शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत अतिशय घाणेरडा खेळ...! आसिम मुनीरच्या प्रेमात पडली अमेरिका, हे काय बोलले टॉप लष्करी कमांडर...?
2
महायुती अन् मविआच्याही एकसंधतेवर प्रश्नचिन्हच; पडघम वाजले, चित्र अस्पष्ट
3
शेअर बाजाराची सुस्त सुरुवात, ५६ अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स; Infosys मध्ये घसरण, 'या' शेअर्समध्ये तेजी
4
RCB वर मोठी कारवाई होणार? BCCI बैठकीत काय निर्णय घेणार? समोर आली खास अपडेट
5
मुंबईत १६ वर्षाच्या मुलीवर अत्याचार, गर्भवती राहिल्यानंतर धक्कादायक प्रकार उघड, गुन्हा दाखल
6
Swami Samartha: राग, चिडचिड, नैराश्य घालवण्याचा रामबाण उपाय म्हणजे 'हा' स्वामी संदेश!
7
एक स्मार्ट डिसिजन EPFO कडून मिळवून देईल अधिक पेन्शन; वय आणि कमाईचं कनेक्शन बहुतेकांना माहीत नाही
8
हूल दिलेल्या मान्सूनची पुन्हा चाहूल; राज्यभर ऑरेंज अलर्ट, धो धो बरसणार
9
मराठा आरक्षणावरील सुनावणी १८ जुलैपासून, अंतिम निकालावरच भवितव्य अवलंबून
10
'महाभारत' सिनेमानंतर आमिर खान खरंच निवृत्ती घेणार? चर्चांवर म्हणाला, "आजकाल लोक..."
11
घटस्फोटानंतर दोन महिन्यातच एक्स पतीचं निधन, त्याच्या आठवणीत अभिनेत्री शुभांगी अत्रे भावुक
12
कोपरखैरणेत बेरोजगार पतीचं हादरवणारं कृत्य; पत्नीची मैत्रीण घरात शिरताच उडाला थरकाप
13
आजचे राशीभविष्य, १२ जून २०२५: आजचा दिवस यशदायी, पदोन्नती संभवते, मित्र भेटतील !
14
होमस्टेमध्ये सापडलेल्या 'त्या' गोष्टीमुळे पोलिसांना सोनमवर आला संशय; पुराव्याने हत्येचे गूढ उकले
15
अमेरिका आंदोलनाने पेटली, १२ राज्यांतील २५ शहरांत लोक उतरले रस्त्यावर; लॉस एंजिलिसमध्ये संचारबंदीनंतर आंदोलन चिरडून टाकण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रयत्न
16
सोनमचा भाऊ म्हणाला, तिला फाशीच द्या, कुटुंबाने नातेसंबंध तोडले; मिळाली पोलिस कोठडी
17
आंतरधर्मीय विवाह; कुटुंबांच्या संमतीने विवाह, तुम्ही आक्षेप कशाला घेता? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
18
काश्मीरसाठी थेट रेल्वे सुरू अन् पर्यटनाची गाडी येतेय रुळावर; १० दिवसांचे बुकिंग फुल्ल
19
शू रॅकवर बसल्याने मांजराला नवव्या मजल्यावरून फेकले, आरोपी शेजाऱ्याविरोधात गुन्हा दाखल
20
लोकल लेट का होते? ते शोधा, तरच अपघात कमी होतील, मुंब्रा दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रवासी संघटनांचे मत

रायगड जिल्ह्यासाठी २३४ कोटींचा आराखडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2020 02:33 IST

राज्यस्तरीय कोकण विभाग जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) २०२०-२१ च्या बैठकीत रायगड जिल्ह्यासाठी ४५ कोटी रुपयांची भरीव वाढ करून एकूण २३४ कोटी रुपयांच्या प्रारूप विकास आरखड्याला मान्यता देण्यात आली आहे

अलिबाग - राज्यस्तरीय कोकण विभाग जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) २०२०-२१ च्या बैठकीत रायगड जिल्ह्यासाठी ४५ कोटी रुपयांची भरीव वाढ करून एकूण २३४ कोटी रुपयांच्या प्रारूप विकास आरखड्याला मान्यता देण्यात आली आहे, अशी माहिती रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री तथा पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी दिली.मंत्रालयात उपमुख्यमंत्री, वित्त व नियोजनमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली कोकण विभागाची बैठक पार पडली. या बैठकीत रायगड जिल्ह्याच्या विकास आराखड्याला मंजुरी देण्यात आली. काहीच दिवसांपूर्वी रायगड जिल्हा नियोजन समितीची बैठक अलिबाग येथे पार पडली होती, त्या वेळी २४७ कोटी रुपयांच्या प्रारूप विकास आराखड्याला मंजुरी देण्यात आली होती. १८९ कोटी रुपयांच्या आराखड्यात ४५ कोटी रुपयांची वाढीव मागणी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले होते.रायगड जिल्ह्यातील पायाभूत सुविधांची निर्मिती, व्हिजन २०२२ प्रमाणे आराखडा मांडणी, जिल्ह्यातील सर्व गावे/वाड्यांसाठी पिण्याच्या पाण्याची उपलब्धता करून देण्यासाठी आराखडा तयार करणे, मत्स्यविकास योजना, ५९ पर्यटन क्षेत्रात सोयी-सुविधा पुरवणे, सुशिक्षित बेरोजगारांसाठी कौशल्य विकास कार्यक्रम राबविणे, चार नव्याने पशुवैद्यकीय दवाखाने बांधकाम करणे, उर्वरित ग्रामपंचायत इमारत बांधकाम करणे, जिल्ह्यातील सर्व गावे, वाडीमध्ये स्मशानभूमी शेड बांधणे, गाव वाडी-वस्तीवर विद्युतीकरण करणे, जिल्ह्यात अ‍ॅम्ब्युलन्स स्पीड बोट सुरू करणे, आठवी ते दहावीच्या विद्यार्थिनींसाठी सायकल वितरण, ज्या अंगणवाड्या खासगी जागेत आहेत, त्यांना शासकीय जागा उपलब्ध करून देऊन जिल्ह्याच्या विकासासाठी गती देण्यात येईल, असेही तटकरे यांनी सांगितले.व्हिजन २०२२ विकास आराखडास्वच्छ भारत निर्माण अभियान, जिल्ह्याचे रस्ते जोडणे, पाणी पुरवठा योजना/जलजीवन योजना, रायगड किल्ला जतन व संवर्धन, एलिफंटा लेणी संक्षिप्त विकास आराखडा, खारलॅण्ड विकास, कातकरी विकास आराखडा, कृषी क्षेत्र-रब्बी क्षेत्र व फलोत्पादन, सेंद्रिय शेती वाढविणे, बाजारपेठ उपलब्धता, प्रत्येकास पक्की घरे, शैक्षणिक गुणवत्ता वाढविणे, गळतीचे प्रमाण कमी करणे, प्रगत शिक्षण विकास अभियान, कांदळवन विकास कार्यक्रम, कौशल्य विकास कार्यक्रम, प्लास्टिकमुक्त रायगड जिल्हा, जिल्ह्यातील ८४ गावांचे भूस्खलन थांबविणे, मत्स्यव्यवसाय विकास कार्यक्रम, पंतप्रधान विमा योजना, जीवन ज्योत योजना, गाव तेथे दूरसंचार सुविधा, ग्रामीण विद्युतीकरण या महत्त्वाच्या विकासकामांचा समावेश व्हिजन २०२२ मध्ये करण्यात आला आहे, असेही आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Aditi Tatkareअदिती तटकरेRaigadरायगड