शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
2
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
3
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
4
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
5
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
6
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
7
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास
8
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!
9
देशभरात भीषण अपघातांची मालिका; आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थानात 60 जणांचा बळी, अनेक जखमी
10
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...
11
Daya Dongre Death: पडद्यावरील खाष्ट सासू हरपली! ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन
12
भीषण! भरधाव डंपरची बाईकला धडक, लोकांना चिरडलं; १९ जणांचा मृत्यू, धडकी भरवणारा Video
13
मोबाईल फोन रिस्टार्ट करण्याचे भन्नाट फायदे; वर्षानुवर्षे फोन वापरणाऱ्यांनाही नसतील माहीत!
14
Video: "मी कॅमेऱ्यावर कसं सांगू, ते वैयक्तिक..."; ब्ल्यू प्रिंटवर भाजपा उमेदवाराचं उत्तर व्हायरल
15
'त्यांनी अपमानाचे मंत्रालय निर्माण करावे...' प्रियांका गांधी यांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
16
उल्हासनगर महापालिका कलानी मुक्त करणार; भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश वधारियांचा इशारा
17
स्वतःच्याच वडिलांचे नाव घ्यायला लाज वाटते का?, 'जंगलराज'चा उल्लेख करत PM मोदींचा घणाघात
18
"आशिष शेलारांची बुद्धी चांगली होती, आता गंज लागलाय कारण..."; संदीप देशपांडेंचे दुबार मतदारांवरून उलट सवाल
19
फक्त लग्न करण्यास नकार देणे म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नाही: सर्वोच्च न्यायालय
20
शेरवानी घातली, फेटा बांधला, नवरदेव तयार झाला; तितक्यात एक फोन आला अन् सगळ्यांनाच धक्का बसला!

रायगड जिल्ह्यासाठी २३४ कोटींचा आराखडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2020 02:33 IST

राज्यस्तरीय कोकण विभाग जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) २०२०-२१ च्या बैठकीत रायगड जिल्ह्यासाठी ४५ कोटी रुपयांची भरीव वाढ करून एकूण २३४ कोटी रुपयांच्या प्रारूप विकास आरखड्याला मान्यता देण्यात आली आहे

अलिबाग - राज्यस्तरीय कोकण विभाग जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) २०२०-२१ च्या बैठकीत रायगड जिल्ह्यासाठी ४५ कोटी रुपयांची भरीव वाढ करून एकूण २३४ कोटी रुपयांच्या प्रारूप विकास आरखड्याला मान्यता देण्यात आली आहे, अशी माहिती रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री तथा पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी दिली.मंत्रालयात उपमुख्यमंत्री, वित्त व नियोजनमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली कोकण विभागाची बैठक पार पडली. या बैठकीत रायगड जिल्ह्याच्या विकास आराखड्याला मंजुरी देण्यात आली. काहीच दिवसांपूर्वी रायगड जिल्हा नियोजन समितीची बैठक अलिबाग येथे पार पडली होती, त्या वेळी २४७ कोटी रुपयांच्या प्रारूप विकास आराखड्याला मंजुरी देण्यात आली होती. १८९ कोटी रुपयांच्या आराखड्यात ४५ कोटी रुपयांची वाढीव मागणी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले होते.रायगड जिल्ह्यातील पायाभूत सुविधांची निर्मिती, व्हिजन २०२२ प्रमाणे आराखडा मांडणी, जिल्ह्यातील सर्व गावे/वाड्यांसाठी पिण्याच्या पाण्याची उपलब्धता करून देण्यासाठी आराखडा तयार करणे, मत्स्यविकास योजना, ५९ पर्यटन क्षेत्रात सोयी-सुविधा पुरवणे, सुशिक्षित बेरोजगारांसाठी कौशल्य विकास कार्यक्रम राबविणे, चार नव्याने पशुवैद्यकीय दवाखाने बांधकाम करणे, उर्वरित ग्रामपंचायत इमारत बांधकाम करणे, जिल्ह्यातील सर्व गावे, वाडीमध्ये स्मशानभूमी शेड बांधणे, गाव वाडी-वस्तीवर विद्युतीकरण करणे, जिल्ह्यात अ‍ॅम्ब्युलन्स स्पीड बोट सुरू करणे, आठवी ते दहावीच्या विद्यार्थिनींसाठी सायकल वितरण, ज्या अंगणवाड्या खासगी जागेत आहेत, त्यांना शासकीय जागा उपलब्ध करून देऊन जिल्ह्याच्या विकासासाठी गती देण्यात येईल, असेही तटकरे यांनी सांगितले.व्हिजन २०२२ विकास आराखडास्वच्छ भारत निर्माण अभियान, जिल्ह्याचे रस्ते जोडणे, पाणी पुरवठा योजना/जलजीवन योजना, रायगड किल्ला जतन व संवर्धन, एलिफंटा लेणी संक्षिप्त विकास आराखडा, खारलॅण्ड विकास, कातकरी विकास आराखडा, कृषी क्षेत्र-रब्बी क्षेत्र व फलोत्पादन, सेंद्रिय शेती वाढविणे, बाजारपेठ उपलब्धता, प्रत्येकास पक्की घरे, शैक्षणिक गुणवत्ता वाढविणे, गळतीचे प्रमाण कमी करणे, प्रगत शिक्षण विकास अभियान, कांदळवन विकास कार्यक्रम, कौशल्य विकास कार्यक्रम, प्लास्टिकमुक्त रायगड जिल्हा, जिल्ह्यातील ८४ गावांचे भूस्खलन थांबविणे, मत्स्यव्यवसाय विकास कार्यक्रम, पंतप्रधान विमा योजना, जीवन ज्योत योजना, गाव तेथे दूरसंचार सुविधा, ग्रामीण विद्युतीकरण या महत्त्वाच्या विकासकामांचा समावेश व्हिजन २०२२ मध्ये करण्यात आला आहे, असेही आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Aditi Tatkareअदिती तटकरेRaigadरायगड