शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

उधाणाच्या तडाख्याने बांधबंदिस्ती फुटल्याने हजारो एकर शेतीत खारे पाणी, शेतकरी हवालदिल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2023 17:18 IST

उरण परिसरातील खारलँड विभागाने खाडी किनाऱ्यावरील बांधबंदिस्तींच्या कामांकडे दुर्लक्ष केल्याने भात शेतीचे  संरक्षण करणारी बांधबंदिस्ती उध्दवस्त होत आहेत.

मधुकर ठाकूर

उरण : उरण पुर्व विभागातील पिरकोन,आवरे, गोवठणे, बांधपाडा ग्रामपंचायत हद्दीतील पारंगी, सांगपाले ,काशी,पारंगी,रेवचावळा या  खाडीकिनाऱ्यावरील खार बांधबंदिस्ती समुद्रातील उधाणाच्या पाण्यात उध्दवस्त झाली आहेत.त्यामुळे समुद्रातील खारे पाणी शेत जमीनीत शिरल्याने लागवडी खाली असलेली भातशेती नष्ट होऊन हजारो एकर भात शेती नापीक  होण्याचा धोका निर्माण झाला आहे.या परिसरातील शेतकऱ्यांवर ओढवलेल्या नैसर्गिक संकटामुळे शेतकरी मात्र पुरता हवालदिल झाले आहेत.

उरण परिसरातील खारलँड विभागाने खाडी किनाऱ्यावरील बांधबंदिस्तींच्या कामांकडे दुर्लक्ष केल्याने भात शेतीचे  संरक्षण करणारी बांधबंदिस्ती उध्दवस्त होत आहेत. १९ जुलैच्या समुद्राच्या मोठ्या उधाणाच्या  खाडीकिनाऱ्यावरील बांधबंदिस्ती फुटल्याने समुद्रातील खारे पाणी हे भात शेतीत शिरल्याने हजारो एकर भातशेती उध्दवस्त होऊन भातशेतीचा चिखल  झाला आहे. समुद्रातील खारे पाणी हे शेत जमीनीत शिरूर पिरकोण,आवरे, गोवठणे, बांधपाडा ( खोपटा ) ग्रामपंचायत हद्दीतील पारंगी,सांग पाले खार,काशी,पारंगी,रेवचा वळा खार या परिसरातील हजारो एकर भात शेती नापीक होण्याच्या मार्गावर लागली आहे.खारलँड विभागाच्या अधिकाऱ्यांनी सदर शेतीची पाहणी करून तातडीने खाडीकिनाऱ्यावरील बांधबंदिस्तीची कामे मार्गी लावली नाहीतर समुद्राच्या उधाणाचे पाणी रहिवाशांच्या घरात शिरेल अशी भीती पिरकोन येथील सामाजिक कार्यकर्ते अनिल पाटील यांनी व्यक्त केली आहे.

उरण तालुक्यातील आवरे, गोवठणे , बांधपाडा , पिरकोण सारख्या इतर ग्रामपंचायत हद्दीतील खाडीकिनाऱ्यावरील बांधबंदिस्ती फुटल्याने समुद्राचे पाणी हे भात शेतीत शिरले आहे.त्या संदर्भात खारलँड विभागाकडून पाहणी करून तशा प्रकारचा अहवाल वरिष्ठांकडे पाठविण्यात आला असल्याची माहिती पेण खारलँड विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेश सावंत यांनी दिली.

टॅग्स :uran-acउरण