शहरं
Join us  
Trending Stories
1
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
2
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
5
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
6
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
7
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
8
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
9
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
10
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
11
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
12
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
13
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
14
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
15
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
16
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
19
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 
20
आरारारा खतरनाक! 'या' देशात भाडे तत्वावर मिळतो बॉयफ्रेंड; मोजावे लागतात 'इतके' पैसे

उरणमधील ३५ गावांतील रस्ते बनले डम्पिंग ग्राउंड..! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2023 11:33 IST

उरण तालुक्यातील ३५ पैकी एकाही ग्रामपंचायतीकडे डम्पिंग ग्राउंडची सुविधा नाही.

उरण : स्वच्छ भारत अभियानाचे उरणच्या ग्रामपंचायतींनी तीनतेरा वाजवले आहेत. गावातून गोळा केलेला कचरा रहदारीच्या रस्त्यांवर टाकून परिसरातील रस्त्यांचे डम्पिंग ग्राउंड केल्याचे चित्र उरण तालुक्यात दिसून येत आहे. अशा जागोजागी साठलेल्या कचऱ्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे.उरण तालुक्यातील ३५ पैकी एकाही ग्रामपंचायतीकडे डम्पिंग ग्राउंडची सुविधा नाही. त्यामुळे ग्रामपंचायतींच्या हद्दीतील दररोज जमा होणारा सुमारे १०० टन कचरा मिळेल त्या जागी, दिसेल तिथे ठिकठिकाणी रहदारीच्या रस्त्यांच्या दुतर्फा जागेवर टाकला जात आहे. यामुळे परिसरात दुर्गंधी निर्माण होत आहे. त्यामुळे रहदारीच्या रस्त्यावरून मार्गक्रमण करणाऱ्या ग्रामस्थांना नाक दाबून प्रवास करावा लागत असल्याची माहिती अनंत नारंगीकर यांनी दिली.सध्या मोठ्या प्रमाणात केरकचरा हा चिरनेर-कोप्रोली, चिर्ले-दिघोडे, पिरवाडी-चारफाटा, द्रोणागिरी नोड तसेच तालुक्यातील इतर रस्त्यांवर टाकला जात आहे. त्यामुळे कुजलेल्या कचऱ्यामुळे दुर्गंधी पसरत आहे. त्यामुळे या दुर्गंधीने साथीचे रोग पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे. मात्र, एकीकडे शासन स्वच्छतेकडे लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन करीत असताना ग्रामपंचायती मात्र शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत नाहीत. ग्रामस्वच्छतेसाठी शासन आग्रही आहे. विविध योजनांवर शासनाकडून कोट्यवधी रुपये खर्चही केले जातात. मात्र, त्यानंतरही उरण तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींच्या हद्दीत स्वच्छतेचा पुरता बोजवारा उडालेला दिसतो आहे.

कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची समस्या कायममागील अनेक वर्षांपासूनच चाणजे, केगाव, नागाव, म्हातवली ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सिडको, जिल्हाधिकाऱ्यांकडे डंपिंग ग्राऊंडची मागणी करण्यात आली आहे. मात्र मागणी अद्यापही पुर्ण झाली नसल्याने कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची समस्या कायम सतावत असल्याची प्रतिक्रिया चाणजे ग्रामपंचायतीचे सरपंच अमित भगत यांनी दिली.

उपाययोजना करणारसध्याच्या घडीला ग्रामपंचायतीकडे डम्पिंग ग्राउंडची कोणतीही सोय नसल्याने अनेक समस्या निर्माण होत आहेत. सिडको, जिल्हाधिकाऱ्यांकडे जागेसाठी मागणी केल्याची माहिती खोपटा-बांधपाडा ग्रामपंचायतीच्या सरपंच विशाखा ठाकूर यांनी दिली.उरण तालुक्यातील कोणत्याही ग्रामपंचायतींकडे डम्पिंग ग्राउंड नाही. डम्पिंग ग्राउंडसाठी उरण तहसीलदार, सिडको तसेच संबंधित प्रशासकीय अधिकारी यांच्या सोबत लवकरच बैठक घेण्यात येणार आहे. जनतेच्या आरोग्याच्या प्रश्नावर उपाययोजना करण्यासाठी पुढाकार घेणार असल्याची माहिती उरण गटविकास अधिकारी एस. पी. वाठारकर यांनी दिली.

टॅग्स :Raigadरायगड