शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफचे विघ्न, स्वदेशीचा मंत्र, अमेरिकेचे भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ आजपासून, ४८ अब्ज डॉलर्सच्या निर्यातीला फटका
2
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
3
उच्च न्यायालयाने सुनावले, तरीही जरांगे मुंबईत आंदोलनावर ठाम! मुंबईकडे कूच करणारच, जरांगे यांचा इशारा
4
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
6
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
7
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
8
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
9
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
10
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
11
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
12
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
13
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
14
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
15
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
16
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
17
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
18
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
19
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन् बाहेर फेका
20
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!

रायगड जिल्ह्यासाठी २३४ कोटींचा आराखडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2020 02:33 IST

राज्यस्तरीय कोकण विभाग जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) २०२०-२१ च्या बैठकीत रायगड जिल्ह्यासाठी ४५ कोटी रुपयांची भरीव वाढ करून एकूण २३४ कोटी रुपयांच्या प्रारूप विकास आरखड्याला मान्यता देण्यात आली आहे

अलिबाग - राज्यस्तरीय कोकण विभाग जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) २०२०-२१ च्या बैठकीत रायगड जिल्ह्यासाठी ४५ कोटी रुपयांची भरीव वाढ करून एकूण २३४ कोटी रुपयांच्या प्रारूप विकास आरखड्याला मान्यता देण्यात आली आहे, अशी माहिती रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री तथा पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी दिली.मंत्रालयात उपमुख्यमंत्री, वित्त व नियोजनमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली कोकण विभागाची बैठक पार पडली. या बैठकीत रायगड जिल्ह्याच्या विकास आराखड्याला मंजुरी देण्यात आली. काहीच दिवसांपूर्वी रायगड जिल्हा नियोजन समितीची बैठक अलिबाग येथे पार पडली होती, त्या वेळी २४७ कोटी रुपयांच्या प्रारूप विकास आराखड्याला मंजुरी देण्यात आली होती. १८९ कोटी रुपयांच्या आराखड्यात ४५ कोटी रुपयांची वाढीव मागणी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले होते.रायगड जिल्ह्यातील पायाभूत सुविधांची निर्मिती, व्हिजन २०२२ प्रमाणे आराखडा मांडणी, जिल्ह्यातील सर्व गावे/वाड्यांसाठी पिण्याच्या पाण्याची उपलब्धता करून देण्यासाठी आराखडा तयार करणे, मत्स्यविकास योजना, ५९ पर्यटन क्षेत्रात सोयी-सुविधा पुरवणे, सुशिक्षित बेरोजगारांसाठी कौशल्य विकास कार्यक्रम राबविणे, चार नव्याने पशुवैद्यकीय दवाखाने बांधकाम करणे, उर्वरित ग्रामपंचायत इमारत बांधकाम करणे, जिल्ह्यातील सर्व गावे, वाडीमध्ये स्मशानभूमी शेड बांधणे, गाव वाडी-वस्तीवर विद्युतीकरण करणे, जिल्ह्यात अ‍ॅम्ब्युलन्स स्पीड बोट सुरू करणे, आठवी ते दहावीच्या विद्यार्थिनींसाठी सायकल वितरण, ज्या अंगणवाड्या खासगी जागेत आहेत, त्यांना शासकीय जागा उपलब्ध करून देऊन जिल्ह्याच्या विकासासाठी गती देण्यात येईल, असेही तटकरे यांनी सांगितले.व्हिजन २०२२ विकास आराखडास्वच्छ भारत निर्माण अभियान, जिल्ह्याचे रस्ते जोडणे, पाणी पुरवठा योजना/जलजीवन योजना, रायगड किल्ला जतन व संवर्धन, एलिफंटा लेणी संक्षिप्त विकास आराखडा, खारलॅण्ड विकास, कातकरी विकास आराखडा, कृषी क्षेत्र-रब्बी क्षेत्र व फलोत्पादन, सेंद्रिय शेती वाढविणे, बाजारपेठ उपलब्धता, प्रत्येकास पक्की घरे, शैक्षणिक गुणवत्ता वाढविणे, गळतीचे प्रमाण कमी करणे, प्रगत शिक्षण विकास अभियान, कांदळवन विकास कार्यक्रम, कौशल्य विकास कार्यक्रम, प्लास्टिकमुक्त रायगड जिल्हा, जिल्ह्यातील ८४ गावांचे भूस्खलन थांबविणे, मत्स्यव्यवसाय विकास कार्यक्रम, पंतप्रधान विमा योजना, जीवन ज्योत योजना, गाव तेथे दूरसंचार सुविधा, ग्रामीण विद्युतीकरण या महत्त्वाच्या विकासकामांचा समावेश व्हिजन २०२२ मध्ये करण्यात आला आहे, असेही आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Aditi Tatkareअदिती तटकरेRaigadरायगड