आदींसह  नागरिक उपस्थित होते.

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटील