शहरं
Join us  
Trending Stories
1
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
2
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
3
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
4
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
5
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
6
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
7
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
8
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
9
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
10
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
11
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
12
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
13
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
14
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
15
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
16
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
17
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
18
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
19
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
20
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

कालवा फुटल्याने रस्ता गेला वाहून

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2019 23:43 IST

तालुक्यातील राजनाला कालवा फुटल्याने रस्ता वाहून गेला आहे, त्यामुळे कडाव-सापेले रस्ता वाहतुकीस बंद असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे.

संजय गायकवाड कर्जत : तालुक्यातील राजनाला कालवा फुटल्याने रस्ता वाहून गेला आहे, त्यामुळे कडाव-सापेले रस्ता वाहतुकीस बंद असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे.पाटबंधारे विभागाच्या अखत्यारीत असलेल्या राजनाला कालवा फुटल्याने सार्वजनिक बांधकाम उपविभाग १ कार्यालयाच्या अखत्यारीत येत असलेला उक्रुळ -चांदई -कडाव -वदप -गौरकामत -दहिवली -कोंदीवडे या रस्त्यावरील तांबस गावापुढे रस्ता वाहून गेल्याने कडाव -सापेले रस्ता वाहतुकीस बंद आहे. तालुक्यातील कडाव -सापेले रस्त्यावरील भाग १५ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास ५० मीटरचा रस्ता वाहून गेला आहे, दोन महिन्यांपासून रस्ता वाहून जाण्याची ही तिसरी घटना आहे. यंदा संततधार पडणाऱ्या पावसामुळे राजनाला कालवा फुटल्याने रस्ता वाहून गेला त्यानंतर हा रस्ता वाहतुकीस बंद होता. तालुक्यातील रस्त्याविषयी आमदार सुरेश लाड यांनी उपोषणाचा इशारा दिला आणि काही रस्त्याविषयी उपोषण सुरू केले. त्या अगोदर सार्वजनिक बांधकाम खात्याने हा रस्ता दुरुस्त केला. त्यानंतर पुन्हा जोरदार पावसामध्ये रस्त्याचा भाग खचला त्यावर पुन्हा डागडुजी करण्यात आली, मात्र रविवारी पुन्हा हा रस्ता वाहून गेला आहे, याबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग -१ कार्यालयाचे उपविभागीय अभियंता अजयकुमार सर्वगोड यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी ज्या ठिकाणी राजनाला कालवा फुटला आहे तो दुरुस्त केला पाहिजे, तो दुरुस्त होत नाही तोपर्यंत रस्ता दुरुस्त केला तरी तो वाहून जाणार आहे, असे सांगितले.।नागरिकांची गैरसोयपाटबंधारे विभाग याबाबत उदासीन आहे त्यांच्या कार्यालयाकडून फुटलेल्या कॅनल दुरुस्तीबाबत कोणतीच हालचाल दिसून येत नाही. दोन्ही कार्यालयाच्या तू तू मध्ये ऐन पावसाळ्यात मात्र नागरिकांचे हाल होत आहे. जांभिवली, गौरकामत, वदप, बारणे, तांबस, साळोख, सापेलेमधील नागरिकांची मात्र गैरसोय झाली आहे.मुसळधार पाऊस पडत असल्याने राजनाला कालव्याला पाणी वाढते आणि ते पाणी फुटलेल्या ठिकाणाहून संपूर्ण रस्त्यावरून वाहते अनेक वेळा या परिसरातील मोºया गाळाने बंद झाल्या होत्या त्या साफ करण्यात आल्या. रस्ता वाहून गेलेल्या ठिकाणी खड्डा झाला आहे त्या ठिकाणी कोणताही अपघात होऊ नये म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दगडी टाकून रस्ता बंद केला आहे व त्या ठिकाणी सावधान असा फलक लावला आहे, रस्त्याविषयी वरिष्ठांना लेखी कळवले आहे.- अजयकुमार सर्वगोड, उपविभागीय अभियंता,सार्वजनिक बांधकाम विभाग